शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात हातपंपांचे कोटीच्या कोटी उड्डाणे

By admin | Updated: July 21, 2015 01:40 IST

भूजल पातळीचा कुठलाही विचार न करता मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये नव्याने हातपंप घेण्यासाठी प्रशासनाने कोट्यवधींचा खर्च केला

औरंगाबाद : भूजल पातळीचा कुठलाही विचार न करता मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये नव्याने हातपंप घेण्यासाठी प्रशासनाने कोट्यवधींचा खर्च केला. मात्र पुरेशा पावसाअभावी जमिनीतील पाणी पातळीत मोठी घट झाल्याने आता हे हातपंप ऐन पावसाळ््यातच कोरडे पडले आहेत. हातपंपांसाठी केलेला खर्च वाया जाण्याबरोबरच अनेक ठिकाणी तर आता टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. विभागीय आयुक्तालयाला जिल्हा पातळीवरून हातपंपांची माहिती मिळाली आहे. त्यातून मराठवाड्यातील स्थितीचा उलगडा झाला आहे. नवीन हातपंप घेण्यासाठी १,५३२ गावांत ७ कोटी १० लाख रुपयांचा खर्च झाला तर १,४६५ गावांतील हातपंप दुरुस्तीसाठी दिलेला १ कोटी ५५ लाखांचा निधी एकप्रकारे वाया गेल्याचे चित्र आहे.१ आॅक्टोबर २०१४ पासून विभागातील पाणी टंचाई आराखड्यावर प्रशासनाने निधी देण्यास सुरुवात केली. ३० जून २०१५ पर्यंत विभागात नव्याने हातपंप घेणे आणि जुन्याची दुरुस्ती करण्यासाठी ८ कोटी ६५ लाख रुपये खर्च झाले. मात्र त्यानंतर पाणी टंचाई कायम आहे. हातपंपांचे पुनर्भरण करण्यासाठी कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६४१ हातंपप बसविण्यात आले. त्यावर २ कोटी ८९ लाख रुपये खर्च झाले. त्याखालोखाल लातूर जिल्ह्यात २४७ हातपंपांवर ९० लाखांचा खर्च झाला. नांदेड जिल्ह्यातील १ हजार ५८ हातपंपांची दुरुस्ती करण्यात आली. त्यापोटी ९८ लाखांचा निधी दिल्याचे दाखविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)