शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

मराठवाड्यात हातपंपांचे कोटीच्या कोटी उड्डाणे

By admin | Updated: July 21, 2015 01:40 IST

भूजल पातळीचा कुठलाही विचार न करता मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये नव्याने हातपंप घेण्यासाठी प्रशासनाने कोट्यवधींचा खर्च केला

औरंगाबाद : भूजल पातळीचा कुठलाही विचार न करता मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये नव्याने हातपंप घेण्यासाठी प्रशासनाने कोट्यवधींचा खर्च केला. मात्र पुरेशा पावसाअभावी जमिनीतील पाणी पातळीत मोठी घट झाल्याने आता हे हातपंप ऐन पावसाळ््यातच कोरडे पडले आहेत. हातपंपांसाठी केलेला खर्च वाया जाण्याबरोबरच अनेक ठिकाणी तर आता टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. विभागीय आयुक्तालयाला जिल्हा पातळीवरून हातपंपांची माहिती मिळाली आहे. त्यातून मराठवाड्यातील स्थितीचा उलगडा झाला आहे. नवीन हातपंप घेण्यासाठी १,५३२ गावांत ७ कोटी १० लाख रुपयांचा खर्च झाला तर १,४६५ गावांतील हातपंप दुरुस्तीसाठी दिलेला १ कोटी ५५ लाखांचा निधी एकप्रकारे वाया गेल्याचे चित्र आहे.१ आॅक्टोबर २०१४ पासून विभागातील पाणी टंचाई आराखड्यावर प्रशासनाने निधी देण्यास सुरुवात केली. ३० जून २०१५ पर्यंत विभागात नव्याने हातपंप घेणे आणि जुन्याची दुरुस्ती करण्यासाठी ८ कोटी ६५ लाख रुपये खर्च झाले. मात्र त्यानंतर पाणी टंचाई कायम आहे. हातपंपांचे पुनर्भरण करण्यासाठी कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६४१ हातंपप बसविण्यात आले. त्यावर २ कोटी ८९ लाख रुपये खर्च झाले. त्याखालोखाल लातूर जिल्ह्यात २४७ हातपंपांवर ९० लाखांचा खर्च झाला. नांदेड जिल्ह्यातील १ हजार ५८ हातपंपांची दुरुस्ती करण्यात आली. त्यापोटी ९८ लाखांचा निधी दिल्याचे दाखविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)