शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

मराठवाड्यात हातपंपांचे कोटीच्या कोटी उड्डाणे

By admin | Updated: July 21, 2015 01:40 IST

भूजल पातळीचा कुठलाही विचार न करता मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये नव्याने हातपंप घेण्यासाठी प्रशासनाने कोट्यवधींचा खर्च केला

औरंगाबाद : भूजल पातळीचा कुठलाही विचार न करता मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये नव्याने हातपंप घेण्यासाठी प्रशासनाने कोट्यवधींचा खर्च केला. मात्र पुरेशा पावसाअभावी जमिनीतील पाणी पातळीत मोठी घट झाल्याने आता हे हातपंप ऐन पावसाळ््यातच कोरडे पडले आहेत. हातपंपांसाठी केलेला खर्च वाया जाण्याबरोबरच अनेक ठिकाणी तर आता टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. विभागीय आयुक्तालयाला जिल्हा पातळीवरून हातपंपांची माहिती मिळाली आहे. त्यातून मराठवाड्यातील स्थितीचा उलगडा झाला आहे. नवीन हातपंप घेण्यासाठी १,५३२ गावांत ७ कोटी १० लाख रुपयांचा खर्च झाला तर १,४६५ गावांतील हातपंप दुरुस्तीसाठी दिलेला १ कोटी ५५ लाखांचा निधी एकप्रकारे वाया गेल्याचे चित्र आहे.१ आॅक्टोबर २०१४ पासून विभागातील पाणी टंचाई आराखड्यावर प्रशासनाने निधी देण्यास सुरुवात केली. ३० जून २०१५ पर्यंत विभागात नव्याने हातपंप घेणे आणि जुन्याची दुरुस्ती करण्यासाठी ८ कोटी ६५ लाख रुपये खर्च झाले. मात्र त्यानंतर पाणी टंचाई कायम आहे. हातपंपांचे पुनर्भरण करण्यासाठी कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६४१ हातंपप बसविण्यात आले. त्यावर २ कोटी ८९ लाख रुपये खर्च झाले. त्याखालोखाल लातूर जिल्ह्यात २४७ हातपंपांवर ९० लाखांचा खर्च झाला. नांदेड जिल्ह्यातील १ हजार ५८ हातपंपांची दुरुस्ती करण्यात आली. त्यापोटी ९८ लाखांचा निधी दिल्याचे दाखविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)