शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

हजारो शेतकऱ्यांच्या बांधावर दिवसाला आली ९ लाख युनिट सौरऊर्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 03:16 IST

११० प्रकल्प; मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना, चार हजार कोटींची गुंतवणूक

- सचिन लुंगसे मुंबई : भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत असलेल्या एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेंतर्गत महावितरण, महानिर्मितीसोबत वीजखरेदी करार केले असून, याद्वारे राज्यातील ११० प्रकल्पांतून दिवसाला ९ लाख युनिट सौरऊर्जा मिळत आहे. ७० हजार शेतकऱ्यांना ती वापरता येत असून, याद्वारे १ लाख ९ हजार मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन वाचत आहे. या प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.२०० आणि ३०० अशा ५०० मेगावॅटच्या वीज खरेदी करारानंतर पुन्हा महानिर्मितीसोबत २८० मेगावॅटचा करार करण्यात आला आहे. एकूण या योजनेंतर्गत ७८० मेगावॅट विजेचे करार होत आहेत.शेती पंपासाठी ज्या वाहिन्या वेगळ्या झाल्या. त्याद्वारे वाजवी वीजदरात कशी वीज देता येईल, हा याचा उद्देश आहे. महावितरणची जिथे उपकेंद्र आहेत, तेथील पडकी जमीन यासाठी वापरली जात आहे. छोटे प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.शेतकºयांना होणार फायदाउपकेंद्रालगत प्रकल्प उभारल्याने वीजहानी होत नाही. शेती पंपाचा फिडरदेखील येथेच जोडला जातो. त्यामुळे विजेची हानी कमी होत आहे.नुकतेच उस्मानाबाद जिल्ह्यातील शेलगाव आणि मुळुज येथे अनुक्रमे ५.२३, २.७ मेगावॅट क्षमतेचे दोन सौरऊर्जा प्रकल्प सुरू झाले. या गावासह लगतच्या ८ हजार शेतकºयांना फायदा होणार आहे. कारण एक सौरकृषी वाहिनी साधारण पाच ते दहा गावांतून जाते.कोरोनाच्या काळात ५० मेगावॅटच्या क्षमतेचे प्रकल्प सुरू झाले असून, या योजनेतून दीड हजार लोकांना रोजगार मिळाला.वीजहानी कमी होण्यास मदतसब स्टेशनच्या बाजूलाच सौरऊर्जा प्रकल्प लावल्यामुळे वीजहानी कमी होण्यास मदत होते. शेतकरी वीजबिल भरण्यास मदत करतील.- सतीश चव्हाण, संचालक व्यावसायिक, महावितरणवाजवी दरात वीजराजस्थान, यूपी, हरियाणा, पंजाब राज्यात हा प्रकल्प राबविला जाईल. महाराष्ट्रात ४४ हजार कृषी ग्राहक आहेत. सौरऊर्जा करारानुसार वीजदर प्रति युनिट ३ रुपये आहे. वीजखरेदी करार कमी किमतीत झाल्याने ग्राहकांना फायदा होईल. वाजवी दरात वीज उपलब्ध करून देणे हाच उद्देश आहे.- दीपक कोकाटे, प्रमुख, महाराष्ट्र, एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड