शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

हजारो शेतकऱ्यांच्या बांधावर दिवसाला आली ९ लाख युनिट सौरऊर्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 03:16 IST

११० प्रकल्प; मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना, चार हजार कोटींची गुंतवणूक

- सचिन लुंगसे मुंबई : भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत असलेल्या एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेंतर्गत महावितरण, महानिर्मितीसोबत वीजखरेदी करार केले असून, याद्वारे राज्यातील ११० प्रकल्पांतून दिवसाला ९ लाख युनिट सौरऊर्जा मिळत आहे. ७० हजार शेतकऱ्यांना ती वापरता येत असून, याद्वारे १ लाख ९ हजार मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन वाचत आहे. या प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.२०० आणि ३०० अशा ५०० मेगावॅटच्या वीज खरेदी करारानंतर पुन्हा महानिर्मितीसोबत २८० मेगावॅटचा करार करण्यात आला आहे. एकूण या योजनेंतर्गत ७८० मेगावॅट विजेचे करार होत आहेत.शेती पंपासाठी ज्या वाहिन्या वेगळ्या झाल्या. त्याद्वारे वाजवी वीजदरात कशी वीज देता येईल, हा याचा उद्देश आहे. महावितरणची जिथे उपकेंद्र आहेत, तेथील पडकी जमीन यासाठी वापरली जात आहे. छोटे प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.शेतकºयांना होणार फायदाउपकेंद्रालगत प्रकल्प उभारल्याने वीजहानी होत नाही. शेती पंपाचा फिडरदेखील येथेच जोडला जातो. त्यामुळे विजेची हानी कमी होत आहे.नुकतेच उस्मानाबाद जिल्ह्यातील शेलगाव आणि मुळुज येथे अनुक्रमे ५.२३, २.७ मेगावॅट क्षमतेचे दोन सौरऊर्जा प्रकल्प सुरू झाले. या गावासह लगतच्या ८ हजार शेतकºयांना फायदा होणार आहे. कारण एक सौरकृषी वाहिनी साधारण पाच ते दहा गावांतून जाते.कोरोनाच्या काळात ५० मेगावॅटच्या क्षमतेचे प्रकल्प सुरू झाले असून, या योजनेतून दीड हजार लोकांना रोजगार मिळाला.वीजहानी कमी होण्यास मदतसब स्टेशनच्या बाजूलाच सौरऊर्जा प्रकल्प लावल्यामुळे वीजहानी कमी होण्यास मदत होते. शेतकरी वीजबिल भरण्यास मदत करतील.- सतीश चव्हाण, संचालक व्यावसायिक, महावितरणवाजवी दरात वीजराजस्थान, यूपी, हरियाणा, पंजाब राज्यात हा प्रकल्प राबविला जाईल. महाराष्ट्रात ४४ हजार कृषी ग्राहक आहेत. सौरऊर्जा करारानुसार वीजदर प्रति युनिट ३ रुपये आहे. वीजखरेदी करार कमी किमतीत झाल्याने ग्राहकांना फायदा होईल. वाजवी दरात वीज उपलब्ध करून देणे हाच उद्देश आहे.- दीपक कोकाटे, प्रमुख, महाराष्ट्र, एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड