शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मालवाहतूकदारांच्या संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 01:48 IST

उद्योगधंद्यांना ब्रेक; जीवनाश्यक वस्तुंची आवक मंदावली

मुंबई : माल वाहतूकदारांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरू केलेल्या देशव्यापी चक्का जाम आंदोलनामुळे राज्यातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प होऊन उद्योगधंदे थंडावले आहेत. अकोला, भुसावळ, जळगाव रेल्वे स्थानकावर १२ हजार टन खतांचा साठा पडून राहिला आहे. त्यामुळे शेतीवर देखील प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. भुसार, भाजीपालासह जीवनावश्यक वस्तूंची आवक बाजारात मंदावली आहे. संपामुळे कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल १२०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. कच्च्या मालाच्या अभावामुळे तसेच तयार माल पडून राहिल्याने औद्योगिक वसाहतीमधील काम मंदावले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून दररोज किमान ६०० ट्रक साखर देशभरात निर्यात केली जाते; ती ठप्प होऊन २०० कोटींची उलाढाल थांबली आहे. भाजीपाला, कांदा-बटाटे, गॅस सिलिंडर, धान्य, पेट्रोल, डिझेल यांवर विपरीत परिणाम झाला आहे.मराठवाड्यातील उद्योगाला १२५ कोटींचा फटका बसला आहे. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा एमआयडीसीत आॅटोमोबाईल, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिकसह विविध कंपन्यांतून दररोज २ हजार ट्रकमधून जवळपास ३२ हजार टन कच्चामाल दाखल होत असतो. संपामुळे जवळपास १ लाख ९२ हजार टन माल दाखल झालेला नाही. त्यामुळे २४ तास चालणारी यंत्रांना ब्रेक लागला असून उत्पादन १५ टक्क्यांनी घटले आहे.१२ हजार टन खतांचा साठा पडूनमहाराष्ट्राच्या इंडियन पोटॅश लिमिटेड कंपनीचा१२ हजार टन खतांचा साठा जळगाव, भुसावळ आणि अकोला रेल्वे स्थानकावर पडून आहे. या साठ्याची उचल कशी करावी, हा पेच आता प्रशासन आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. पावसाचे दिवस आहेत. अकोला रेल्वे स्थानकावरील गोडावूनमध्ये जागा नाही. रेल्वे स्थानकावर उतरलेले रासायनिक खत हलविण्याची दुसरी यंत्रणा नाही. निवासी उप जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मालवाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाºयांना खत वाहतूक करण्याची विनंती केली. परंतु त्यांनी नकार दिला आहे.

टॅग्स :Strikeसंपvegetableभाज्याMilk Supplyदूध पुरवठा