शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

कावेरी पाणीवाटपाप्रमाणे सीमा भागातील बांधवांनाही न्याय मिळावा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 3, 2016 08:22 IST

सीमा बांधवांवरील अन्याय कावेरी पाणीवाटपाप्रमाणे दूर करून लोकशाही व न्यायव्यवस्थेची बूज राखावी हीच आमची सर्वोच्च न्यायालयाच्या चरणी प्रार्थना आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - लोकशाही व्यवस्थेत सीमा भागातील मराठी लोक हे या देशाचाच एक भाग आहेत. तरीही कर्नाटक सरकार त्यांच्यावर भाषा, संस्कृतीबाबत जो अन्याय रोज करीत आहे त्यावर सर्वच न्यायालये तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसली आहेत. जो न्याय कावेरी पाणीवाटपात तामीळनाडूस मिळाला त्याच न्यायाचे हकदार मराठी सीमा बांधवदेखील आहेत. सीमा बांधवांवरील अन्याय कावेरी पाणीवाटपाप्रमाणे दूर करून लोकशाही व न्यायव्यवस्थेची बूज राखावी हीच आमची सर्वोच्च न्यायालयाच्या चरणी प्रार्थना आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सामना संपादकीयच्या माध्यमातून बोलले आहेत.
 
कावेरी पाणीवाटपावरून सर्वोच्च न्यायालय कर्नाटकच्या कमरेत रोज लाथा घालत आहे. याप्रश्‍नी न्यायालयाने कर्नाटकास आणखी एक जोरदार चपराक मारल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुजलेल्या थोबाडाने स्वत:स जणू कोंडूनच घेतले आहे. तामीळनाडूला दररोज सहा हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. हे पाहिल्यावर आमच्या मनात विचार आला तो मराठी सीमा बांधवांचा. जो न्याय सर्वोच्च न्यायालयाने तामीळनाडूस दिला तोच न्याय कर्नाटकच्या जबड्यात तडफडणार्‍या २० लाख मराठी सीमा बांधवांना मिळेल काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
तामीळनाडूची जनता कानडी सरकारच्या हेकेखोर वृत्तीमुळे पाण्यासाठी तडफडत होती व त्याच कानडी सरकारच्या मुजोर, मस्तवाल वृत्तीमुळे सीमा भागातील २० लाख मराठी बांधवांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मराठी बांधव न्याय मागत आहेत व कानडी सरकार त्यांना जोरजुलमाने चिरडत आहे. लोकशाही मार्गाने न्याय मिळाला नाही म्हणून हे सर्व खटले सर्वोच्च न्यायालयात उभे राहिले, पण तिथेही या खटल्यांचे घोंगडे भिजत पडले आहे. ते पाहता २० लाख मराठी बांधवांच्या आक्रोशाला आपल्या न्यायव्यवस्थेत काही किंमत आहे की नाही, असाच प्रश्‍न पडतो. कारण जो न्याय पाण्याच्या बाबतीत तामीळनाडूस तडकाफडकी मिळतो तो न्याय २० लाख सीमा बांधवांना ६० वर्षांनंतरही का मिळू नये? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. 
 
‘तामीळनाडूस त्यांच्या हक्काचे पाणी सोडा नाहीतर परिणामास सज्ज व्हा!’ असा दम न्यायालयाने कानडी सरकारला भरला आहे. कोणत्याही परिस्थितीत कावेरीचे पाणी तामीळनाडूस न सोडण्याची भूमिका कर्नाटकने घेतली होती, पण न्यायालयाने परखडपणे बजावले, देशातील सर्व राज्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केलेच पाहिजे. लोकशाही व्यवस्थेत कर्नाटक राज्य हेदेखील देशाचा एक भाग असल्याचे खडे बोल न्यायालयाने सुनावले आहेत. हेच बोल आमच्या मराठी सीमा बांधवांच्या बाबतीत लागू होतात, पण तिथे मात्र खडे बोल सुनावण्याऐवजी २० लाख मराठी बांधवांचे हक्क खड्यासारखे बाजूला सारले जातात याचे दु:ख आम्हाला वाटते अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.