शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

हजारो संतप्त आदिवासींचा विष्णू सवरांच्या घराला घेराव

By admin | Updated: October 4, 2016 05:24 IST

आदिवासींचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी किसान सभेच्या हजारो संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या दिला आहे

वाडा (पालघर) : आदिवासींचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी किसान सभेच्या हजारो संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या दिला आहे. सवरा यांनी दिलेला चर्चेचा प्रस्ताव धुडकावून ठोस कृती हवी, अशी ठाम भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली आहे. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी सवरा हे सोमवारीच औरंगाबाद येथे गेले आहेत. मंत्री सवरा यांच्या घराला घेराव घालण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्त्वात रॅली जात असता तिला पोलिसांनी रस्त्यातच अडविले. त्यामुळे आदिवासी बांधवांनी तिथेच ठिय्या आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता. या ठिय्यामुळे वाडा-मनोर रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने पोलिसांनी वाहतूक कंचाडमार्गे वळवली.आदिवासी शेतकरी, देवस्थान शेतकरी व जंगल निवासी, आदिवासी विद्यार्थी यांचे प्रश्न अधिक गंभीर बनत आहेत. आदिवासी भागातील कुपोषण, बालमृत्यू, रोजगारासाठीचे स्थलांतर, आश्रमशाळांतील अपुऱ्या सुविधा, रोजगार आणि देवस्थानच्या जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आदिवासी विकास मंत्री सवरा असंवेदनशीलपणे हाताळत आहेत. याचा निषेध या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला.दोन दिवसांत आपण मंत्रालयात चर्चा करू त्यासाठी आपल्या शिष्टमंडळाची व संबंधित खात्याच्या मंत्र्यांची बैठक बोलावतो, आपण ठिय्या मागे घ्यावा हा विष्णू सवरा यांनी दिलेला प्रस्ताव किसान सभेने फेटाळून लावला असून जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत सवरा यांच्या निवासस्थान परिसरातील ठिय्या कायम राहिल, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे याबाबत काही समेट होण्याची आशा मावळली आहे.या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे केंद्रीय सहसचिव कॉ. अशोक ढवळे, माजी राज्य अध्यक्ष कॉ. जे. पी. गावित, कामगार नेते नरसय्या आडाम, राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य कार्याध्यक्ष अर्जुन आडे, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केले. ----------बससेवा ठप्प झाल्याने पायपीट सकाळपासूनच राज्यभरातून आलेल्या आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी वाडा-मनोर, भिवंडी-वाडा महामार्ग जाम केल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. याचा फटका व्यापारी, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांना बसला. तर या कोंडीमुळे बससेवा ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांसह, स्थानिकांना पायपीट करावी लागली.