शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

हजारो संतप्त आदिवासींचा विष्णू सवरांच्या घराला घेराव

By admin | Updated: October 4, 2016 05:24 IST

आदिवासींचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी किसान सभेच्या हजारो संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या दिला आहे

वाडा (पालघर) : आदिवासींचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी किसान सभेच्या हजारो संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या दिला आहे. सवरा यांनी दिलेला चर्चेचा प्रस्ताव धुडकावून ठोस कृती हवी, अशी ठाम भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली आहे. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी सवरा हे सोमवारीच औरंगाबाद येथे गेले आहेत. मंत्री सवरा यांच्या घराला घेराव घालण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्त्वात रॅली जात असता तिला पोलिसांनी रस्त्यातच अडविले. त्यामुळे आदिवासी बांधवांनी तिथेच ठिय्या आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता. या ठिय्यामुळे वाडा-मनोर रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने पोलिसांनी वाहतूक कंचाडमार्गे वळवली.आदिवासी शेतकरी, देवस्थान शेतकरी व जंगल निवासी, आदिवासी विद्यार्थी यांचे प्रश्न अधिक गंभीर बनत आहेत. आदिवासी भागातील कुपोषण, बालमृत्यू, रोजगारासाठीचे स्थलांतर, आश्रमशाळांतील अपुऱ्या सुविधा, रोजगार आणि देवस्थानच्या जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आदिवासी विकास मंत्री सवरा असंवेदनशीलपणे हाताळत आहेत. याचा निषेध या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला.दोन दिवसांत आपण मंत्रालयात चर्चा करू त्यासाठी आपल्या शिष्टमंडळाची व संबंधित खात्याच्या मंत्र्यांची बैठक बोलावतो, आपण ठिय्या मागे घ्यावा हा विष्णू सवरा यांनी दिलेला प्रस्ताव किसान सभेने फेटाळून लावला असून जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत सवरा यांच्या निवासस्थान परिसरातील ठिय्या कायम राहिल, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे याबाबत काही समेट होण्याची आशा मावळली आहे.या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे केंद्रीय सहसचिव कॉ. अशोक ढवळे, माजी राज्य अध्यक्ष कॉ. जे. पी. गावित, कामगार नेते नरसय्या आडाम, राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य कार्याध्यक्ष अर्जुन आडे, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केले. ----------बससेवा ठप्प झाल्याने पायपीट सकाळपासूनच राज्यभरातून आलेल्या आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी वाडा-मनोर, भिवंडी-वाडा महामार्ग जाम केल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. याचा फटका व्यापारी, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांना बसला. तर या कोंडीमुळे बससेवा ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांसह, स्थानिकांना पायपीट करावी लागली.