शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

साडेतेरा हजार अपघाती मृत्यू

By admin | Updated: January 16, 2016 01:21 IST

मानवी चुका, रस्ते महामंडळाचे दुर्लक्ष आणि वाहनचालकांचा बेदरकारपणा यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. राज्यात रस्ते अपघातांमध्ये २०१३च्या तुलनेत २०१४मध्ये ५१९

पुणे : मानवी चुका, रस्ते महामंडळाचे दुर्लक्ष आणि वाहनचालकांचा बेदरकारपणा यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. राज्यात रस्ते अपघातांमध्ये २०१३च्या तुलनेत २०१४मध्ये ५१९ (१.१८ टक्के)ने वाढ झाली आहे. त्यात प्राणांतिक अपघातांची संख्या १३ हजार ५२९ वर गेली असल्याची आकडेवारी पोलीस सूत्रांनी दिली. २०१३मध्ये राज्यात रस्ते अपघातांच्या ४३ हजार ८६३घटना घडल्या. या अपघातांत १३ हजार २४५ व्यक्तींना जीव गमवावा लागला. २०१४ मध्ये अपघातांची संख्या ४४ हजार ३८२, तर मृतांची संख्या १३ हजार ५२९ झाली. राज्यात २०१४ मध्ये सर्वाधिक अपघात नाशिक शहरात (३३६७) घडले आहेत. त्याखालोखाल ठाणे ग्रामीण (२४७४), औरंगाबाद शहर (२३४७), नाशिक ग्रामीण (२३३२) आणि पुणे ग्रामीण (२२८६) यांचा क्रमांक आहे. त्यात नाशिकमध्ये १९४, ठाणे ग्रामीणमध्ये ५१२, औरंगाबाद शहरामध्ये २१०, नाशिक ग्रामीणमध्ये ७८७ व पुणे ग्रामीणमध्ये ९८४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)दुचाकीस्वारांना सर्वाधिक धोका१३ हजार ५२९ मृतांपैकी सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचे झाले आहेत. तब्बल ५ हजार ४६ दुचाकीस्वारांना अपघातांमध्ये प्राण गमवावे लागले असून, हे प्रमाण एकूण अपघातांच्या ३७.३० टक्के एवढे आहे. त्याखालोखाल खासगी ट्रक / लॉरी यांच्यामुळे २ हजार १८४ अपघात झाले आहेत. अनेकदा पादचारी, सायकलस्वार, दुचाकीस्वारांना धडक देऊन पळून गेलेले वाहन निष्पन्न होत नाही. धडक दिलेले वाहन निश्चित न होऊ शकलेल्या अपघाती मृत्यूंची संख्या १ हजार २४० आहे. हे प्रमाण एकूण अपघातांच्या १०.०५ टक्के आहे.