शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
2
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
3
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
4
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
5
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
6
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
7
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
8
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
9
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
10
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
11
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
12
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
13
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
14
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
15
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
16
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
17
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
18
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
19
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
20
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत

साडेतेरा हजार अपघाती मृत्यू

By admin | Updated: January 16, 2016 01:21 IST

मानवी चुका, रस्ते महामंडळाचे दुर्लक्ष आणि वाहनचालकांचा बेदरकारपणा यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. राज्यात रस्ते अपघातांमध्ये २०१३च्या तुलनेत २०१४मध्ये ५१९

पुणे : मानवी चुका, रस्ते महामंडळाचे दुर्लक्ष आणि वाहनचालकांचा बेदरकारपणा यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. राज्यात रस्ते अपघातांमध्ये २०१३च्या तुलनेत २०१४मध्ये ५१९ (१.१८ टक्के)ने वाढ झाली आहे. त्यात प्राणांतिक अपघातांची संख्या १३ हजार ५२९ वर गेली असल्याची आकडेवारी पोलीस सूत्रांनी दिली. २०१३मध्ये राज्यात रस्ते अपघातांच्या ४३ हजार ८६३घटना घडल्या. या अपघातांत १३ हजार २४५ व्यक्तींना जीव गमवावा लागला. २०१४ मध्ये अपघातांची संख्या ४४ हजार ३८२, तर मृतांची संख्या १३ हजार ५२९ झाली. राज्यात २०१४ मध्ये सर्वाधिक अपघात नाशिक शहरात (३३६७) घडले आहेत. त्याखालोखाल ठाणे ग्रामीण (२४७४), औरंगाबाद शहर (२३४७), नाशिक ग्रामीण (२३३२) आणि पुणे ग्रामीण (२२८६) यांचा क्रमांक आहे. त्यात नाशिकमध्ये १९४, ठाणे ग्रामीणमध्ये ५१२, औरंगाबाद शहरामध्ये २१०, नाशिक ग्रामीणमध्ये ७८७ व पुणे ग्रामीणमध्ये ९८४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)दुचाकीस्वारांना सर्वाधिक धोका१३ हजार ५२९ मृतांपैकी सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचे झाले आहेत. तब्बल ५ हजार ४६ दुचाकीस्वारांना अपघातांमध्ये प्राण गमवावे लागले असून, हे प्रमाण एकूण अपघातांच्या ३७.३० टक्के एवढे आहे. त्याखालोखाल खासगी ट्रक / लॉरी यांच्यामुळे २ हजार १८४ अपघात झाले आहेत. अनेकदा पादचारी, सायकलस्वार, दुचाकीस्वारांना धडक देऊन पळून गेलेले वाहन निष्पन्न होत नाही. धडक दिलेले वाहन निश्चित न होऊ शकलेल्या अपघाती मृत्यूंची संख्या १ हजार २४० आहे. हे प्रमाण एकूण अपघातांच्या १०.०५ टक्के आहे.