शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

ज्या 'नको' त्यांनीच राखली लाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 11:57 IST

भारत चंद्राच्या पुढे मंगळावर जाऊन पोहोचला असला तरी, देशात आजही अशी अनेक घरे आहेत जिथे मुलीचा जन्म नको असतो.

दीनानाथ परब, ऑनलाइन लोकमत 

 
भारत चंद्राच्या पुढे मंगळावर जाऊन पोहोचला असला तरी, देशात आजही अशी अनेक घरे आहेत जिथे मुलीचा जन्म नको असतो. लग्नानंतर पहिला मुलगा जन्माला यावा अशी कित्येक कुटुंबांची इच्छा असते. मुलीच्या जन्माने कुटुंबाचा वंश कसा वाढणार या भावनेतून आजही मुलींना नाकारले जाते. अशी विचारसरणी, मानसिकता ठेवणा-या सर्वांसाठी रिओ ऑलिम्पिकमधील सिंधू, साक्षीची पदकविजेती कामगिरी सणसणीत चपराक आहे. 
 
सिंधू, साक्षी, ललिता, दीपाची रिओ ऑलिम्पिकमधील कामगिरी असामान्य आहे. कारण त्यांनी सर्वोत्तम खेळाडूंना नमवलेच पण त्याचबरोबर प्रतिकुल परिस्थितीशी झगडा देत ऑलिम्पिकमध्ये इथपर्यंत मजल मारली. स्त्रियांच्या मार्गात पुरुष अडथळे आणतात असे या लेखातून सुचवण्याचा अजिबात हेतू नाही. पूर्वीच्या तुलनेत समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन निश्चित बदलला आहे. 
 
पण तो अजून पूर्णपणे बदलेला नाही हा मुद्दा आहे. कारण तो पूर्णपणे बदलला असता तर, लपून-छपून स्त्रीभ्रूण हत्या झाल्या नसत्या. पहिली मुलगी झाली म्हणून पुन्हा मुलासाठी चान्स घेतला गेला नसता. म्हणून सिंधू, साक्षीच्या यशाकडे केवळ खेळाच्या नजरेतून न बघता सामजिक दृष्टीने बघणे आवश्यक आहे. कल्पना करा, १३० कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारताला ऑलिम्पिकमध्ये एकही पदक मिळाले नसते तर, देशाची काय लाज राहिली असती ?. 
 
कास्यंपदक मिळवणा-या साक्षी मलिकने रोहतकच्या ज्या प्रशिक्षण केंद्रात कुस्तीचे धडे गिरवले तिथे सुरुवातीला महिलांच्या प्रवेशाला विरोध झाला होता. प्रशिक्षक आणि सह खेळाडूंनी हा विरोध मोडून काढला. जर त्यावेळी हा विरोध मोडला नसता तर, देशाला आज कास्यंपदक मिळाले असते का ?. ऑलिम्पिकमधली भारताची कामगिरी निश्चित आशादायक किंवा आश्वासक नाही पण सिंधू, साक्षीच्या पदकाने निदान लाज तरी राखली.