शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

ज्या 'नको' त्यांनीच राखली लाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 11:57 IST

भारत चंद्राच्या पुढे मंगळावर जाऊन पोहोचला असला तरी, देशात आजही अशी अनेक घरे आहेत जिथे मुलीचा जन्म नको असतो.

दीनानाथ परब, ऑनलाइन लोकमत 

 
भारत चंद्राच्या पुढे मंगळावर जाऊन पोहोचला असला तरी, देशात आजही अशी अनेक घरे आहेत जिथे मुलीचा जन्म नको असतो. लग्नानंतर पहिला मुलगा जन्माला यावा अशी कित्येक कुटुंबांची इच्छा असते. मुलीच्या जन्माने कुटुंबाचा वंश कसा वाढणार या भावनेतून आजही मुलींना नाकारले जाते. अशी विचारसरणी, मानसिकता ठेवणा-या सर्वांसाठी रिओ ऑलिम्पिकमधील सिंधू, साक्षीची पदकविजेती कामगिरी सणसणीत चपराक आहे. 
 
सिंधू, साक्षी, ललिता, दीपाची रिओ ऑलिम्पिकमधील कामगिरी असामान्य आहे. कारण त्यांनी सर्वोत्तम खेळाडूंना नमवलेच पण त्याचबरोबर प्रतिकुल परिस्थितीशी झगडा देत ऑलिम्पिकमध्ये इथपर्यंत मजल मारली. स्त्रियांच्या मार्गात पुरुष अडथळे आणतात असे या लेखातून सुचवण्याचा अजिबात हेतू नाही. पूर्वीच्या तुलनेत समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन निश्चित बदलला आहे. 
 
पण तो अजून पूर्णपणे बदलेला नाही हा मुद्दा आहे. कारण तो पूर्णपणे बदलला असता तर, लपून-छपून स्त्रीभ्रूण हत्या झाल्या नसत्या. पहिली मुलगी झाली म्हणून पुन्हा मुलासाठी चान्स घेतला गेला नसता. म्हणून सिंधू, साक्षीच्या यशाकडे केवळ खेळाच्या नजरेतून न बघता सामजिक दृष्टीने बघणे आवश्यक आहे. कल्पना करा, १३० कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारताला ऑलिम्पिकमध्ये एकही पदक मिळाले नसते तर, देशाची काय लाज राहिली असती ?. 
 
कास्यंपदक मिळवणा-या साक्षी मलिकने रोहतकच्या ज्या प्रशिक्षण केंद्रात कुस्तीचे धडे गिरवले तिथे सुरुवातीला महिलांच्या प्रवेशाला विरोध झाला होता. प्रशिक्षक आणि सह खेळाडूंनी हा विरोध मोडून काढला. जर त्यावेळी हा विरोध मोडला नसता तर, देशाला आज कास्यंपदक मिळाले असते का ?. ऑलिम्पिकमधली भारताची कामगिरी निश्चित आशादायक किंवा आश्वासक नाही पण सिंधू, साक्षीच्या पदकाने निदान लाज तरी राखली.