शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दत्तक घेणार

By admin | Updated: December 11, 2015 01:52 IST

दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या दडपणाखाली आत्महत्या केलेल्या राज्यातील २५० शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्याची घोषणा आदिशक्ती फाउंडेशनने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

मुंबई : दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या दडपणाखाली आत्महत्या केलेल्या राज्यातील २५० शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्याची घोषणा आदिशक्ती फाउंडेशनने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. फाउंडेशनचे पाच सदस्य या कुटुंबासाठी खर्च करणार असून, बिहारचे माजी राज्यपाल डी.वाय पाटील हे त्यांचे मुख्य पालक असतील.फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार म्हणाले की, ‘आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाना आर्थिक मदत न देता, त्यांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम फाउंडेशनने हाती घेतला आहे. त्यात कोणत्याही कुटुंबाचे कर्ज फेडणार नसून, कुटुंबाला स्वत:च्या पायावर उभे करण्यास फाउंडेशन मदत करेल, जेणेकरून पुन्हा आत्महत्येच्या वाटेला शेतकऱ्याला जाण्याची गरज भासणार नाही. सुरुवातीला मराठवाड्यातील बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील १२५ कुटुंबांना दत्तक घेतले जाईल. त्यानंतर आणखी १२५ कुटुंबाची जबाबदारी फाउंडेशन घेणार आहे. एकूण १८ महिन्यांत तीन टप्प्यांत हा उपक्रम राबवला जाईल. पहिल्या टप्प्यात कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करणे, आजारी व्यक्तींना वैद्यकीय मदत, बियाणे आणि खतांचा पुरवठा करणे, अशा मूलभूत गरजांकडे लक्ष दिले जाईल.’ दुसऱ्या टप्प्यात शेतीशी संबंधित गाय पालन, कुक्कुटपालन असा एखादा जोडधंदा कुटुंबाला सुरू करून दिला जाईल, जेणेकरून पाऊस झाला नाही, तरी कुटुंबाला उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध असेल, तर तिसऱ्या टप्प्यात शेतीला विकसित करण्यासाठी नियोजित आणि शास्त्रीय पद्धतीसह तंत्रज्ञानाची मदत घेऊन दिली जाईल. त्यात कमी पाण्यात कोणती चांगली पिके घेता येईल, याची माहिती दिली जाईल. काही खासगी कंपन्या त्यात मदत करतील.पाच जिल्ह्यांचे पाच पालकया उपक्रमात पाच जिल्ह्यांचे पालकत्व पाच फाउंडेशनच्या पाच सदस्यांनी घेतले आहे. त्यात लातूरचे पालकत्व अभिनेता रितेश देशमुख, परभणीचे पालकत्व कांताराव देशमुख, उस्मानाबादचे पालकत्व शंकरराव बोरकर, बीडचे पालकत्व शिवराम घोडके आणि जालन्याचे पालकत्व कृष्णा अष्टेकर यांनी घेतले आहे. (प्रतिनिधी)