शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : मोठी तयारी!'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
2
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
3
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
4
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
5
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
6
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
7
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
8
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
9
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
11
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
12
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
13
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
14
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
15
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
17
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
18
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
19
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
20
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दत्तक घेणार

By admin | Updated: December 11, 2015 01:52 IST

दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या दडपणाखाली आत्महत्या केलेल्या राज्यातील २५० शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्याची घोषणा आदिशक्ती फाउंडेशनने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

मुंबई : दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या दडपणाखाली आत्महत्या केलेल्या राज्यातील २५० शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्याची घोषणा आदिशक्ती फाउंडेशनने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. फाउंडेशनचे पाच सदस्य या कुटुंबासाठी खर्च करणार असून, बिहारचे माजी राज्यपाल डी.वाय पाटील हे त्यांचे मुख्य पालक असतील.फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार म्हणाले की, ‘आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाना आर्थिक मदत न देता, त्यांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम फाउंडेशनने हाती घेतला आहे. त्यात कोणत्याही कुटुंबाचे कर्ज फेडणार नसून, कुटुंबाला स्वत:च्या पायावर उभे करण्यास फाउंडेशन मदत करेल, जेणेकरून पुन्हा आत्महत्येच्या वाटेला शेतकऱ्याला जाण्याची गरज भासणार नाही. सुरुवातीला मराठवाड्यातील बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील १२५ कुटुंबांना दत्तक घेतले जाईल. त्यानंतर आणखी १२५ कुटुंबाची जबाबदारी फाउंडेशन घेणार आहे. एकूण १८ महिन्यांत तीन टप्प्यांत हा उपक्रम राबवला जाईल. पहिल्या टप्प्यात कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करणे, आजारी व्यक्तींना वैद्यकीय मदत, बियाणे आणि खतांचा पुरवठा करणे, अशा मूलभूत गरजांकडे लक्ष दिले जाईल.’ दुसऱ्या टप्प्यात शेतीशी संबंधित गाय पालन, कुक्कुटपालन असा एखादा जोडधंदा कुटुंबाला सुरू करून दिला जाईल, जेणेकरून पाऊस झाला नाही, तरी कुटुंबाला उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध असेल, तर तिसऱ्या टप्प्यात शेतीला विकसित करण्यासाठी नियोजित आणि शास्त्रीय पद्धतीसह तंत्रज्ञानाची मदत घेऊन दिली जाईल. त्यात कमी पाण्यात कोणती चांगली पिके घेता येईल, याची माहिती दिली जाईल. काही खासगी कंपन्या त्यात मदत करतील.पाच जिल्ह्यांचे पाच पालकया उपक्रमात पाच जिल्ह्यांचे पालकत्व पाच फाउंडेशनच्या पाच सदस्यांनी घेतले आहे. त्यात लातूरचे पालकत्व अभिनेता रितेश देशमुख, परभणीचे पालकत्व कांताराव देशमुख, उस्मानाबादचे पालकत्व शंकरराव बोरकर, बीडचे पालकत्व शिवराम घोडके आणि जालन्याचे पालकत्व कृष्णा अष्टेकर यांनी घेतले आहे. (प्रतिनिधी)