शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दत्तक घेणार

By admin | Updated: December 11, 2015 01:52 IST

दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या दडपणाखाली आत्महत्या केलेल्या राज्यातील २५० शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्याची घोषणा आदिशक्ती फाउंडेशनने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

मुंबई : दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या दडपणाखाली आत्महत्या केलेल्या राज्यातील २५० शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्याची घोषणा आदिशक्ती फाउंडेशनने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. फाउंडेशनचे पाच सदस्य या कुटुंबासाठी खर्च करणार असून, बिहारचे माजी राज्यपाल डी.वाय पाटील हे त्यांचे मुख्य पालक असतील.फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार म्हणाले की, ‘आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाना आर्थिक मदत न देता, त्यांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम फाउंडेशनने हाती घेतला आहे. त्यात कोणत्याही कुटुंबाचे कर्ज फेडणार नसून, कुटुंबाला स्वत:च्या पायावर उभे करण्यास फाउंडेशन मदत करेल, जेणेकरून पुन्हा आत्महत्येच्या वाटेला शेतकऱ्याला जाण्याची गरज भासणार नाही. सुरुवातीला मराठवाड्यातील बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील १२५ कुटुंबांना दत्तक घेतले जाईल. त्यानंतर आणखी १२५ कुटुंबाची जबाबदारी फाउंडेशन घेणार आहे. एकूण १८ महिन्यांत तीन टप्प्यांत हा उपक्रम राबवला जाईल. पहिल्या टप्प्यात कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करणे, आजारी व्यक्तींना वैद्यकीय मदत, बियाणे आणि खतांचा पुरवठा करणे, अशा मूलभूत गरजांकडे लक्ष दिले जाईल.’ दुसऱ्या टप्प्यात शेतीशी संबंधित गाय पालन, कुक्कुटपालन असा एखादा जोडधंदा कुटुंबाला सुरू करून दिला जाईल, जेणेकरून पाऊस झाला नाही, तरी कुटुंबाला उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध असेल, तर तिसऱ्या टप्प्यात शेतीला विकसित करण्यासाठी नियोजित आणि शास्त्रीय पद्धतीसह तंत्रज्ञानाची मदत घेऊन दिली जाईल. त्यात कमी पाण्यात कोणती चांगली पिके घेता येईल, याची माहिती दिली जाईल. काही खासगी कंपन्या त्यात मदत करतील.पाच जिल्ह्यांचे पाच पालकया उपक्रमात पाच जिल्ह्यांचे पालकत्व पाच फाउंडेशनच्या पाच सदस्यांनी घेतले आहे. त्यात लातूरचे पालकत्व अभिनेता रितेश देशमुख, परभणीचे पालकत्व कांताराव देशमुख, उस्मानाबादचे पालकत्व शंकरराव बोरकर, बीडचे पालकत्व शिवराम घोडके आणि जालन्याचे पालकत्व कृष्णा अष्टेकर यांनी घेतले आहे. (प्रतिनिधी)