शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

‘त्या’ मुलांसाठी ‘वारांगना सखी’चा वसा

By admin | Updated: June 9, 2015 02:50 IST

वेश्यांची मुले चोरी, गुन्हेगारीसारख्या विळख्यात अडकू नये नयेत आणि त्यांचे भवितव्य लखलखीत व्हावे यासाठी येथील वारांगना सखी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.

विश्वास पाटील, कोल्हापूरवेश्यांची मुले चोरी, गुन्हेगारीसारख्या विळख्यात अडकू नये नयेत आणि त्यांचे भवितव्य लखलखीत व्हावे यासाठी येथील वारांगना सखी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. गरोदर असल्यापासूनच देहविक्रय करणाऱ्या महिलांचे प्रबोधन करून ही मुले चांगल्या स्वयंसेवी संस्थांमार्फत समाजाच्या मुख्य प्रवाहात यावीत, असे प्रयत्न सुरू केले आहेत.कोल्हापुरात शरीरविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांचे संस्थेकडे अधिकृत नोंदणी झाली आहे. यातील बहुतांश विवाहित आहेत. कौटुंबिक वादातून कुठेच आधार न मिळाल्यास त्या नाइलाजाने या व्यवसायात येतात. भाड्याने खोली घेऊन राहतात. पुरुषांसमवेतच्या संबंधातून जन्माला येणारी मुले सांभाळण्याची जबाबदारी त्या महिलांवरच असते.ही मुले आईसोबतच ‘वेश्येची मुले’ हा शिक्का घेऊन वाढतात व पुन्हा गुन्हेगारीच्या चक्रात येतात. मुली असतील तर त्या पुन्हा याच व्यवसायात येतात. हे चक्र भेदायचे असेल तर मुलांना आईपासून लहानपणीच तोडले पाहिजे, असा विचार करून या संघटनेने पाऊल टाकले आहे.वेश्या गरोदर असल्यापासूनच संघटना त्यांची देखभाल करीत आहे. एखाद्या महिलेस मूल झाल्यावर कोल्हापुरातील स्वयंसेवी संस्थांमध्ये दाखल करून तिथून त्याचे चांगल्या कुटुंबात दत्तक प्रक्रियेमार्फत कसे पुनर्वसन करता येईल, याच्या प्रयत्नात संघटना असते. वेश्यानां अडचणीच्या काळात संस्था मदत करत असल्याने हा विषय चर्चेत आला.चाळीस-बेचाळीस वयानंतर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला रोज पोट भरण्याएवढेही पैसे मिळत नाहीत. अशावेळी पदरी असलेल्या मुलांच्या संगोपनाचे काय करायचे हा मोठा प्रश्न असतो. या मुलांचे आयुष्य चुरगळले जाऊ नये यासाठीच आम्ही संघटनेच्या माध्यमातून या महिलांमध्ये प्रबोधन करून मुलांना दत्तक देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.- शारदा यादव, अध्यक्षा, वारांगना सखी संघटना, कोल्हापूर