शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

ठाणे जिल्ह्यात सहा महिन्यात 25 बालमृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 21:24 IST

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी, दुर्गम भागात सहा महिन्याच्या कालावधीत 25 बालमृत्यू झाले.

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 24 - जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी, दुर्गम भागात सहा महिन्याच्या कालावधीत  25 बालमृत्यू झाले. यातील 15 बालमृत्यू जून महिन्यात झाले आहेत. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. जिल्ह्यात चांगले काम करा, अन्यथा निघून जा. या पुढे कोठेही बालमृत्यू होताच संबंधीत बीडीओ, वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचा:यांची जिल्ह्यातून तडकाफडकी  करण्याचे आदेश ही त्यांनी प्रशासनाला दिले.

   
येथील समिती सभागृहात गाभा समितीची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी प्राप्त झालेल्या अहवालावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून अधिका:यांवर ताशेरे ओढले आहे. सहा महिन्याच्या कालावधीत दगावलेल्या 25 बालकांपैकी एक वर्षापर्यतचे 22 बालके असून त्यात अर्भकमृत्यूंचाही समावेश आहे. उर्वरित तीन बालके पाच वर्षार्पयतची आहेत. दगावलेल्या या बालकांपैकी  सर्वाधिक दहा बालके शहापूर तालुक्यातील आहेत. यामधील आठ बालके  क् ते 1 वर्षातील आहेत, तर दोन पाच वर्ष वयोगटार्पयतची आहेत. याशिवाय सात मुरबाड तालुक्यात दगावले आहेत. भिवंडी तालुक्यातील पाच बालकांचा समावेश असून कल्याण तालुक्यामधील दोन बालके तर अंबरनाथमधील एका बालकाचा समावेश आहे. या 25 बालकांमध्ये 15 बालके जून महिन्यात दगावले आहेत. 
   
केवळ आकडेवारी देऊन चालणार नाही. काम करणा-या अधिका-यांनीच जिल्ह्यात राहायचे. या पुढे ज्या ठिकाणी बालमृत्यू होईल तेथील बीडीओ, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचा-यांची त्यास दिवशी बदली करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. कुपोषण व बालमृत्यूच्या कारणांचा शोध घ्या, पालकांच्या रोजगार संबंधीत जॉब कार्डाची तहसीलदारांनी तपासणी करा, तीन वर्षात किती मनरेगाचा कोठे किती खर्च झाला शोध घ्या, पालकाना अन्नधान्याचा सुरळीत पुरवठा होतो की त्यात घोळ आहे, याचा शोध घ्या. कुपोषीत बालके दत्तक घेणा-या अधिका-यांनी संबंधीत बालकांची काय दखल घेतली, किती वेळा भेट दिली, याविषयीचे हेल्थकार्ड तपासणी करा. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कुपोषीत बालके, त्यांचे पालक आदींच्या त्वरीत बैठका लावून कारणांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे,   जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सोनावणो, आदींसह गाभासमितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.