शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

दररोजची तीस लाखांची उलाढाल ठप्प

By admin | Updated: May 21, 2015 00:08 IST

यंत्रमाग कारखान्यांवर परिणाम नाही : किमान वेतनाच्या मागणीसाठी इचलकरंजीतील ७० टक्के सायझिंग कारखाने बंद

इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या फेररचनेप्रमाणे वेतन मिळण्याच्या मागणीसाठी मुंबई येथे मंत्रालयावर आज, बुधवारी मोर्चा असताना सायझिंग कामगार संपावर गेले असून, शहरातील शंभरहून अधिक सायझिंग कारखाने बंद पडले आहेत. तर या आंदोलनाचा यंत्रमाग कारखान्यांवर फारसा परिणाम झाला नसल्याने येथील वस्त्रोद्योगात आश्चर्य व्यक्त होत आहे.सायझिंग कारखाने बंद पडल्याने दररोज पाच हजार सूत बिमांचे उत्पादन ठप्प झाले आहे. तर बाजारातील रोजची तीस लाख रुपयांची उलाढाल थंडावली आहे. आणखीन दोन दिवस सायझिंग कारखाने सुरू होणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे.सन १९८६ नंतर यंत्रमाग कामगार किमान वेतनाची फेररचना शासनाने जाहीर केली नव्हती. परिणामी २९ वर्षे या क्षेत्रातील अनेक कामगार संघटनांनी विविध आंदोलने केली. अखेर लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने प्रा.ए.बी. पाटील यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. न्यायाधीश मोहीत शहा व न्या. कुलाबावाला यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांनी २ फेब्रुवारी २०१५ पूर्वी यंत्रमाग कामगार किमान वेतनाची फेररचना ३० जानेवारीपूर्वी करावी, असे आदेश दिले. त्याप्रमाणे २९ जानेवारीला शासनाच्या उद्योग व कामगार मंत्रालयाने यंत्रमाग कामगार किमान वेतनाची फेररचना जाहीर केली.शासनाने किमान वेतनाची फेररचना जाहीर करताना राज्यात महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण अशी तीन परिमंडले व कुशल, अर्धकुशल व अकुशल अशी कामगारांची वर्गवारी जाहीर केली. त्यासाठी महापालिका क्षेत्रात नऊ हजार ते दहा हजार शंभर, नगरपालिका क्षेत्रात साडेआठ हजार ते साडेनऊ हजार आणि ग्रामीण क्षेत्रासाठी साडेसात हजार ते साडेआठ हजार असे किमान वेतन जाहीर करण्यात आले. या फेररचनेप्रमाणे शासनाने यंत्रमाग कारखानदारांना वेतन देण्यास भाग पाडावे, यासाठी सुद्धा राज्यातील यंत्रमाग केंद्रांमधून नुकतेच मोर्चे, घेराव अशी आंदोलने व कामगार परिषदा झाल्या. आज याच मागणीसाठी मुंबई येथे आझाद मैदानावर राज्यातील यंत्रमाग कामगारांचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.यंत्रमाग कामगारांच्या मोर्चासाठी इचलकरंजीतील सायझिंग क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने गेले आहेत. काल, मंगळवारपासून ७० टक्के सायझिंग कारखाने बंद पडले आहेत. या मोर्चाचा यंत्रमाग कारखान्यांवर फारसा परिणाम झाला नसल्याने यंत्रमाग कामगारांनी का प्रतिसाद दिला नाही, याचेच आश्चर्य येथे व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)दहा कोटींच्या कापडाची वाहतूक बंद होण्याच्या मार्गावरइचलकरंजीत तयार होणाऱ्या यंत्रमाग कापडापैकी सुमारे दहा कोटी रुपयांचे कापड दररोज बालोत्रा (राजस्थान) येथे पुढील प्रक्रियेसाठी जाते. मात्र, बालोत्रा येथील कापडावर प्रक्रिया करणारे प्रोसेसर्स कारखाने प्रदूषणामुळे बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी, रोजचे जाणारे पंधरा ट्रक कापडाची वाहतूक बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज शहरातील कापड बाजारात पॉपलीन व मलमल कापडाचे भाव एकदमच उतरल्याने खळबळ उडाली.