शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

थरांची स्पर्धा नाही पण जिद्दीने फोडली ‘त्यांनी’ हंडी

By admin | Updated: August 22, 2016 03:54 IST

राधा-कृष्णाची वेशभूषा केलेली विशेष दिव्यांग मुले, थरांची स्पर्धा नसली तरी हंडी फोडण्याची जिद्द

ठाणे : ऊनपावसाचा सुरू असलेला खेळ, हंडी फोडण्याच्या जिद्दीने मैदानात जमलेली आणि त्यांच्यातीलच काहींनी राधा-कृष्णाची वेशभूषा केलेली विशेष दिव्यांग मुले, थरांची स्पर्धा नसली तरी हंडी फोडण्याची जिद्द, हंडी फोडल्यावर ढाक्कुमाकुमच्या तालावर थिरकताना त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा एक आगळावेगळा आनंद आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जमलेले प्रेक्षक, असा उत्साही माहोल रंगला होता तो शुक्रवारी ठाण्यातील शिवाजी मैदानात. निमित्त होते ते हिंदुहृद्यसम्राट हृद्यस्पर्शी अवयवदान दहीहंडी उत्सवाचे.बाळगोपाळ मित्र मंडळाच्या माध्यमातून विलास ढमाले हे दहीहंडी महोत्सव आयोजित करतात. यंदाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या हस्ते हंडीचे पूजन करण्यात आले. यावेळी खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते अनंत तरे, नगरसेविका पूजा वाघ, आयोजक विलास ढमाले उपस्थित होते. ठाण्याबरोबर अंबरनाथ, डोंबिवली, विक्र ोळी, मालाड, पुणे येथील मतीमंद, गतीमंद, अस्थिव्यंग, अंध, कर्णबधीर, मूकबधीर अशा एकूण १६ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येक शाळेच्या मुलांना हंडी लावून फोडण्याचा मान मिळाला. विशेष म्हणजे येथे थराची स्पर्धा नसली तरी प्रत्येक शाळेची मुले हंडी फोडण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करत होते. यावेळी उदय आऊटडोअर अ‍ॅडव्हेन्चरच्यावतीने अभय शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्सीवर चढणे-उतरणे यांची प्रात्यिक्षके करून दाखविण्यात आली. उपस्थित काही मुलांनीही यात सहभाग नोंदवला. याचदरम्यान अवयवदान आणि देहदानाचे मिळून १३४ फॉर्म भरण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. सहभागी सर्व शाळांना समान रकमेचे पारितोषिक आणि चषक देण्यात आला. >सहानुभूतीपेक्षा जिद्द निर्माण करा - प्रकाश आमटेबाबांनी सुरूवातीपासूनच अशा दिव्यांग लोकांना एकत्र केले. मी आणि माझा भाऊ विकास आमचे बालपण अशाच माणसांमध्ये गेले आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला अशा विशेष मुलांमध्ये येऊन आपल्या घरी आलो असे वाटतयं, असे मत डॉ.प्रकाश आमटे यांनी व्यक्तकेले. अशा माणसांसाठी समाजाने सहानुभूती दाखविण्यापेक्षा त्यांच्यात जिद्द निर्माण केली पाहिजे. त्यांच्या उद्धारासाठी आपण सहकार्य केले पाहिजे. तर कार्यक्रम कधीही छोटा किंवा मोठा नसतो. तर जिथे जाऊन आपल्याला मोठा आनंद, समाधान मिळेल अशा ठिकाणी आम्ही जातो, असे ते म्हणाले. तर अवयवदान ही मोठी चळवळ असून अवयवांचे दान करून इतरांचे जीवन वाचवले पाहिजे. त्यांच्या जीवनात आपण आनंद फुलवला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.