शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

थरांची स्पर्धा नाही पण जिद्दीने फोडली ‘त्यांनी’ हंडी

By admin | Updated: August 22, 2016 03:54 IST

राधा-कृष्णाची वेशभूषा केलेली विशेष दिव्यांग मुले, थरांची स्पर्धा नसली तरी हंडी फोडण्याची जिद्द

ठाणे : ऊनपावसाचा सुरू असलेला खेळ, हंडी फोडण्याच्या जिद्दीने मैदानात जमलेली आणि त्यांच्यातीलच काहींनी राधा-कृष्णाची वेशभूषा केलेली विशेष दिव्यांग मुले, थरांची स्पर्धा नसली तरी हंडी फोडण्याची जिद्द, हंडी फोडल्यावर ढाक्कुमाकुमच्या तालावर थिरकताना त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा एक आगळावेगळा आनंद आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जमलेले प्रेक्षक, असा उत्साही माहोल रंगला होता तो शुक्रवारी ठाण्यातील शिवाजी मैदानात. निमित्त होते ते हिंदुहृद्यसम्राट हृद्यस्पर्शी अवयवदान दहीहंडी उत्सवाचे.बाळगोपाळ मित्र मंडळाच्या माध्यमातून विलास ढमाले हे दहीहंडी महोत्सव आयोजित करतात. यंदाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या हस्ते हंडीचे पूजन करण्यात आले. यावेळी खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते अनंत तरे, नगरसेविका पूजा वाघ, आयोजक विलास ढमाले उपस्थित होते. ठाण्याबरोबर अंबरनाथ, डोंबिवली, विक्र ोळी, मालाड, पुणे येथील मतीमंद, गतीमंद, अस्थिव्यंग, अंध, कर्णबधीर, मूकबधीर अशा एकूण १६ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येक शाळेच्या मुलांना हंडी लावून फोडण्याचा मान मिळाला. विशेष म्हणजे येथे थराची स्पर्धा नसली तरी प्रत्येक शाळेची मुले हंडी फोडण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करत होते. यावेळी उदय आऊटडोअर अ‍ॅडव्हेन्चरच्यावतीने अभय शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्सीवर चढणे-उतरणे यांची प्रात्यिक्षके करून दाखविण्यात आली. उपस्थित काही मुलांनीही यात सहभाग नोंदवला. याचदरम्यान अवयवदान आणि देहदानाचे मिळून १३४ फॉर्म भरण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. सहभागी सर्व शाळांना समान रकमेचे पारितोषिक आणि चषक देण्यात आला. >सहानुभूतीपेक्षा जिद्द निर्माण करा - प्रकाश आमटेबाबांनी सुरूवातीपासूनच अशा दिव्यांग लोकांना एकत्र केले. मी आणि माझा भाऊ विकास आमचे बालपण अशाच माणसांमध्ये गेले आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला अशा विशेष मुलांमध्ये येऊन आपल्या घरी आलो असे वाटतयं, असे मत डॉ.प्रकाश आमटे यांनी व्यक्तकेले. अशा माणसांसाठी समाजाने सहानुभूती दाखविण्यापेक्षा त्यांच्यात जिद्द निर्माण केली पाहिजे. त्यांच्या उद्धारासाठी आपण सहकार्य केले पाहिजे. तर कार्यक्रम कधीही छोटा किंवा मोठा नसतो. तर जिथे जाऊन आपल्याला मोठा आनंद, समाधान मिळेल अशा ठिकाणी आम्ही जातो, असे ते म्हणाले. तर अवयवदान ही मोठी चळवळ असून अवयवांचे दान करून इतरांचे जीवन वाचवले पाहिजे. त्यांच्या जीवनात आपण आनंद फुलवला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.