शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
8
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
9
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
10
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
11
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
12
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
13
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
14
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
15
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
16
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
17
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
18
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
19
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
20
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"

राजेगाव परिसर तहानलेला

By admin | Updated: August 26, 2016 01:14 IST

भूजलपातळी खोल गेल्याने विहिरी व कूपनलिका अजूनही कोरड्याच असल्याचे भयानक चित्र पाहायला मिळत आहे.

राजेगाव : आॅगस्ट महिना संपत आला, तरी दौंड तालुक्याचा पूर्व भाग दमदार पावसाअभावी अद्यापही कोरडाच असून, या परिसरातील भूजलपातळी खोल गेल्याने विहिरी व कूपनलिका अजूनही कोरड्याच असल्याचे भयानक चित्र पाहायला मिळत आहे.पाटबंधारे विभागाच्या वसाहतींमध्ये असलेल्या पर्जन्यमापक यंत्रांनुसार आजअखेर दौंडमध्ये १४६ मिलिमीटर, बोरिबेल १५९ मिलिमीटर, रावणगाव २११ मिलिमीटर, भिगवण स्टेशन (राजेगाव परिसर) येथे २४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिशय कमी प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याची माहिती बिनतारी यंत्रचालक (दौंड) पोपटराव काळे यांनी दिली.राज्यात मागील महिन्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडून अनेक नद्या दुथडी भरून वाहिल्या, तर काही नद्यांना पूर येऊन पूल वाहून गेले. पण, या भागावर वरुणराजाने आपली वक्रदृष्टी का दाखवली? असा प्रश्न येथील बळीराजाला राहून राहून सतावत आहे. या परिसरातील पिकांसाठी तीन- चार मोठ्या पावसांची गरज असून, जर पाऊस नाही पडला तर पूर्व भागातील शेतकरीवर्गाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.उजनी धरणात ६० टक्के पाणीसाठा झाला असल्याने उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या खानवटे, राजेगाव, नायगाव वाटलूज, मलठण, हिंगणीबेर्डी, शिरापूर इत्यादी गावांतील नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या परिसराठी खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांकडून मिळाली. (वार्ताहर)>टेल टू हेड पद्धतीने पाणी सोडायाबाबत शेतकरी एन. डी. गुणवरे व संदीप दसवडकर यांनी सांगितले, की पूर्व भागातील शेतकऱ्यांनी कोरडवाहू क्षेत्रात घेतलेली मका, सोयाबीन, मूग, उडीद, तूर ही शेतातील उभी पिके जळण्याच्या मार्गावर असून, कमी पावसाअभावी धोक्यात आली आहेत. या पिकांची वाढ खुंटली आहे. शेतकरीवर्गाला वाचविण्यासाठी खडकवासला कालव्याला ’ पाणी सोडावे.