शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

राजेगाव परिसर तहानलेला

By admin | Updated: August 26, 2016 01:14 IST

भूजलपातळी खोल गेल्याने विहिरी व कूपनलिका अजूनही कोरड्याच असल्याचे भयानक चित्र पाहायला मिळत आहे.

राजेगाव : आॅगस्ट महिना संपत आला, तरी दौंड तालुक्याचा पूर्व भाग दमदार पावसाअभावी अद्यापही कोरडाच असून, या परिसरातील भूजलपातळी खोल गेल्याने विहिरी व कूपनलिका अजूनही कोरड्याच असल्याचे भयानक चित्र पाहायला मिळत आहे.पाटबंधारे विभागाच्या वसाहतींमध्ये असलेल्या पर्जन्यमापक यंत्रांनुसार आजअखेर दौंडमध्ये १४६ मिलिमीटर, बोरिबेल १५९ मिलिमीटर, रावणगाव २११ मिलिमीटर, भिगवण स्टेशन (राजेगाव परिसर) येथे २४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिशय कमी प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याची माहिती बिनतारी यंत्रचालक (दौंड) पोपटराव काळे यांनी दिली.राज्यात मागील महिन्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडून अनेक नद्या दुथडी भरून वाहिल्या, तर काही नद्यांना पूर येऊन पूल वाहून गेले. पण, या भागावर वरुणराजाने आपली वक्रदृष्टी का दाखवली? असा प्रश्न येथील बळीराजाला राहून राहून सतावत आहे. या परिसरातील पिकांसाठी तीन- चार मोठ्या पावसांची गरज असून, जर पाऊस नाही पडला तर पूर्व भागातील शेतकरीवर्गाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.उजनी धरणात ६० टक्के पाणीसाठा झाला असल्याने उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या खानवटे, राजेगाव, नायगाव वाटलूज, मलठण, हिंगणीबेर्डी, शिरापूर इत्यादी गावांतील नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या परिसराठी खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांकडून मिळाली. (वार्ताहर)>टेल टू हेड पद्धतीने पाणी सोडायाबाबत शेतकरी एन. डी. गुणवरे व संदीप दसवडकर यांनी सांगितले, की पूर्व भागातील शेतकऱ्यांनी कोरडवाहू क्षेत्रात घेतलेली मका, सोयाबीन, मूग, उडीद, तूर ही शेतातील उभी पिके जळण्याच्या मार्गावर असून, कमी पावसाअभावी धोक्यात आली आहेत. या पिकांची वाढ खुंटली आहे. शेतकरीवर्गाला वाचविण्यासाठी खडकवासला कालव्याला ’ पाणी सोडावे.