शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
4
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
5
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
6
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
7
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
8
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
9
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
10
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
11
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
12
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
13
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
14
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
15
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
16
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
17
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
18
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
19
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
20
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं

राजेगाव परिसर तहानलेला

By admin | Updated: August 26, 2016 01:14 IST

भूजलपातळी खोल गेल्याने विहिरी व कूपनलिका अजूनही कोरड्याच असल्याचे भयानक चित्र पाहायला मिळत आहे.

राजेगाव : आॅगस्ट महिना संपत आला, तरी दौंड तालुक्याचा पूर्व भाग दमदार पावसाअभावी अद्यापही कोरडाच असून, या परिसरातील भूजलपातळी खोल गेल्याने विहिरी व कूपनलिका अजूनही कोरड्याच असल्याचे भयानक चित्र पाहायला मिळत आहे.पाटबंधारे विभागाच्या वसाहतींमध्ये असलेल्या पर्जन्यमापक यंत्रांनुसार आजअखेर दौंडमध्ये १४६ मिलिमीटर, बोरिबेल १५९ मिलिमीटर, रावणगाव २११ मिलिमीटर, भिगवण स्टेशन (राजेगाव परिसर) येथे २४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिशय कमी प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याची माहिती बिनतारी यंत्रचालक (दौंड) पोपटराव काळे यांनी दिली.राज्यात मागील महिन्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडून अनेक नद्या दुथडी भरून वाहिल्या, तर काही नद्यांना पूर येऊन पूल वाहून गेले. पण, या भागावर वरुणराजाने आपली वक्रदृष्टी का दाखवली? असा प्रश्न येथील बळीराजाला राहून राहून सतावत आहे. या परिसरातील पिकांसाठी तीन- चार मोठ्या पावसांची गरज असून, जर पाऊस नाही पडला तर पूर्व भागातील शेतकरीवर्गाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.उजनी धरणात ६० टक्के पाणीसाठा झाला असल्याने उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या खानवटे, राजेगाव, नायगाव वाटलूज, मलठण, हिंगणीबेर्डी, शिरापूर इत्यादी गावांतील नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या परिसराठी खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांकडून मिळाली. (वार्ताहर)>टेल टू हेड पद्धतीने पाणी सोडायाबाबत शेतकरी एन. डी. गुणवरे व संदीप दसवडकर यांनी सांगितले, की पूर्व भागातील शेतकऱ्यांनी कोरडवाहू क्षेत्रात घेतलेली मका, सोयाबीन, मूग, उडीद, तूर ही शेतातील उभी पिके जळण्याच्या मार्गावर असून, कमी पावसाअभावी धोक्यात आली आहेत. या पिकांची वाढ खुंटली आहे. शेतकरीवर्गाला वाचविण्यासाठी खडकवासला कालव्याला ’ पाणी सोडावे.