शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

तिसरी आघाडी, नव्हे आता ‘समिती’

By admin | Updated: October 4, 2014 01:31 IST

राज्यातील पुरोगामी, डाव्या व रिपब्लिकन चळवळीत पक्ष व संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या आघाडीला ‘समिती’ असे नाव आहे.

मुंबई : राज्यातील पुरोगामी, डाव्या व रिपब्लिकन चळवळीत पक्ष व संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या आघाडीला ‘समिती’ असे नाव आहे. ही समिती राज्यातील सर्व जागा लढणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस एस.व्ही. जाधव यांनी दिली.
महाराष्ट्र लोकशाही डावी आघाडी व संविधान मोर्चा या 18 पक्षांच्या ‘समिती’ने प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ यांना सोबत घेत 288 जागा लढण्याचा निर्धार केला आहे. त्यात आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला 125 जागा सोडण्यात आल्या असून समितीने 163 जागांवर लढण्याचे निश्चित केल्याचे जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, समितीमधील शेकाप, शिवराज्य पक्ष आणि सत्यशोधक ओबीसी पक्षाला 55 जागा सोडण्यात आल्या आहेत. यामधील शिवराज्य पक्ष व सत्यशोधक ओबीसी पक्षाने शेकापच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर रिपब्लिकन सेनेला 35, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 35, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला 2क्, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) 9 आणि जनता दल (से) ला 9 जागांचे वाटप करण्यात आले आहे.
‘केवळ मुख्यमंत्री कोणाचा या मुद्दय़ावर महायुती फुटल्याचे सर्व जनतेने पाहिले आहे. मोदी लाट आता ओसरली असून चार महिन्यांत लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. आघाडीचा भ्रष्टाचार आणि महायुतीने केलेल्या भ्रमनिरासामुळे लोक नक्कीच तिस:या आघाडीला पसंती देतील, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.
दरम्यान, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर म्हणाले, ‘समितीत सामुदायिक नेतृत्व होणार असून सर्व नेते एकमेकांच्या प्रचारसभेत सामील होतील.’ या वेळी भाकपचे प्रकाश रेड्डी, शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष सुधीर सावंत आणि अन्य नेतेही उपस्थित होते. (प्रतिनिधी)