शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवभारत निर्मितीचा गांभीर्याने विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2017 01:09 IST

अनिल काकोडकर : शिवाजी विद्यापीठाच्या ५३ व्या दीक्षान्त समारंभात सोनाली बेकनाळकर, स्नेहल चव्हाण यांचा गौरव

कोल्हापूर : भविष्यातील नवभारताच्या निर्मितीसाठी गांभीर्यपूर्वक विचार करून नवसंशोधन, तंत्रज्ञान अशा आवश्यक बाबींचा वेध घेऊन त्याअनुषंगाने आपली भूमिका, कार्यशैली युवावर्गाने ठरवावी, असे आवाहन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी शुक्रवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या ५३ व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. विद्यापीठातील लोककला केंद्रातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. यावेळी डॉ. काकोडकर यांच्या हस्ते कोल्हापुरातील सोनाली बेकनाळकर या विद्यार्थिनीला सन २०१५-१६ मध्ये कला, क्रीडा, बौद्धिक या क्षेत्रांसह एनसीसी, एनएसएस यांतील गुणवत्ताप्राप्त तसेच व्यक्तिमत्त्व, वर्तणूक व नेतृत्वगुण याबाबतचे विद्यापीठाचे सर्वसाधारण कौशल्यासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते साताऱ्यातील स्नेहल चव्हाण हिला एम. ए. संस्कृत विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल ‘कुलपती पदक’ देऊन गौरविण्यात आले. शानदार, उत्साही वातावरणात पार पडलेल्या या दीक्षान्त समारंभात ४९ हजार ९५१ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. डॉ. काकोडकर म्हणाले, जगाच्या सर्वांगीण विकासासाठी कसे योगदान देता येईल याचा विचार युवा वर्गाने करावा. या विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी देश, समाज, उद्योग आदींच्या पलीकडे जाऊन कार्यरत राहावे. उच्चशिक्षणातील बदलती क्षितिजे काबीज करण्यासाठी त्यांनी तत्पर राहावे. कार्यक्रमात कुलगुरू डॉ. शिंदे यांनी वार्षिक अहवाल सादर केला तसेच पत्रकारिता विभागातील ग. गो. जाधव अध्यासन स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले, नव्या जगात व युगात पदवीधर यापुढे प्रवेश करणार आहेत. हे नवे जग वेगवान, जागतिक स्पर्धेचे आहे. त्यात टिकून राहण्यासाठी पदवीसह जीवन आणि तंत्रकौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी दुपारी अडीचच्या सुमारास परीक्षा नियंत्रक महेश काकडे हे दीक्षान्त मिरवणुकीने ज्ञानदंड घेऊन कार्यक्रमस्थळी आले. कार्यक्रमास ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. शिवराम भोजे, माजी कुलगुरु डॉ. एस. एच. पवार, प्रा. एन. व्ही. नलवडे, शिरीष पवार, आर. नारायणा, पी. एस. पाटणकर, एस. एच. सावंत, पी. एस. पाटील, प्राचार्य हिंदुराव पाटील, डॉ. रूपा शहा, उदय गायकवाड, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, आदी उपस्थित होते. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी पदव्यांचे वाचन केले. आलोक जत्राटकर, आदित्य मैंदर्गीकर, नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)ग्रामीण विकासाचा सुधारित आराखडा उत्पादकतेच्या जोरावर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांचे उत्पन्न शहरी भागाच्या निम्मे असल्याचे डॉ. काकोडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, अर्थव्यवस्थेमध्ये मोठे योगदान असणाऱ्या ग्रामीण कुटुंबांपैकी केवळ ९.७ टक्के कुटुंबांना नियमित वेतन मिळते; तर ५६ टक्के नागरिक भूमिहीन आहेत. जगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी ग्रामीण विकासाचा सुधारित प्रारूप आराखडा तयार करावा लागेल. ग्रामीण, दुर्गम भागांतील नागरिकांच्या गरजा भागविण्यासाठी कमी खर्चात उच्च दर्जाचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आपल्या देशासह इतर विकसनशील राष्ट्रांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.डॉ. काकोडकर म्हणाले...नवउद्योजकता निर्माण करणारी पिढी शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांनी घडवावी.युवकांनी रोजगार मागणारे नको, तर रोजगार निर्माते बनावे.उच्च शिक्षणातील अध्ययन प्रक्रियेत संशोधनाला पूरक वातावरण, दर्जेदार कौशल्यनिर्मिती, मूलभूत मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी पोषक वातावरणाचा अभावतंत्रज्ञानासाठी आपल्याला अन्य देशांवर अवलंबून राहावे लागते. ते अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे. क्षणचित्रे२२ हजार ३३७ स्नातकांनी स्वीकारली प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी. विविध विद्याशाखांतील एकूण २५८ संशोधक विद्यार्थिनींना पीएच. डी. व एम. फिल. पदवी प्रदान.विविध गुणवत्ताप्राप्त ८७ विद्यार्थ्यांचा व्यासपीठावर पारितोषिके देऊन सन्मान.दीक्षान्त समारंभाचे थेट प्रक्षेपण.