शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
3
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
4
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
5
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
6
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
7
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
8
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
9
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
10
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
11
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
12
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
13
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
15
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
16
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
17
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
18
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
19
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
20
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...

कर्जमाफीचा विचार करा

By admin | Updated: May 6, 2016 05:37 IST

राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांचे पीककर्ज पूर्णपणे माफ करणे शक्य आहे का, अशी विचारणा गुरुवारी उच्च न्यायालयाने औरंगाबाद व मुंबई येथे झालेल्या

औरंगाबाद/ मुंबई : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांचे पीककर्ज पूर्णपणे माफ करणे शक्य आहे का, अशी विचारणा गुरुवारी उच्च न्यायालयाने औरंगाबाद व मुंबई येथे झालेल्या निरनिराळ्या याचिकांवरील सुनावणीत केली. शिवाय, या वर्षी नवीन पीककर्ज देताना मागील थकबाकीबाबत आग्रह धरू नये, अशी अपेक्षाही न्यायालयाने व्यक्त केली. याखेरीज सोलापूरच्या उजनी धरणातून मराठवाड्याची तहान भागवण्याचा विचार करावा, अशी सूचना न्यायालयाच्या मुंबई येथील खंडपीठाने केली. राज्यातील दुष्काळाचा विचार करून शासनाने शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे, अशी विनंती करणारी याचिका माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी तर वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीत न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. संगीतराव एस. पाटील यांनी शेतकऱ्यांचे पूर्ण पीक कर्ज माफ करणे शक्य आहे काय, अशी विचारणा केली. त्यावर सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी सरकारने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहिती सादर केली. मुंबई उच्च न्यायालयात आयपीएल व कुंभमेळाव्यातील पाण्याच्या उधळपट्टी संदर्भात लोकसत्ता मूव्हमेंट व प्रा. एच. एम. देसरडा यांनी उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र जनहित याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने पुढील दीड महिना दुष्काळाशी कसा सामना करणार, अशी विचारणा करत राज्य सरकारला याबाबत काय उपाययोजना आखल्या आहेत, याची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. तसेच दुष्काळ का जाहीर केला नाही? अशीही विचारणा सरकारकडे केली होती.गुरुवारच्या सुनावणीत महाअधिवक्ता रोहित देव यांनी केंद्र सरकारच्या दुष्काळ मॅन्युअल २००९ चा संदर्भ देत राज्य सरकारला दुष्काळ जाहीर करणे बंधनकारक नाही, असे खंडपीठाला सांगितले. मात्र, ज्या ठिकाणी ‘दुष्काळसदृश गावे’ असे म्हटले आहे त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर केला आहे, असेच समजण्यात येते, असेही त्यांनी सांगितले.राज्यातील प्रत्येक नागरिकाला किमान २० ते ४० लिटर पाणी मिळेल. दररोज मिळाले नाही तरी काही दिवसांआड तेवढे पाणी पुरवण्यात येईल. शिवाय सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज माफ केले आहे. आता खरीप पिकासाठीही राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्ज देईल आणि त्याचे अर्धे व्याज सरकार भरणार आहे, असे अ‍ॅड. देव यांनी सांगितले.(प्रतिनिधी)पाण्याची उधळपट्टी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंधन घालावे!टँकरचे पाणी गरजूंनाच मिळावे, पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी टँकरवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवण्याची व टँकरमधील पाण्यामुळे रोगराई होऊ नये, यासाठी इंडस्ट्रियल वॉटर प्युरिफायरचा वापर करावा, अशी मागणी ‘न्यायालयीन मित्र’ ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी खंडपीठाकडे केली. त्यांचे म्हणणे ऐकून घेत खंडपीठाने राज्य सरकारला याही सूचनांवर विचार करण्यास सांगितले. तसेच मराठवाडा व विदर्भात पाणीटंचाई असल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे व आवश्यकता भासल्यास पाण्याची उधळपट्टी होणाऱ्या खासगी व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधन घालावे, असे निर्देश खंडपीठाने दिले. नाशिक-नगरच्या धरणांतूनही पाणी सोडाजायकवाडी आणि नाशिक-नगरच्या धरणांतून पाणी सोडण्यासंदर्भात अन्य एका खंडपीठापुढे याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाली असून, निकाल राखून ठेवला आहे. मराठवाड्याला पाण्याची आवश्यकता भासल्यास सरकार नाशिक-नगरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी अर्ज करेल, अशी माहिती महाअधिवक्ता रोहित देव व मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी आज न्यायालयात दिली. जायकवाडी धरणात २ टक्केच पाणी शिल्लक आहे. या पाण्यावर पाऊस पडेपर्यंत मराठवाड्याची तहान भागवणे अशक्य आहे. त्यामुळे नाशिक-नगरच्या धरणांतून जायकवाडीला पाणी सोडावे, असे खंडपीठाने सुचविले.विदर्भात जोरदार पाऊस; खान्देशात गारपीट : उन्हाच्या झळा असह्य होत असताना गुरुवारी अवकाळी पाऊस झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भातील अकोले, वर्धा, वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. खान्देशातील पारोळा, अमळनेर भागात गारपीट झाली. मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात दुष्काळी पुरंदर तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. अजून तीन दिवस अवकाळी पाऊस पडू शकतो, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.