शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

‘ते’ अधिकारी येणार गोत्यात

By admin | Updated: June 5, 2017 05:24 IST

राज्यभरातील अनेक अधिकाऱ्यांनी संपर्क साधला होता, अशी माहिती उघड झाली असून, अशा सर्व अधिकाऱ्यांची मुंबई गुन्हे शाखेमार्फत चौकशी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य प्रशासन आणि पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेट प्रकरणातील महानंद डेअरीचा महाव्यवस्थापक विद्यासागर हिरमुखे आणि त्याच्या साथीदारांशी राज्यभरातील अनेक अधिकाऱ्यांनी संपर्क साधला होता, अशी माहिती उघड झाली असून, अशा सर्व अधिकाऱ्यांची मुंबई गुन्हे शाखेमार्फत चौकशी होणार आहे. राज्यातील पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे रॅकेट उघड झाल्यानंतर, हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. आता या प्रकरणात राज्य पोलीस दलातील अनेक आयपीएस व मपोसे अधिकारी या टोळीच्या संपर्कात होते, अशी प्राथमिक माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली आहे. या प्रत्येकाला येत्या काळात गुन्हे शाखेत चौकशीला सामोरे जावे लागेल, असे संकेत मिळत आहेत. टोळीच्या संपर्कात आलेले, पण बदलीच्या आमिषाकडे दुर्लक्ष केलेले अधिकारीही या प्रकरणी गोत्यात येण्याची दाट शक्यता आहे. या टोळीबाबत माहिती असूनही वरिष्ठांना कळवून कारवाई न केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवला जाऊ शकतो, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, हिरमुखे व त्याच्यासह अटक करण्यात आलेल्या अन्य तीन आरोपींच्या चौकशीतून, मोबाइल फोनच्या तपासणीतून राज्यातील अनेक छोटे-बडे सरकारी अधिकारी या टोळीच्या संपर्कात होते. त्यात पोलीस दलातील अधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. या प्रकरणातील तक्रारदार व सोलापूरचे पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांच्याप्रमाणे, या टोळीने राज्य पोलीस दलातील अनेकांशी संपर्क साधून, मनाप्रमाणे बदलीचे आमिष दाखवल्याचा प्राथमिक अंदाज गुन्हे शाखेने वर्तवला आहे. मात्र, ही टोळी अधिकाऱ्यांकडे पोहोचली की, अधिकारीच बदलीचे गाऱ्हाणे घेऊन या टोळीकडे आले, तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी या टोळीच्या माध्यमातून बदली करून घेतली का की, आमिषाकडे दुर्लक्ष केले, या अंगानेही तपास होत आहे. या सर्व बाजू आरोपी, संबंधित अधिकारी यांच्या प्रत्यक्ष व तांत्रिक तपासातून अधिक स्पष्ट होणार आहेत. दुर्लक्ष केले असल्यास, टोळीचे हे सगळे अवैध उद्योग दडवून का ठेवले, अशी विचारणा अधिकाऱ्यांकडे होऊ शकते. दरम्यान, या टोळीच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. पाचवा आरोपी अटकेतया रॅकेट प्रकरणात पुण्यातील कमलेश कानडे याला सहारा रोड येथून अटक करण्यात आली आहे. तो हिरमुखे याचा मित्र असल्याचे कॉल रेकॉर्डवरुनसमोर आले आहे. हा या प्रकरणातील पाचवा आरोपी आहे. >वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौनया प्रकरणाच्या तपासाबाबत गुन्हे शाखेकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे सहआयुक्त संजय सक्सेना, अतिरिक्त आयुक्त के. एम.एम. प्रसन्ना, उपायुक्त दिलीप सावंत, सहायक आयुक्त विनय कुलकर्णी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. तथापि, ही कारवाई झाल्यापासून गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत बैठका सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार, या कारवाईचा आवाका मोठा असल्याने, तपासाची सुई बड्या सरकारी अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांपर्यंत पोहोचेल, त्याचा अंदाज आल्याने, वरिष्ठ अधिकारी पुढील तपासाच्या दृष्टीने व्यूहरचना करत आहेत.