शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

त्यांनी शोधला टोलमुक्तीचा नवा पर्यायी मार्ग

By admin | Updated: June 14, 2016 02:48 IST

नागपूर-अमरावती हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय सुंदर झाला खरा; पण त्यावर एका बाजूने १७१ रुपये टोल द्यावा लागत असल्याने हा मार्ग टाळून टोलमुक्तीचा नवा मार्ग वाहनचालक

नागपूर : नागपूर-अमरावती हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय सुंदर झाला खरा; पण त्यावर एका बाजूने १७१ रुपये टोल द्यावा लागत असल्याने हा मार्ग टाळून टोलमुक्तीचा नवा मार्ग वाहनचालक अवलंबित असल्याने या महामार्गावरील वाहतूक रोडावली असून पर्यायी मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी दिसू लागली आहे. नागपूर-अमरावती मार्गावरुन दरदिवशी १० हजार वाहने जात असत. आज ही संख्या पाच ते सहा हजारावर आली असल्याचे गोंडखैरी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी लोकमतच्या प्रतिनिधीला सांगितले.असा आकारला जातो टोल अमरावती रोडवर एकूण चार टोल नाके आहेत.त्यात गोंडखैरी, कारंजा, तिवसा आणि नांदगावपेठ नाक्याचा समावेश आहे. एका कार चालकाला नांदगावपेठ टोलवर ८० रुपये, कारंजा ४० रुपये, गोंडखैरी ४१ रुपये आणि तिवसा १० रुपये असा एकूण १७१ रुपये एका वेळचा टोल द्यावा लागतो. येण्याजाण्याचा टोल गृहित धरल्यास तर ३४२ रुपये पडतात. परंतु दोन्ही वेळच्या टोलची पावती एकाचवेळी फाडली तर ६० टक्के कमी टोल लागतो. त्यामुळे २५० रुपयाच्या जवळपास हा टोल पडतो. सर्व र्बंकारच्या चारचाकी व त्यापुढील वाहनांसाठी येथे टोल द्यावा लागतो. टोलचा बोजा टाळण्यासाठी आता नागपूर-बुटीबोरी-केळझर-सेलू-पवनार-पुलगाव-अंजनसिंगी-कुऱ्हा-अमरावती या मार्गाने जाण्यास वाहनचालक पसंती देत आहेत. काही जण पुलगावच्या पुढे चांदूर बाजारमार्गे अमरावती गाठतात. (प्रतिनिधी)अपघाताचा धोका अधिक : नागपूर-बुटीबोरी-केळझर मार्र्गेे अमरावती ही वाहतूक कमालीची वाढली आहे. अमरावती मार्गावरील चारचार टोलनाक्यांमुळे हे घडत आहे. कारसोबतच ट्रॅव्हल्स बस, टॅक्सीसुद्धा अमरावतीसाठी वर्धा रोडचा वापर करू लागले आहेत. पर्यायी मार्ग हा प्रशस्त नसल्याने आणि वाहतूक वाढल्याने अपघाताचा नेहमीच धोका असतो. टोल नाके हटवा : कारने अमरावतीला ये-जा करायची तरी एका कारमागे २५० रुपये द्यावे लागत असतील तर लोक पर्यायी मार्गाने जाणारच. अमरावती मार्ग सुंदर झाला आहे पण टोलचा जाच अन्यायकारक आहे. तो रद्द केला पाहिजे. - नरेश वाहाणे, अध्यक्ष, रिपब्लिकन मूव्हमेंट