शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

अधिवेशनावर समृध्दीग्रस्त धडकणार : विरोध कायम

By admin | Updated: July 17, 2017 20:43 IST

सर्व समृध्दीबाधित शेतकरी अधिवेशनावर मोर्चा काढणार असल्याचा निर्धार राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला.

लोेकमत न्यूज नेटवर्क नाशिक : राज्य शासनाच्या समृध्दी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असून येत्या पावसाळी अधिवेशनाप्रसंगी शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व समृध्दीबाधित शेतकरी अधिवेशनावर मोर्चा काढणार असल्याचा निर्धार राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला.राज्य शासनाने २०१३चा भूसंपादन कायदा बाजूला ठेवत नव्याने मंजूर केलेला नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग हा दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा षड्यंत्र आहे. शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आरोप करीत सरकारच्या या शेतकरीविरोधी धोरणामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वास गमावला असल्याची टीका समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या राज्यस्तरीय निर्धार बैठकीत शेतकरी नेते तुकाराम भस्मे यांनी केली.सिडको परिसरातील मानव सेवा केंद्र येथे राज्यव्यापी निर्धार बैठकीत समृद्धीबाधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. समृद्धीमुळे शेतकऱ्यांची केवळ आजचीच पिढी नव्हे, तर पुढील असंख्य पिढ्या उद््ध्वस्त होणार आहे. सरकार शेतकऱ्यांचे जगण्याचे साधनच हिरावून घेत आहे. महामार्गासाठी जमिनी ताब्यात घेऊ नका हे गेल्या चार महिन्यांपासून दहाही जिल्ह्यांतील शेतकरी पोटतिडकीने ओरडून सांगत असतानाही सरकार समृद्धीच्या हट्टापोटी बहिरेपणाची भूमिका घेत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी बांधावर आलात तर शेतकरी विहिरीत उड्या मारून वा गळफास घेऊन आत्महत्या करताना जमिनी घेण्यासाठी बांधावर येणाऱ्यांनाही सोबत घेऊनच मरतील, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीची सोमवारी (दि.१७) झालेल्या राज्यव्यापी निर्धार बैठकीसाठी बबनदादा हरणे,अ‍ॅड. रतनकुमार इचम, राजू देसले, विनय पवार, तुकाराम भस्मे, प्रशांत वाडेकर, अर्पणा खाडे आदि उपस्थित होते. राज्यभरातून शेतकऱ्यांची हजेरी नाशिकसह जालना, वासीम, बुलढाणा, अहमदनगर, औरंगाबाद, यवतमाळ, अमरावती, ठाणे आदि दहा जिल्ह्यांतील शेतकरी प्रतिनिधी सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रांरभी शेतकरी एकजुटीचा विजय असो, जमीन आमची हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी सभागृह दणाणून सोडले. ‘समृद्धी महामार्ग रद्द झालाच पाहिजे’ या ओळी लिहिलेल्या सफेद गांधी टोप्या सर्वच शेतकऱ्यांनी डोक्यावर घालून, सरकार बळजबरी जमीन घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत सरकारच्या या दडपशाहीचा निषेध नोंदविला