शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
3
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
4
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
5
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
6
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
7
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
8
जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना
9
VIRAL : तो नवरा आहे गं, महिषासुर नाही... करवा चौथची पूजा करण्यासाठी महिलेनं काय केलं, Video बघाच!
10
"आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं...", रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
11
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
12
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
13
कतरिना कैफचं झालं बेबी शॉवर, 'या' फोटोमुळे मिळाली हिंट; ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
14
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
15
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
16
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
17
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
18
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
19
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
20
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...

अधिवेशनावर समृध्दीग्रस्त धडकणार : विरोध कायम

By admin | Updated: July 17, 2017 20:43 IST

सर्व समृध्दीबाधित शेतकरी अधिवेशनावर मोर्चा काढणार असल्याचा निर्धार राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला.

लोेकमत न्यूज नेटवर्क नाशिक : राज्य शासनाच्या समृध्दी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असून येत्या पावसाळी अधिवेशनाप्रसंगी शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व समृध्दीबाधित शेतकरी अधिवेशनावर मोर्चा काढणार असल्याचा निर्धार राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला.राज्य शासनाने २०१३चा भूसंपादन कायदा बाजूला ठेवत नव्याने मंजूर केलेला नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग हा दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा षड्यंत्र आहे. शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आरोप करीत सरकारच्या या शेतकरीविरोधी धोरणामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वास गमावला असल्याची टीका समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या राज्यस्तरीय निर्धार बैठकीत शेतकरी नेते तुकाराम भस्मे यांनी केली.सिडको परिसरातील मानव सेवा केंद्र येथे राज्यव्यापी निर्धार बैठकीत समृद्धीबाधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. समृद्धीमुळे शेतकऱ्यांची केवळ आजचीच पिढी नव्हे, तर पुढील असंख्य पिढ्या उद््ध्वस्त होणार आहे. सरकार शेतकऱ्यांचे जगण्याचे साधनच हिरावून घेत आहे. महामार्गासाठी जमिनी ताब्यात घेऊ नका हे गेल्या चार महिन्यांपासून दहाही जिल्ह्यांतील शेतकरी पोटतिडकीने ओरडून सांगत असतानाही सरकार समृद्धीच्या हट्टापोटी बहिरेपणाची भूमिका घेत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी बांधावर आलात तर शेतकरी विहिरीत उड्या मारून वा गळफास घेऊन आत्महत्या करताना जमिनी घेण्यासाठी बांधावर येणाऱ्यांनाही सोबत घेऊनच मरतील, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीची सोमवारी (दि.१७) झालेल्या राज्यव्यापी निर्धार बैठकीसाठी बबनदादा हरणे,अ‍ॅड. रतनकुमार इचम, राजू देसले, विनय पवार, तुकाराम भस्मे, प्रशांत वाडेकर, अर्पणा खाडे आदि उपस्थित होते. राज्यभरातून शेतकऱ्यांची हजेरी नाशिकसह जालना, वासीम, बुलढाणा, अहमदनगर, औरंगाबाद, यवतमाळ, अमरावती, ठाणे आदि दहा जिल्ह्यांतील शेतकरी प्रतिनिधी सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रांरभी शेतकरी एकजुटीचा विजय असो, जमीन आमची हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी सभागृह दणाणून सोडले. ‘समृद्धी महामार्ग रद्द झालाच पाहिजे’ या ओळी लिहिलेल्या सफेद गांधी टोप्या सर्वच शेतकऱ्यांनी डोक्यावर घालून, सरकार बळजबरी जमीन घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत सरकारच्या या दडपशाहीचा निषेध नोंदविला