शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

गोटमारी यात्रेत दोन गावांमध्ये होते दगडफेक; अंधश्रद्धेतून गेला तरुणाचा बळी, २२६ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 06:11 IST

मध्य प्रदेशातील जांब नदीपात्रात भरलेल्या गोटमार यात्रेत पांढुर्णा व सावरगाव येथील नागरिकांत झालेल्या गोटमारीत शंकर भलावी (२५, रा. भुयारी, जि. छिंदवाडा) या तरुणाचा मृत्यू झाला.

- संजय खासबागे वरुड (अमरावती) : येथून ३५ किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील जांब नदीपात्रात भरलेल्या गोटमार यात्रेत पांढुर्णा व सावरगाव येथील नागरिकांत झालेल्या गोटमारीत शंकर भलावी (२५, रा. भुयारी, जि. छिंदवाडा) या तरुणाचा मृत्यू झाला. २२६ जण जखमी झाले. तीनशे वर्षांची ही कुप्रथा बंद करण्यात अपयश येत असल्याने अंधश्रद्धेमुळे यंदाही बळी गेला. या यात्रेत ७१ वर्षांत १२ जण मृत्युमुखी पडले असून हजारो नागरिकांना अपंगत्व आले आहे.सावरगाव येथील युवतीसोबत पांढुर्णा येथील युवकाचे प्रेमसूत जुळले होते. ते विवाहबंधनात अडकणार तेवढ्यात मान-प्रतिष्ठेचा अडथळा निर्माण झाल्याने युवतीला सावरगावातून पांढुर्णा येथे नेत असताना दोन्ही गावांतील लोकांनी त्यांना जांब नदीपात्रात हेरून त्यांच्यावर दोन्हीकडून दगडांचा वर्षाव केला. त्यात दोघे दगावले. चंडिकामातेच्या मंदिरात पूजाअर्चा करून प्रेमीयुगुलाला समाधी देण्यात आली. ही घटना पोळ्याची करीला घडल्याने या दिवशी दोन्ही गावांतील लोक या नदीत गोटमार यात्रा भरवत असल्याची आख्यायिका आहे. दोन्ही आख्यायिका येथील नागरिक श्रद्धेने जोपासतात. या यात्रेत २२६ जखमी झाल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.>कुप्रथा बंद करण्यात अपयशमध्य प्रदेश प्रशासनाने ही यात्रा बंद करण्याकरिता केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. या वर्षीसुद्धा पोळ्याच्या करीला विधिवत पळसाचे झाड लावून पूजाअर्चा झाल्यानंतर यात्रा सुरू झाली. त्यानंतर दोन्ही बाजंूकडून एकच दगडांचा वर्षाव सुरू झाला.दगड वर्मावर लागल्याने शंकर भलावीचा बळी गेला. यात जे २२६ जण जखमी झाले ते श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.