शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

..तर टाळता आली असती प्रवाशांची गैरसोय!

By admin | Updated: July 22, 2015 22:55 IST

रखडलेला ब्रॉडगेज प्रकल्प; अकोला-इंदूर ब्रॉडगेज टाळू शकला असता रेल्वेचे नुकसान.

अतुल जयस्वाल/अकोला : दक्षिण- उत्तर आणि पूर्व-पश्‍चिम भारताला रेल्वेने जोडण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मध्य प्रदेशातील इटारसी येथील रुट रिले इंटरलॉकिंग (आर.आर.आय.) यंत्रणेच्या कक्षाला गत महिन्यात आग लागल्यामुळे संपूर्ण यंत्रणाच कोलमडली व या मार्गावरून धावणार्‍या शेकडो रेल्वेफेर्‍या रेल्वे प्रशासनाला रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय तर झालीच, रेल्वेचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडाला. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अकोला ते इंदूर हा लोहमार्ग अत्यंत उपयुक्त ठरला असता. या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर पूर्ण झालेले असते, तर प्रवाशांची गैरसोय व महसुलाचे नुकसान, या दोन्ही गोष्टी टाळता येऊ शकल्या असत्या. दक्षिण-उत्तर आणि पूर्व-पश्‍चिम भारताला रेल्वेमार्गाने जोडणारा चतुष्कोन पश्‍चिम-मध्य रेल्वेच्या इटारसी स्थानकावर आहे. मुंबई-भोपाळ, भोपाळ-नागपूर आणि मुंबई-जबलपूर-अलाहबाद या लोहमार्गावर धावणार्‍या गाड्यांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे स्टेशन आहे. गत महिन्यात १७ जून रोजी या स्टेशनच्या इंटरलॉकिंग कक्षाला आग लागल्यामुळे देशभरातील रेल्वे सेवा विस्कळित झाली. दक्षिण भारतातून उत्तरेकडे जाणार्‍या रेल्वे गाड्या नागपूर-इटारसी-जबलपूर मार्गे जातात. इटारसी येथील यंत्रणा कोलमडल्यामुळे या मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. या परिस्थितीत मध्य भारतातील अत्यंत महत्त्वाचे स्टेशन असलेले अकोला स्टेशन हा महत्त्वाचा दुवा ठरू शकला असता. रतलाम- इंदूर-खंडवा-अकोला-पूर्णा या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यापैकी अकोला ते पूर्णा हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज झाला. तसेच रतलाम ते इंदूरपर्यंंत ब्रॉडगेजचे काम झालेले आहे. या मार्गावरील मधला भाग, खंडवा ते अकोलापर्यंंत ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम गत अनेक वर्षांंपासून रखडलेले आहे. अकोला ते इंदूर हा लोहमार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित झालेला असता, तर दक्षिण भारतातून येणार्‍या गाड्या वर्धा येथून अकोला व तेथून खंडवा-इंदूर मार्गे उत्तर भारताकडे वळविता येऊ शकल्या असत्या. तसेच मुंबईकडून येणार्‍या गाड्याही भुसावळमार्गे खंडवा व तेथून इंदूर मार्गे उत्तर भारताकडे वळविता आल्या असत्या. इटारसी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरून जाणार्‍या मार्गासाठी अकोला-इंदूर-रतलाम हा एक पर्याय रेल्वेकडे उपलब्ध झाला असता; परंतु या मार्गाचे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे दक्षिण भारताकडून नागपूर मार्गे उत्तरेकडे जाणार्‍या शेकडो गाड्या नाईलाजाने रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय तर झालीच, याशिवाय रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा फटकाही बसला.

*गेज परिवर्तनाचे काम प्राधान्याने करण्याची गरज

         भौगोलिकदृष्ट्या अकोला हे शहर भारताच्या मध्यभागात येते. मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्टेशन असलेल्या अकोल्यातून मुंबई-कोलकाता हा लोहमार्ग जातो. तसेच पूर्णा ते महू हा रेल्वेमार्गही शहरातून जातो. महाराष्ट्राला मध्य व उत्तर भारताशी जोडणारा अत्यंत कमी अंतराचा असलेला हा लोहमार्ग ब्रिटिशांच्या काळात बांधून पूर्ण झाला होता. व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मार्गाचे अकोला ते पूर्णापर्यंंतचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात आले; परंतु अकोला ते खंडवा व तेथून पुढे इंदूर या मार्गाचे गेज परिवर्तन मात्र गत अनेक वर्षांंपासून रखडलेले आहे. या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यास दक्षिणेकडून येणार्‍या गाड्या अकोला मार्गे थेट मध्यप्रदेशात जाऊ शकतात. त्यामुळे या मार्गाचे तातडीने ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होणे गरजेचे आहे.