शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

घोटाळे झालेच नाही

By admin | Updated: December 23, 2015 23:34 IST

विरोधी पक्षातर्फे राज्यातील तीन मंत्र्यांविरुद्ध घोटाळ्यांचे गंभीर आरोप करण्यात आले होते. विधानसभेत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील तर विधान परिषदेमध्ये विरोधीपक्ष नेते

नागपूर : विरोधी पक्षातर्फे राज्यातील तीन मंत्र्यांविरुद्ध घोटाळ्यांचे गंभीर आरोप करण्यात आले होते. विधानसभेत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील तर विधान परिषदेमध्ये विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. या तिन्ही मंत्र्यांनी बुधवारी विधानसभेत सफाई देत आपल्यावरील घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले.ई-टेंडरिंगद्वारे पारदर्शक निविदा प्रक्रिया - बावनकुळे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरुद्ध कृषी सौरपंप खरेदी योजनेत शेकडो कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात बुधवारी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सफाई देत संगितले की सौरऊर्जा पंप खरेदीसाठी ई-टेंडरींगद्वारे पारदर्शक निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. यात कमीत कमी बोली लावणाऱ्या निविदकास निविदा दिली आहे. अजून एकही सौरपंप लागलेला नाही, करारही झाला नाही, तर घोटाळा होण्याचा प्रश्न आलाच कुठून. मी या खात्याचा मंत्री असेपर्यंत एक पैशाचाही भ्रष्टाचार होणार नाही. आमच्या सरकारने एकही विद्युत शुल्क माफ केले नाही. सर्व आरोप खोटे आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.शिक्षण संस्थांचालकांच्या दबावामुळे आरोप - तावडे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर अर्ली रिडर बुक व महापुरुषांच्या फोटो खरेदीत ९४ कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप लावण्यात आला होता. या आरोपाचे खंडन करीत तावडे यांनी सांगितले की, आघाडी शासनात ७८ कोटी रुपयांची अर्ली रिडर बुक खरेदी करण्यात आले होते. आपण ते १९ कोटी रुपयात खरेदी केले. तसेच महापुरुषांचे प्रत्येक फोटोमागे ४८०० रुपये खर्च होत होते. ते आपण १३०० रुपयावर आणले. त्यामुळे यात घोटाळ्याचा प्रश्नच येत नाही. माझ्यावरील आरोप हे केवळ मी शिक्षण संस्थांची कमाई बंद केली असल्याने संस्था चालकांच्या प्रेमापोटी व दबावापोटी केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पाच हजार द्या आणि गणपतीची मूर्ती घेऊन जा - सावरा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनीआदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत घोटाळा करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून ८ लाख रुपये किमतीचा सोन्याचा गणपती भेट म्हणून स्वीकारला असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्याचे उत्तर देतांना सावरा यांनी सांगितले की, विरोधकांनी ती मूर्ती माझ्याकडून ५ हजार रुपयात घेऊन जावी. मी संवेदनशील व्यक्ती आहे. या आरोपामुळे मी खूप व्यथित झालो. परंतु जशास तसे उत्तर देण्याचे मी ठरविले. आपण कुणालाही पाठीशी घालत नाही. घोटाळा करणाऱ्यांविद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावे, मी सार्वजनिक जीवन सोडून देईल, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.