शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

‘स्कूल बसचा परवाना तपासण्यासाठी यंत्रणा आहे का?’ - उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:08 IST

स्कूल बस व्यतिरिक्त अन्य वाहनांकडे शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्याचा परवाना आहे की नाही, हे तपासण्यासाठी सरकारकडे यंत्रणा असणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडे तशी काही यंत्रणा आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे गुरुवारी केली.

मुंबई : स्कूल बस व्यतिरिक्त अन्य वाहनांकडे शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्याचा परवाना आहे की नाही, हे तपासण्यासाठी सरकारकडे यंत्रणा असणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडे तशी काही यंत्रणा आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे गुरुवारी केली.काही ठिकाणी रिक्षा, टॅक्सी व सहा आसनी वाहनात विद्यार्थ्यांना अक्षरश: शेळ्या-मेंढ्यांप्रमाणे कोंबले जाते. याबाबत न्या. नरेश पाटील व न्या. एन. डब्ल्यू. सांबरे यांनी चिंता व्यक्त केली. ‘लहान मुले चालत्या वाहनातून उडी मारू शकतात. ते काहीही करू शकतात. मुले ही मुले आहेत. त्यामुळे या पद्धतीला (मुलांना वाहनात कोंबण्याच्या) आळा घालण्यासाठी सरकार काही पावले उचलणार आहे का? सरकारने राज्यातील कानाकोपºयात धावावे, अशी आमची अपेक्षा नाही. मात्र त्यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा असावी,’ असे न्यायालयाने सांगितले.टॅक्सी, रिक्षा, सहा आसनी वाहने व बेस्ट केंद्रीय मोटार वाहन अधिनियमांचे उल्लंघन करून शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करतात. राज्य सरकारने अशा वाहनांचे परवाने रद्द करावे. त्यांना नियमांचे पालन करायला लावावे, अशी विनंती करणारी, जनहित याचिका पालक-शिक्षक संघटनेने (पीटीए) उच्च न्यायालयात दाखल केली आहे.या याचिकेवरील सुनावणीत सरकारी वकिलांनी सांगितले की, राज्यातील एकूण ११,९२२ वाहनांनी ‘स्कूल बस’ म्हणून नोंदणी केलेली आहे. त्यापैकी ८,५९१ वाहनांनी संबंधित शाळांबरोबर करार केला आहे. त्यावर न्यायालयाने उर्वरित वाहनांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला.‘स्कूल बसचे काही ठराविक डिझाईन आहे का? मुलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे. मुले शाळेत गेल्यानंतर ती घरी सुरक्षित परत येतील, असे पालकांना वाटले पाहिजे. भारतात अपघाताचे प्रमाण मोठे आहे. हे प्रमाण धक्कादाय व आश्चर्यचकित करणारे आहे. पालकांसाठी टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली नसेल, तर पालक त्या क्रमांकावर फोन करू शकतील,’ अशी सूचनाही न्यायालयाने सरकारला केली.पुढील सुनावणी २२ जानेवारीलान्यायालयाने या सर्व बाबतीत सरकारी वकिलांना परिवहन विभाग आयुक्तांकडून सूचना घेण्याचे निर्देश देत यावरील पुढील सुनावणी २२ जानेवारी रोजी ठेवली आहे.राज्यात एकही शाळा बंद होणार नाही-तावडेरत्नागिरी : राज्यात एकही शाळा बंद होणार नाही, तसेच दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांचे, विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे नजीकच्या शाळांमध्ये विलिनीकरण करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमांतर्गत अध्ययन व अध्यापक पद्धतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यात येत असून, हे प्रयोग लोकांसमोर घेऊन जाणाºया ‘शिक्षणाची वारी’ उपक्रमाच्या रत्नागिरीतील उद्घाटन सोहळ्यात तावडे बोलत होते.राज्यात हजारो शाळा बंद होणार असल्याची चर्चा केली जात आहे. मात्र दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा नजीकच्या दुसºया शाळेत विलीन केल्या जातील. आधीच्या सरकारने २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळांबाबत हा निर्णय घेतला होता. मात्र आपण तो १० वर आणला आहे. एखाद्या शाळेत ३-४ मुले असतील तर क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन, सहल अशा गोष्टींचा आनंद विद्यार्थ्यांना मिळू शकत नाही. त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकही नजीकच्या अधिक पटसंख्येच्या शाळेत विलीन केले जातील, असे तावडे यांनी सांगितले.राज्य शासनातर्फे प्रगत शिक्षणाचा कार्यक्रम तीन वर्षांपासून राबवण्यात येत आहे. प्रत्यक्षात शिक्षकवर्गच त्याची अंमलबजावणी करीत असल्यामुळेच प्रगत शिक्षणात १६व्या क्रमांकावर असणारे महाराष्ट्र राज्य सध्या तिसºया क्रमांकावर आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय