शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

सनातनला दहशतवादी संघटना जाहीर करण्यास पुरेसे पुरावे नाहीत

By admin | Updated: February 8, 2017 05:20 IST

तीन बॉम्बस्फोटांचे आणि तीन हत्यांचे आरोप असलेल्या सनातन संस्थेविरुद्ध राज्य सरकारने सादर केलेले पुरावे, संस्थेला ‘दहशतवादी संघटना’

मुंबई : तीन बॉम्बस्फोटांचे आणि तीन हत्यांचे आरोप असलेल्या सनातन संस्थेविरुद्ध राज्य सरकारने सादर केलेले पुरावे, संस्थेला ‘दहशतवादी संघटना’ जाहीर करून, बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) बंदी घालण्याइतपत समाधानकारक आणि पुरेसे नसल्याची माहिती मंगळवारी केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला दिली. केंद्र सरकारच्या या माहितीमुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. ठाणे व वाशी येथील नाट्यगृहांबाहेर, तर पनवेल येथे चित्रपटगृहाबाहेर सनातन संस्थेच्या सदस्यांनी बॉम्बस्फोट केल्याचा आरोप तपासयंत्रणांनी ठेवला. ठाणे बॉम्बस्फोटप्रकरणी सत्र न्यायालयाने सनातन संस्थेच्या दोन सदस्यांना दोषी ठरवत, दहा वर्षांची शिक्षाही ठोठावली. त्याशिवाय मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातही सनातनच्या सदस्यांचाच हात असल्याचा दावा करत, राज्य सरकारने सनातन संस्थेला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित करून बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. त्यापूर्वी दहशतवाद प्रतिबंधक विभागाने (एटीएस) २०१२ मध्ये राज्य सरकारकडे सनातनवर बंदी घालण्याबाबत प्रस्ताव पाठवला होता. मात्र, राज्य सरकारने सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी सादर केलेले पुरावे समाधानकारक व पुरेसे नसल्याने संस्थेवर बंदी घालू शकत नाही, असे मंगळवारी केंद्र सरकारने न्या. व्ही. एम. कानडे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठाला सांगितले.सनातन संस्थेचे सदस्य ठाणे व पनवेल बॉम्बस्फोटात सहभागी असल्याने, संस्थेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका विजय रोकडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत केंद्र सरकारने बंदी घालण्यास नकार देत, राज्य सरकारला धक्का दिला.बॉम्बस्फोटाव्यतिरिक्त सनातन संस्थेच्या सदस्यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणही अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)