शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
3
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
4
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
5
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
6
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
7
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
8
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
9
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
10
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
11
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
12
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
13
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
14
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
15
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
16
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
17
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
18
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
19
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
20
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

सनातनला दहशतवादी संघटना जाहीर करण्यास पुरेसे पुरावे नाहीत

By admin | Updated: February 8, 2017 05:20 IST

तीन बॉम्बस्फोटांचे आणि तीन हत्यांचे आरोप असलेल्या सनातन संस्थेविरुद्ध राज्य सरकारने सादर केलेले पुरावे, संस्थेला ‘दहशतवादी संघटना’

मुंबई : तीन बॉम्बस्फोटांचे आणि तीन हत्यांचे आरोप असलेल्या सनातन संस्थेविरुद्ध राज्य सरकारने सादर केलेले पुरावे, संस्थेला ‘दहशतवादी संघटना’ जाहीर करून, बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) बंदी घालण्याइतपत समाधानकारक आणि पुरेसे नसल्याची माहिती मंगळवारी केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला दिली. केंद्र सरकारच्या या माहितीमुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. ठाणे व वाशी येथील नाट्यगृहांबाहेर, तर पनवेल येथे चित्रपटगृहाबाहेर सनातन संस्थेच्या सदस्यांनी बॉम्बस्फोट केल्याचा आरोप तपासयंत्रणांनी ठेवला. ठाणे बॉम्बस्फोटप्रकरणी सत्र न्यायालयाने सनातन संस्थेच्या दोन सदस्यांना दोषी ठरवत, दहा वर्षांची शिक्षाही ठोठावली. त्याशिवाय मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातही सनातनच्या सदस्यांचाच हात असल्याचा दावा करत, राज्य सरकारने सनातन संस्थेला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित करून बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. त्यापूर्वी दहशतवाद प्रतिबंधक विभागाने (एटीएस) २०१२ मध्ये राज्य सरकारकडे सनातनवर बंदी घालण्याबाबत प्रस्ताव पाठवला होता. मात्र, राज्य सरकारने सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी सादर केलेले पुरावे समाधानकारक व पुरेसे नसल्याने संस्थेवर बंदी घालू शकत नाही, असे मंगळवारी केंद्र सरकारने न्या. व्ही. एम. कानडे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठाला सांगितले.सनातन संस्थेचे सदस्य ठाणे व पनवेल बॉम्बस्फोटात सहभागी असल्याने, संस्थेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका विजय रोकडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत केंद्र सरकारने बंदी घालण्यास नकार देत, राज्य सरकारला धक्का दिला.बॉम्बस्फोटाव्यतिरिक्त सनातन संस्थेच्या सदस्यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणही अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)