शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सहा हजार गावांमध्ये ‘मनरेगा’चे एकही काम नाही

By admin | Updated: April 11, 2016 03:14 IST

महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट वाढत असून त्यावर उपाययोजना करण्यात केंद्र व राज्य शासन अपयशी ठरले आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील १९ हजार ५१६ ग्रामपंचायतींपैकी तब्बल

जळगाव : महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट वाढत असून त्यावर उपाययोजना करण्यात केंद्र व राज्य शासन अपयशी ठरले आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील १९ हजार ५१६ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ६,३५२ तर जळगाव जिल्ह्यातील ४४८ ग्रामंपचायतीत वर्षभरात ‘मनरेगा’चे एकही काम झालेले नसल्याचा आरोप स्वराज अभियानाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेत केला.स्वराज अभियानातर्फे महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगण, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा व राजस्थानमधील दुष्काळग्रस्त भागात दौरा करून संवेदना यात्रा काढण्यात आली होती. त्यातील निरीक्षणांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देऊन आगामी काळातील दुष्काळीस्थिती आणि त्यावर उपाययोजना सुचविल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी न केल्याने महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट गडद झाल्याचे त्यांनी सांगितले. सहा महिन्यांपासून ग्रामीण भागाला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. पिण्याच्या पाण्यासोबतच खाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. मात्र त्याऐवजी जेएनयू, गो-हत्या, आयपीएलसारख्या विषयांवर चर्चा होत आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)