शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

तातडीने पाणी नाहीच

By admin | Updated: October 21, 2015 02:53 IST

मराठवाड्याला नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून १२.८४ टीएमसी पाणी तातडीने सोडण्यास राज्य सरकारने मंगळवारी असमर्थता दर्शविली. गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास

मुंबई : मराठवाड्याला नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून १२.८४ टीएमसी पाणी तातडीने सोडण्यास राज्य सरकारने मंगळवारी असमर्थता दर्शविली. गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने (जीएमआयडीसी) पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याची अंमलबजावणी २४ आॅक्टोबरनंतर होईल, अशी माहिती राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयाला दिली. कोर्टाने मात्र, ‘जीएमआयडीसी’च्या निर्णयावर स्थगितीस नकार दिला.राज्य जलनियामक प्राधिकरणाने १९ सप्टेंबर २०१४ला ‘जीएमआयडीसी’ला मराठवाडा व नाशिकला किती पाणी सोडायचे, या संदर्भात सूत्र बनवून दिले. आदेशाची अंमलबजावणी करत ‘जीएमआयडीसी’ने १७ आॅक्टोबर २०१५ रोजी मराठवाड्याला नाशिक व अहमदनगरच्या मुळा धरणातून १.७४ टीएमसी, प्रवरामधून ६.५० टीएमसी, गंगापूरमधून १.३६ टीएमसी, दारणामधून ३.२४ टीएमसी असे एकूण १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. नाशिक व नगरच्या शेतकऱ्यांनी निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी नाशिक व अहमदनगरच्या पिण्याच्या व शेतीच्या पाणीपुरवठ्याशी तडजोड न करता, १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाला दिली.खंडपीठाने आता स्थगिती देण्यास नकार देत, पुढील सुनावणी २३ आॅक्टोबरला ठेवली. राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)टास्क फोर्स नेमण्यासाठी अवधी हवाआता पाणी सोडल्यास नाशिक व अहमदनरमध्ये त्याचा बेकायदा उपसा होईल. यास आळा बसवण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यासाठी दोन ते तीन दिवस लागणार असल्याने आता तातडीने मराठवड्याला पाणी सोडणार नाही. जायकवाडीत अजिबात पाणी नाही. त्यामुळे बीड व लातुरला एक महिन्याने, तर औरंगाबादला २० दिवसांनी पाणीपुरवठा होतो. त्यामुळे १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. वग्यानी यांनी केला.