शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

तातडीने पाणी नाहीच

By admin | Updated: October 21, 2015 02:53 IST

मराठवाड्याला नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून १२.८४ टीएमसी पाणी तातडीने सोडण्यास राज्य सरकारने मंगळवारी असमर्थता दर्शविली. गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास

मुंबई : मराठवाड्याला नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून १२.८४ टीएमसी पाणी तातडीने सोडण्यास राज्य सरकारने मंगळवारी असमर्थता दर्शविली. गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने (जीएमआयडीसी) पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याची अंमलबजावणी २४ आॅक्टोबरनंतर होईल, अशी माहिती राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयाला दिली. कोर्टाने मात्र, ‘जीएमआयडीसी’च्या निर्णयावर स्थगितीस नकार दिला.राज्य जलनियामक प्राधिकरणाने १९ सप्टेंबर २०१४ला ‘जीएमआयडीसी’ला मराठवाडा व नाशिकला किती पाणी सोडायचे, या संदर्भात सूत्र बनवून दिले. आदेशाची अंमलबजावणी करत ‘जीएमआयडीसी’ने १७ आॅक्टोबर २०१५ रोजी मराठवाड्याला नाशिक व अहमदनगरच्या मुळा धरणातून १.७४ टीएमसी, प्रवरामधून ६.५० टीएमसी, गंगापूरमधून १.३६ टीएमसी, दारणामधून ३.२४ टीएमसी असे एकूण १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. नाशिक व नगरच्या शेतकऱ्यांनी निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी नाशिक व अहमदनगरच्या पिण्याच्या व शेतीच्या पाणीपुरवठ्याशी तडजोड न करता, १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाला दिली.खंडपीठाने आता स्थगिती देण्यास नकार देत, पुढील सुनावणी २३ आॅक्टोबरला ठेवली. राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)टास्क फोर्स नेमण्यासाठी अवधी हवाआता पाणी सोडल्यास नाशिक व अहमदनरमध्ये त्याचा बेकायदा उपसा होईल. यास आळा बसवण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यासाठी दोन ते तीन दिवस लागणार असल्याने आता तातडीने मराठवड्याला पाणी सोडणार नाही. जायकवाडीत अजिबात पाणी नाही. त्यामुळे बीड व लातुरला एक महिन्याने, तर औरंगाबादला २० दिवसांनी पाणीपुरवठा होतो. त्यामुळे १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. वग्यानी यांनी केला.