शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

मुंबईत शिवसेना-भाजपाला एकत्र येण्यावाचून पर्याय नाही - गडकरी

By admin | Updated: February 24, 2017 12:40 IST

मुंबईत शिवसेना-भाजपाला एकत्र येण्यावाचून पर्याय नाही असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - सर्वाना उत्सुकता लागलेल्या मुंबई महापालिकेचे निकाल हाती आले असून शिवसेना 84 जागांसह नंबर एकचा पक्ष ठरला आहे. मात्र भाजपानेही शिवसेनेला घासून टक्कर दिली असून शिवसेनेपेक्षा फक्त दोनच जागा भाजपाला कमी मिळाल्या आहेत. बहुमत न मिळाल्याने आता शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार की दुसरे पर्याय निवडणार याकडे सर्वांचं लक्ष असून नेमकी काय भूमिका दोन्ही पक्ष घेणार आहेत हे येणा-या दिवसांमध्ये कळेल. मात्र 'मुंबईत शिवसेना-भाजपाला एकत्र येण्यावाचून पर्याय नाही', असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. नितीन गडकरींच्या या भूमिकेमुळे विधानसभेप्रमाणे महापालिकेतही दोन भाऊ मांडीला मांडी लावून बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
 
 
'शिवसेनेसोबत हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन युती झाली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस विचाराने निर्णय घेतील. मुंबईत शिवसेना-भाजपाला एकत्र येण्यावाचून पर्याय नाही', असं मत नितीन गडकरींनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं आहे.
 
संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेत भाजपा आणि शिवसेनेची लढाई जवळपास बरोबरीत सुटली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या विकास आणि पारदर्शकतेच्या अजेंड्याला मुंबईकरांनी मोठा प्रतिसाद दिला तर शिवसेनेने आपल्या परंपरागत मतदारांच्या आधारे यश मिळविले.
 
सकाळी शिवसेनेने निकालात आघाडी घेतल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला मात्र, दुपारनंतर भाजपाच्या एकेक जागा वाढत गेल्या आणि कमळ फुलू लागले. अंतिम निकालात दोघांमध्ये केवळ दोनचे अंतर राहिले. मिळाल्याने सत्तेचे समीकरण कसे असेल, भाजपा आणि शिवसेना एकत्र येतील या बाबत उत्सुकता आहे. अपक्षांना जवळ करण्याची रणनीती दोघांनीही आखली आहे. 
 
गेल्यावेळी केवळ नागपूर महापालिकेत भाजपाकडे सत्ता होती. यावेळी सहा महापालिकांमध्ये एकहाती सत्ता, इतर दोन ठिकाणी सत्तेकडे वाटचाल आणि मुंबईत शिवसेनेच्या बरोबरीने यश मिळवित भाजपाने जोरदार मुसंडी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला जबर धक्के बसले. एकाही महापालिकेत त्यांना बहुमत मिळाले नाही वा सत्तेच्या जवळदेखील जाता आलेले नाही. मुंबईत केवळ ३१ जागांवर समाधान मानावे लागल्यानंतर माजी खासदार संजय निरुपम यांनी मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
 
ठाण्याचा गड शिवसेनेने राखला असला तरी नागपूर, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, अमरावती, अकोला या सहा महापालिकांमध्ये भाजपाने बहुमत मिळविले. सोलापूर आणि उल्हासनगरमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष असून इतर पक्ष/अपक्षांच्या सहकार्याने सत्तेत येईल, अशी स्थिती आहे.