शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

भ्रष्टाचारमुक्तीसाठी नोटाबंदी आवश्यकच

By admin | Updated: January 16, 2017 04:24 IST

भारताचा भ्रष्टाचारात १३८ देशांत ७६ वा क्रमांक लागतो. आपल्यापेक्षा ७५ देश कमी भ्रष्टाचारी आहेत.

डोंबिवली : भारताचा भ्रष्टाचारात १३८ देशांत ७६ वा क्रमांक लागतो. आपल्यापेक्षा ७५ देश कमी भ्रष्टाचारी आहेत. भ्रष्टाचारामुळे समाजाची भीषण अवस्था झालेली आहे. भ्रष्टाचाराने संपूर्ण देशाला पोखरून टाकले आहे. १३० कोटी लोकसंख्येमध्ये ६५ टक्के जनता तरुण आहे. यासाठी सव्वा ते दीड कोटी रोजगार निर्माण होण्याची गरज आहे. देश भ्रष्टाचारमुक्त झाला नाही, तर रोजगार निर्माण करणे, उद्योजक तयार करणे कठीण जाईल. भ्रष्टाचारमुक्तीसाठी नोटाबंदी होणे गरजेचे आहे, असे मत अर्थतज्ज्ञ अभिजित फडणीस यांनी व्यक्त केले. ‘राष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवली’च्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे पहिले पुष्प फडणीस यांनी गुंफले. या वेळी ते बोलत होते. ‘जागतिक अर्थकारण आणि भारत’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्षा सुलभा डोंगरे, कार्यवाह संजय कुलकर्णी उपस्थित होते. फडणीस म्हणाले की, पायाभूत साधने असतील, तरच आपण जगाशी लढू शकतो. सोने, जागेमध्ये केलेली गुंतवणूक ही काढून घेऊन तोच पैसा, व्यापारवृद्धीसाठी गुंतवणूक करणे, ही काळाची गरज आहे. त्यानुसार, सध्याचे सरकार कार्य करीत आहे. याचाच परिणाम म्हणून सरकारने कारखान्यांवरील कर कमी केले आहेत. रासायनिक द्रव्यांचा वापर यामुळे जमिनीचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकरी हळूहळू देशात नैसर्गिक व जैविक शेतीकडे वळत आहे. जर्सी गायी हे एक मोठे संकट आले आहे. पुन्हा देशी गायीकडे वळण्याची गरज आहे. तरच, शेतकरी समृद्ध होईल. त्यासाठी आपण हातभार लावला पाहिजे. भारत हा इतर देशांच्या तुलनेत बुद्धिमान देश असल्याने मिळालेल्या संधीचे सोने करतो. नव्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू आहे. आर्थिक व्यवहारही बोटांच्या ठशांच्या साहाय्याने होणार आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह संजय कुलकर्णी, पाहुण्यांचा परिचय आनंद रानडे, सूत्रसंचालन नयना पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)>व्याजदर आणखी कमी होणारनोटाबंदीनंतर व्याजदर कमी झाले आहेत. हे व्याजदर येणाऱ्या काळात आणखी कमी होतील. जगातील अनेक देशांत उणे व्याजदर आहेत. ही संकल्पना न रुचणारी आहे. काही देश तर आपले पैसे सांभाळण्यासाठी पैसे मोजतात. वेगळ्या वाटेकडे आपला देश जाणार आहे. भ्रष्टाचार, महागाई, काळी अर्थव्यवस्था कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तसेच मानवी संसाधनांचा पूर्ण वापर करावा लागणार आहे.