शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारमुक्तीसाठी नोटाबंदी आवश्यकच

By admin | Updated: January 16, 2017 04:24 IST

भारताचा भ्रष्टाचारात १३८ देशांत ७६ वा क्रमांक लागतो. आपल्यापेक्षा ७५ देश कमी भ्रष्टाचारी आहेत.

डोंबिवली : भारताचा भ्रष्टाचारात १३८ देशांत ७६ वा क्रमांक लागतो. आपल्यापेक्षा ७५ देश कमी भ्रष्टाचारी आहेत. भ्रष्टाचारामुळे समाजाची भीषण अवस्था झालेली आहे. भ्रष्टाचाराने संपूर्ण देशाला पोखरून टाकले आहे. १३० कोटी लोकसंख्येमध्ये ६५ टक्के जनता तरुण आहे. यासाठी सव्वा ते दीड कोटी रोजगार निर्माण होण्याची गरज आहे. देश भ्रष्टाचारमुक्त झाला नाही, तर रोजगार निर्माण करणे, उद्योजक तयार करणे कठीण जाईल. भ्रष्टाचारमुक्तीसाठी नोटाबंदी होणे गरजेचे आहे, असे मत अर्थतज्ज्ञ अभिजित फडणीस यांनी व्यक्त केले. ‘राष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवली’च्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे पहिले पुष्प फडणीस यांनी गुंफले. या वेळी ते बोलत होते. ‘जागतिक अर्थकारण आणि भारत’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्षा सुलभा डोंगरे, कार्यवाह संजय कुलकर्णी उपस्थित होते. फडणीस म्हणाले की, पायाभूत साधने असतील, तरच आपण जगाशी लढू शकतो. सोने, जागेमध्ये केलेली गुंतवणूक ही काढून घेऊन तोच पैसा, व्यापारवृद्धीसाठी गुंतवणूक करणे, ही काळाची गरज आहे. त्यानुसार, सध्याचे सरकार कार्य करीत आहे. याचाच परिणाम म्हणून सरकारने कारखान्यांवरील कर कमी केले आहेत. रासायनिक द्रव्यांचा वापर यामुळे जमिनीचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकरी हळूहळू देशात नैसर्गिक व जैविक शेतीकडे वळत आहे. जर्सी गायी हे एक मोठे संकट आले आहे. पुन्हा देशी गायीकडे वळण्याची गरज आहे. तरच, शेतकरी समृद्ध होईल. त्यासाठी आपण हातभार लावला पाहिजे. भारत हा इतर देशांच्या तुलनेत बुद्धिमान देश असल्याने मिळालेल्या संधीचे सोने करतो. नव्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू आहे. आर्थिक व्यवहारही बोटांच्या ठशांच्या साहाय्याने होणार आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह संजय कुलकर्णी, पाहुण्यांचा परिचय आनंद रानडे, सूत्रसंचालन नयना पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)>व्याजदर आणखी कमी होणारनोटाबंदीनंतर व्याजदर कमी झाले आहेत. हे व्याजदर येणाऱ्या काळात आणखी कमी होतील. जगातील अनेक देशांत उणे व्याजदर आहेत. ही संकल्पना न रुचणारी आहे. काही देश तर आपले पैसे सांभाळण्यासाठी पैसे मोजतात. वेगळ्या वाटेकडे आपला देश जाणार आहे. भ्रष्टाचार, महागाई, काळी अर्थव्यवस्था कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तसेच मानवी संसाधनांचा पूर्ण वापर करावा लागणार आहे.