शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

बदलाचा आग्रह नाही, पण शिंदे चालतील

By admin | Updated: June 21, 2014 01:35 IST

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याची मागणी आम्ही काँग्रेस नेतृत्वाकडे केलेली नाही. मुख्यमंत्र्यांना बदलायचे की ठेवायचे, हा अधिकार त्यांचा आहे.

मुंबई :  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याची मागणी आम्ही काँग्रेस नेतृत्वाकडे केलेली नाही. मुख्यमंत्र्यांना बदलायचे की ठेवायचे, हा अधिकार त्यांचा आहे. उद्या सुशीलकुमार शिंदे आले तरी आमची काही हरकत नसेल, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
गुरुवारी दिल्लीत शरद पवार यांनी कॉंग्रेसचे नेते ए.के. अॅण्थनी, अहमद पटेल यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर राज्यात सुरू झालेली मुख्यमंत्री बदलाची चर्चा यावर पवारांनी आज स्पष्टीकरण दिले. या चर्चेत अनेक नावे मुख्यमंत्रीपदासाठी आली होती. तसेच बदलासाठी काँग्रेस श्रेष्ठींनी चाचपणी आणि विचारविनिमय सुरू केल्याची चर्चा काल दिवसभर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. याबाबत स्पष्टीकरण देताना पवार म्हणाले, महाराष्ट्रासह आसाम आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना बदलण्याचा विचार काँग्रेसचे नेतृत्व करीत आहे.  पण मुख्यमंत्री चव्हाण यांना आमचा विरोध नाही. कॉंग्रेसने नेतृत्व बदलाचा निर्णय घेतला तर ते आमच्याशी सल्लामसलत करतीलच, असेही पवार म्हणाले. 
मनसेच्या शिडात हवा !
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगिरी विधानसभा निवडणुकीत सुधारेल, असा अंदाज पवार यांनी वर्तविला. ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीत मनसे हा मतदारांसाठी सक्षम पर्याय नव्हता.  मात्र विधानसभेत वेगळे चित्र असेल असे सांगत पवार यांनी मनसेच्या शिडात हवा भरली. (विशेष प्रतिनिधी)
 
काँग्रेस श्रेष्ठींची पवारांना गळ
विधानसभा निवडणूक आपल्या नेतृत्वात लढवावी, असा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह आहे, पण राज्यात परतण्याची आपली इच्छा नाही, असे आपण त्यांना सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचाराची धूरा सांभाळण्याची आपली तयारी आहे, असे पवार म्हणाले. काँग्रेससोबत जागावाटपात काही अडचण येणार नाही. आम्हाला जागा वाढवून हव्या आहेत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
 
राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना संघटनेत पाठविणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांचे राजीनामे घेऊन त्यांना पक्षसंघटनेची जबाबदारी दिली जाणार आहे. येत्या आठ दिवसांत याबाबतचा निर्णय होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना बदलले जाणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते. पवार यांनी पक्षसंघटनेत बदल केले जाणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. 
ते म्हणाले की मुख्यमंत्री बदलले किंवा न बदलले तरी राष्ट्रवादीने काही बदल करण्याचे ठरविले आहे. मंत्रिमंडळातून कोण वगळले जाणार, याबाबत पवार यांनी गुप्तता बाळगली, तरी सूत्रंनुसार जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपद दिले जाऊ शकते. गृहमंत्री आर. आर.पाटील यांचेही नाव विचाराधीन आहे. पवार यांनी आज दुपारी छगन भुजबळ व आर. आर. पाटील यांच्याशी चर्चा केली.