शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

अडतमुक्त असलेल्या जळगावच्या बाजार समितीत व्यापा-यांच्या बंदचा परिणाम नाही

By admin | Updated: July 13, 2016 19:33 IST

शेतक-यांच्या शेतमाल विक्रीवरील अडत ही व्यापा-यांकडून घेण्यात यावी, असा अध्यादेश शासनाने काढला आहे. या अध्यादेशाविरोधात राज्यभर अडते-व्यापा-यांचे आंदोलन सुरु असले

खामगाव : शेतक-यांच्या शेतमाल विक्रीवरील अडत ही व्यापा-यांकडून घेण्यात यावी, असा अध्यादेश शासनाने काढला आहे. या अध्यादेशाविरोधात राज्यभर अडते-व्यापा-यांचे आंदोलन सुरु असले तरी जळगाव जामोद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या आंदोलनाचा काहीही परिणाम नाही. या बाजार समितीत शेतकºयांच्या शेतमालावर अडतच घेतली जात नसल्याने येथील शेतमाल खरेदी विक्रीची रेलचेल नेहमीप्रमाणे सुरु आहे.
     महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापनेपासून जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकमेव अडतमुक्त बाजार समिती आहे. याठिकाणी बाजारात माल आणणा-या शेतक-यांना एक रूपयाही अडत द्यावी लागत नाही. त्यामुळे दरवर्षी या तालुक्यातील शेतकºयांची कोट्यावधीची अडत वाचते. 
      शासनाने शेतक-यांची अडतीच्या जोखडातून मुक्तता करीत त्यांचा शेतमाल थेट विक्रीची मुभा दिली. फळे व भाजीपाला बाजार समितीत आणि समितीबाहेर विकण्याची मुभा दिली. त्यामुळे सध्या अडत्यांनी बंद पुकारला आहे. जळगाव जामोद कृउबास मध्ये महत्वपूर्ण असा आसलगाव धान्य बाजार आहे. त्यानंतर जामोद आणि पिंपळगाव काळे हे दोन उपबाजार आहेत. यापैकी जामोद येथेही धान्य खरेदी मोठ्या प्रमाणावर चालते. शेतक-यांचे हित लक्षात घेता. या बाजार समितीत स्थापनेपासून अंदाजे ४० वर्षापासून शेतक-यांना अडत द्यावी लागत नाही. राज्य शासन शेतक-यांना अडतमुक्त करीत ती अडत व्यापा-यांकडे लोटण्याचा प्रयत्न करीत आहे. अडत मुक्तीची परंपरा जोपासत ही बाजार समिती शेतकरी  हितास ख-या अर्थाने हातभार लावणारी ठरली आहे.