शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

शांततेशिवाय आर्थिक, सामाजिक प्रगती नाही

By admin | Updated: August 15, 2014 03:09 IST

असहिष्णुता व हिंसाचार लोकशाहीच्या मूळ भावनेविरुद्ध असल्याचे सांगून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रक्षोभक भाषणांबद्दल चिंता व्यक्त केली

नवी दिल्ली : असहिष्णुता व हिंसाचार लोकशाहीच्या मूळ भावनेविरुद्ध असल्याचे सांगून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रक्षोभक भाषणांबद्दल चिंता व्यक्त केली. आर्थिक, सामाजिक किंवा कोणत्याही प्रकारची प्रगती शांतता आणि अहिंसेशिवाय शक्य नाही, असेही ते म्हणाले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना मुखर्जी यांनी कट्टरवादाचा उल्लेख केला आणि पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक अशांत असलेल्या आंतरराष्ट्रीय वातावरणाने अनेक धोके निर्माण केले आहेत, असे ते म्हणाले.प्राचीन सभ्यता असूनसुद्धा भारत नवीन स्वप्न असलेले आधुनिक राष्ट्र आहे. असहिष्णुता आणि हिंसाचार लोकशाहीच्या मूळ भावनेशी दगाबाजी आहे. प्रक्षोभक आणि विखारी भाषणांवर विश्वास करणाऱ्यांना एकतर भारताच्या मूल्यांचे आणि विद्यमान राजकीय भान नाही. शांततेशिवाय आर्थिक, सामाजिक किंवा कुठल्याही प्रकारची प्रगती करता येणे शक्य नाही, याची जाणीव भारतीयांना आहे, असेही ते म्हणाले. संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणण्याच्या प्रकाराबद्दल नापसंती व्यक्त करीत राष्ट्रपती मुखर्जी यांनी लोकशाहीला बळकट करणाऱ्या संस्थांची श्रेष्ठता आणि सन्मान पुनर्स्थापित करणे काळाजी गरज असल्याचे म्हटले आहे. मुखर्जी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. औरंगजेबाने जिझीया लावल्यानंतर शिवाजी महाराजांनी हे पत्र लिहिले होते. शहाजहाँ, जहाँगीर आणि अकबरदेखील हा कर लावू शकले असते. परंतु त्यांनी आपल्या मनात कट्टरतेला स्थान दिले नाही. कारण त्यांना वाटत होते की, ईश्वराने प्रत्येक लहान-मोठ्या व्यक्तीला वेगवेगळे मत आणि स्वभावाच्या स्वरूपात सादर केले आहे. १७ व्या शतकातील हे पत्र एक संदेश आहे, असे मुखर्जी म्हणाले. (वृत्तसंस्था)