शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
4
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
5
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
6
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
7
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
8
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
9
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
11
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
12
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
13
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
14
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
16
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
17
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
18
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
19
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
20
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
Daily Top 2Weekly Top 5

शांततेशिवाय आर्थिक, सामाजिक प्रगती नाही

By admin | Updated: August 15, 2014 03:09 IST

असहिष्णुता व हिंसाचार लोकशाहीच्या मूळ भावनेविरुद्ध असल्याचे सांगून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रक्षोभक भाषणांबद्दल चिंता व्यक्त केली

नवी दिल्ली : असहिष्णुता व हिंसाचार लोकशाहीच्या मूळ भावनेविरुद्ध असल्याचे सांगून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रक्षोभक भाषणांबद्दल चिंता व्यक्त केली. आर्थिक, सामाजिक किंवा कोणत्याही प्रकारची प्रगती शांतता आणि अहिंसेशिवाय शक्य नाही, असेही ते म्हणाले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना मुखर्जी यांनी कट्टरवादाचा उल्लेख केला आणि पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक अशांत असलेल्या आंतरराष्ट्रीय वातावरणाने अनेक धोके निर्माण केले आहेत, असे ते म्हणाले.प्राचीन सभ्यता असूनसुद्धा भारत नवीन स्वप्न असलेले आधुनिक राष्ट्र आहे. असहिष्णुता आणि हिंसाचार लोकशाहीच्या मूळ भावनेशी दगाबाजी आहे. प्रक्षोभक आणि विखारी भाषणांवर विश्वास करणाऱ्यांना एकतर भारताच्या मूल्यांचे आणि विद्यमान राजकीय भान नाही. शांततेशिवाय आर्थिक, सामाजिक किंवा कुठल्याही प्रकारची प्रगती करता येणे शक्य नाही, याची जाणीव भारतीयांना आहे, असेही ते म्हणाले. संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणण्याच्या प्रकाराबद्दल नापसंती व्यक्त करीत राष्ट्रपती मुखर्जी यांनी लोकशाहीला बळकट करणाऱ्या संस्थांची श्रेष्ठता आणि सन्मान पुनर्स्थापित करणे काळाजी गरज असल्याचे म्हटले आहे. मुखर्जी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. औरंगजेबाने जिझीया लावल्यानंतर शिवाजी महाराजांनी हे पत्र लिहिले होते. शहाजहाँ, जहाँगीर आणि अकबरदेखील हा कर लावू शकले असते. परंतु त्यांनी आपल्या मनात कट्टरतेला स्थान दिले नाही. कारण त्यांना वाटत होते की, ईश्वराने प्रत्येक लहान-मोठ्या व्यक्तीला वेगवेगळे मत आणि स्वभावाच्या स्वरूपात सादर केले आहे. १७ व्या शतकातील हे पत्र एक संदेश आहे, असे मुखर्जी म्हणाले. (वृत्तसंस्था)