शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

कोंडी फोडण्याचा आराखडाच नाही

By admin | Updated: March 1, 2017 03:53 IST

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी अन्यथा रस्त्यांच्या कामांना परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणी डोंबिवलीतील नगरसेवकांनी केली

अनिकेत घमंडी,डोंबिवली- शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी अन्यथा रस्त्यांच्या कामांना परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणी डोंबिवलीतील नगरसेवकांनी केली होती. त्याची दखल घेत कोंडी फोडण्यासाठी तीन दिवसांत आराखडा सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी वाहतूक विभागाला दिले होते. मात्र, त्यास १५ दिवस उलटूनही आराखडाच तयार नसल्याची बाब माहिती समोर आली आहे.शहरातील पूर्व व पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसर, केळकर रोड, मानपाडा, शेलार नाका, टिळक पथ, चार रस्ता, शिवमंदिर रोड, दत्तनगर आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. ती फोडण्यासाठी वाहतूक विभागामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच इंदिरा गांधी चौक, रामनगर परिसरातील स्वामी विवेकानंद रोडवर वाहतूक शाखेसमोरच रिक्षाचालकांची मनमानी पाहायला मिळते. वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच काही रिक्षाचालक रिक्षा बंदचा नारा देतात. त्यामुळे कारवाई स्थगित होते. दुसरीकडे भगत सिंग रोड, टिळक पथवर असलेल्या बहुतांशी मंगल कार्यालयांबाहेर उभ्या केल्या जाणाऱ्या चारचाकी गाड्यांमुळे कोंडीत भर पडते. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो. मंगल कार्यालय चालक-व्यवस्थापकांवर कारवाई होत नसल्याने कोंडी होते, असा आरोप वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच केला. दुसरीकडे महापालिकेकडे देखिल कोणतेही नियोजन नाही. एकेरी वाहतूक, पार्किंगची सुविधा नाही. सम-विषम पार्किंगचे नियमही वाहनचालकांकडून खुलेआम धाब्यावर बसवले जातात. या प्रकारांमुळे डोंबिवलीत वाहतूक नियोजनाचा बोजवारा उडत आहे. पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर नेहमीच कोंडी होते. शुक्रवार ते रविवार येथे वाहने अक्षरश: अडकून पडतात. त्यामुळे वाहनाने पूर्व-पश्चिमेला ये-जा करणे हा द्रविडीप्राणायमच आहे, असे मत पश्चिमेतील नगरसेवकांनी व्यक्त केले. त्यासाठी १५दिवसांपूर्वी महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायीचे सभापती रमेश म्हात्रे, आयुक्त रवींद्रन, वाहतूक नियंत्रण विभागाचे अधिकारी आदींनी आढावा बैठक घेतली होती. त्यात तीन दिवसांत आराखडा द्यावा, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आदेश रवींद्रन यांनी दिले होते. मात्र आराखडा कागदावरही तयार झाला नसल्याने आदेशाला हरताळ फासल्याची चर्चा वाहतूक कर्मचारी व लोकप्रतिनिधींमध्ये सुरू आहे. >केडीएमसी आयुक्त रवींद्रन यांच्या सांगण्यानुसार तीन दिवसांत आराखडा द्यायचा होता, पण निवडणुकांची आचारसंहिता, बंदोबस्त तसेच काही अधिकारी रजेवर असल्याने ते काम अद्यापही झालेले नाही. दोन-तीन दिवसांत ते केले जाईल. - अक्षय आव्हाड, सहायक पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग. मला यासंदर्भात काहीही माहिती नाही. मी वैयक्तिक कारणांमुळे रजेवर होतो. पण यासंदर्भात माहिती घेतली जाईल. - गोविंद गंभीरे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण विभाग, डोंबिवली.