शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कोंडी फोडण्याचा आराखडाच नाही

By admin | Updated: March 1, 2017 03:53 IST

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी अन्यथा रस्त्यांच्या कामांना परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणी डोंबिवलीतील नगरसेवकांनी केली

अनिकेत घमंडी,डोंबिवली- शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी अन्यथा रस्त्यांच्या कामांना परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणी डोंबिवलीतील नगरसेवकांनी केली होती. त्याची दखल घेत कोंडी फोडण्यासाठी तीन दिवसांत आराखडा सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी वाहतूक विभागाला दिले होते. मात्र, त्यास १५ दिवस उलटूनही आराखडाच तयार नसल्याची बाब माहिती समोर आली आहे.शहरातील पूर्व व पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसर, केळकर रोड, मानपाडा, शेलार नाका, टिळक पथ, चार रस्ता, शिवमंदिर रोड, दत्तनगर आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. ती फोडण्यासाठी वाहतूक विभागामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच इंदिरा गांधी चौक, रामनगर परिसरातील स्वामी विवेकानंद रोडवर वाहतूक शाखेसमोरच रिक्षाचालकांची मनमानी पाहायला मिळते. वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच काही रिक्षाचालक रिक्षा बंदचा नारा देतात. त्यामुळे कारवाई स्थगित होते. दुसरीकडे भगत सिंग रोड, टिळक पथवर असलेल्या बहुतांशी मंगल कार्यालयांबाहेर उभ्या केल्या जाणाऱ्या चारचाकी गाड्यांमुळे कोंडीत भर पडते. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो. मंगल कार्यालय चालक-व्यवस्थापकांवर कारवाई होत नसल्याने कोंडी होते, असा आरोप वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच केला. दुसरीकडे महापालिकेकडे देखिल कोणतेही नियोजन नाही. एकेरी वाहतूक, पार्किंगची सुविधा नाही. सम-विषम पार्किंगचे नियमही वाहनचालकांकडून खुलेआम धाब्यावर बसवले जातात. या प्रकारांमुळे डोंबिवलीत वाहतूक नियोजनाचा बोजवारा उडत आहे. पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर नेहमीच कोंडी होते. शुक्रवार ते रविवार येथे वाहने अक्षरश: अडकून पडतात. त्यामुळे वाहनाने पूर्व-पश्चिमेला ये-जा करणे हा द्रविडीप्राणायमच आहे, असे मत पश्चिमेतील नगरसेवकांनी व्यक्त केले. त्यासाठी १५दिवसांपूर्वी महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायीचे सभापती रमेश म्हात्रे, आयुक्त रवींद्रन, वाहतूक नियंत्रण विभागाचे अधिकारी आदींनी आढावा बैठक घेतली होती. त्यात तीन दिवसांत आराखडा द्यावा, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आदेश रवींद्रन यांनी दिले होते. मात्र आराखडा कागदावरही तयार झाला नसल्याने आदेशाला हरताळ फासल्याची चर्चा वाहतूक कर्मचारी व लोकप्रतिनिधींमध्ये सुरू आहे. >केडीएमसी आयुक्त रवींद्रन यांच्या सांगण्यानुसार तीन दिवसांत आराखडा द्यायचा होता, पण निवडणुकांची आचारसंहिता, बंदोबस्त तसेच काही अधिकारी रजेवर असल्याने ते काम अद्यापही झालेले नाही. दोन-तीन दिवसांत ते केले जाईल. - अक्षय आव्हाड, सहायक पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग. मला यासंदर्भात काहीही माहिती नाही. मी वैयक्तिक कारणांमुळे रजेवर होतो. पण यासंदर्भात माहिती घेतली जाईल. - गोविंद गंभीरे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण विभाग, डोंबिवली.