शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

‘समृद्धी’तील ‘टाऊनशिप’मध्ये बदल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:42 IST

नागपूर-मुंबई या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गात उभारण्यात येणाऱ्या कोणत्याही नवनगरांच्या (टाऊनशिप, कृषी समृद्धी केंद्र) आधी निश्चित केलेल्या स्थानांमध्ये

यदु जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागपूर-मुंबई या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गात उभारण्यात येणाऱ्या कोणत्याही नवनगरांच्या (टाऊनशिप, कृषी समृद्धी केंद्र) आधी निश्चित केलेल्या स्थानांमध्ये कोणताही बदल न करण्याची भूमिका राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतली आहे. तीन नवनगरांच्या जागांची अधिसूचना नगरविकास विभागाने आज काढली. समृद्धी महामार्गाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, ठाणे जिल्ह्यातील नवनगराची जागा बदलली जाईल, असे चित्र निर्माण करण्यात आले होते. तथापि, मौजे नाडगाव, पितांबरे, चिंचवली, उटणे आणि आंबिवली, वासुंद्री या गावांना ंमिळून एका नवनगराची निर्मिती केली जाईल. समृद्धी महामार्गामुळे नागपूर-मुंबई हे अंतर केवळ सहा तासांत कापता येणार आहे. या महामार्गावर कृषी प्रक्रिया उद्योगांची आणि एकूणच कृषी समृद्धीसाठीच्या आवश्यक बाबींचा समावेश असलेली नवनगरे निर्माण करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यात येतील. स्थानिक कृषी मालावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करून अवघ्या काही तासांत तयार माल मुंबई वा मुंबईमार्गे जगात पोहोचविणे त्यामुळे शक्य होणार आहे. या महामार्गाची उभारणी राज्य सस्ते विकास महामंडळ करणार असून, त्यांनाच नवनगर विकास प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या नवनगरामध्ये मुंडमाळी (अंशत: क्षेत्र), मुंड निशंकराव (अंशत: क्षेत्र), मुंड हिंदुराव (अंशत: क्षेत्र), शिवनी, रसूलपूर (अंशत: क्षेत्र) आणि गवनेर तळेगाव (अंशत: क्षेत्र) या गावांचा समावेश असेल. औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर वैजापूर आणि कोपरगाव तालुक्यातील काही गावे मिळून एका नवनगराची उभारणी करण्यात येणार आहे. त्यात वैजापूर तालुक्यातील बाबतारा (अंशत: क्षेत्र), लाखगंगा (अंशत: क्षेत्र) आणि पुरणगाव (अंशत: क्षेत्र) तर कोपरगाव तालुक्यातील धोत्रे (अशंत: क्षेत्र) या गावांचा समावेश असेल. तिन्ही नवनगरांसंदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमान्वये जागावापराच्या बदलास नगरविकास विभागाने संमती दिली आहे. नागरिकांच्या हरकती व सूचना तीस दिवसांच्या आत संबंधित विभागाकडे नोंदविता येणार आहेत. समृद्धी महामार्गात नवनगरांच्या जागा या विचारपूर्वक आणि त्या भागातील विकासाला अत्यंत पूरक ठरतील अशा पद्धतीने निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यात बदल केला जाणार नाही. - राधेश्याम मोपलवार, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, राज्य रस्ते विकास महामंडळ.