शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

‘समृद्धी’तील ‘टाऊनशिप’मध्ये बदल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:42 IST

नागपूर-मुंबई या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गात उभारण्यात येणाऱ्या कोणत्याही नवनगरांच्या (टाऊनशिप, कृषी समृद्धी केंद्र) आधी निश्चित केलेल्या स्थानांमध्ये

यदु जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागपूर-मुंबई या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गात उभारण्यात येणाऱ्या कोणत्याही नवनगरांच्या (टाऊनशिप, कृषी समृद्धी केंद्र) आधी निश्चित केलेल्या स्थानांमध्ये कोणताही बदल न करण्याची भूमिका राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतली आहे. तीन नवनगरांच्या जागांची अधिसूचना नगरविकास विभागाने आज काढली. समृद्धी महामार्गाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, ठाणे जिल्ह्यातील नवनगराची जागा बदलली जाईल, असे चित्र निर्माण करण्यात आले होते. तथापि, मौजे नाडगाव, पितांबरे, चिंचवली, उटणे आणि आंबिवली, वासुंद्री या गावांना ंमिळून एका नवनगराची निर्मिती केली जाईल. समृद्धी महामार्गामुळे नागपूर-मुंबई हे अंतर केवळ सहा तासांत कापता येणार आहे. या महामार्गावर कृषी प्रक्रिया उद्योगांची आणि एकूणच कृषी समृद्धीसाठीच्या आवश्यक बाबींचा समावेश असलेली नवनगरे निर्माण करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यात येतील. स्थानिक कृषी मालावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करून अवघ्या काही तासांत तयार माल मुंबई वा मुंबईमार्गे जगात पोहोचविणे त्यामुळे शक्य होणार आहे. या महामार्गाची उभारणी राज्य सस्ते विकास महामंडळ करणार असून, त्यांनाच नवनगर विकास प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या नवनगरामध्ये मुंडमाळी (अंशत: क्षेत्र), मुंड निशंकराव (अंशत: क्षेत्र), मुंड हिंदुराव (अंशत: क्षेत्र), शिवनी, रसूलपूर (अंशत: क्षेत्र) आणि गवनेर तळेगाव (अंशत: क्षेत्र) या गावांचा समावेश असेल. औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर वैजापूर आणि कोपरगाव तालुक्यातील काही गावे मिळून एका नवनगराची उभारणी करण्यात येणार आहे. त्यात वैजापूर तालुक्यातील बाबतारा (अंशत: क्षेत्र), लाखगंगा (अंशत: क्षेत्र) आणि पुरणगाव (अंशत: क्षेत्र) तर कोपरगाव तालुक्यातील धोत्रे (अशंत: क्षेत्र) या गावांचा समावेश असेल. तिन्ही नवनगरांसंदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमान्वये जागावापराच्या बदलास नगरविकास विभागाने संमती दिली आहे. नागरिकांच्या हरकती व सूचना तीस दिवसांच्या आत संबंधित विभागाकडे नोंदविता येणार आहेत. समृद्धी महामार्गात नवनगरांच्या जागा या विचारपूर्वक आणि त्या भागातील विकासाला अत्यंत पूरक ठरतील अशा पद्धतीने निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यात बदल केला जाणार नाही. - राधेश्याम मोपलवार, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, राज्य रस्ते विकास महामंडळ.