शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

... तर मला गोळ्या घातल्या तरी चालतील - श्रीपाल सबनीस

By admin | Updated: February 3, 2017 21:19 IST

मी या सर्वाचा निषेध करत राहीन, मग मला गोळ्या मारल्या तरी चालतील. असा घणाघात मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस

ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 3 -  महाराष्ट्रामध्ये गोविंद पानसरे,  नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या हत्या होतात, हे योग्य नाही. मलाही धमक्या आल्या. माझी बायकोही भीती व्यक्त करते. सनातन धर्माच्या व्यक्तींकडून मला धमक्या आल्यानंतर मला संरक्षण देण्यात आले. पण साहित्यिकाला पोलिसांच्या बंदुकीचे संरक्षण मिळावे हे योग्य नाही.  या दहशत चा मी निषेध करतो . ज्या देशात म्हाताम्याच्या मारेकऱ्याची मंदिर होतात ते किती योग्य  आहे. ब्राह्मण,दलित आपापसात संशयाने बघत आहेत. विद्वानही उजवीकडे डावीकडे विभागले गेले आहेत. मी या सर्वाचा निषेध करत राहीन, मग मला गोळ्या मारल्या तरी चालतील. असा घणाघात मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी 90 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केला. 
परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आणि वर्षभर सडेतोड बोलून मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची कारकीर्द गाजवणाऱ्या सबनीय यांनी अध्यक्षीय कारकीर्दीचा शेवटही तितकाच घणाघाती भाषणाने केला. संयुक्त महाराष्ट्रापासून गांधीहत्येपर्यंत  आणि वैचारिक वादापासून  साहित्यिकांमधील जातीयवादापर्यंत सर्वाचा त्यांनी घणाघाती समाचार घेतला. 
ते म्हणाले, "दाभोलकर , पानसरे मारेकरी अद्याप मोकाट आहेत. इंग्लडच्या तोडीचे आपले पोलीस खाते झोपा काढत आहे. महाराष्ट्राच्या अंतःकरणात आक्रोश आहेत. मलाही सनातन धर्माच्या व्यक्तीकडून धमकी मिळाली आहे. एखाद्या लेखकाला पोलीस संरक्षण मिळावे हे महाराष्ट्राचे दुर्दैव. दहशतीखाली सत्य समोर येत नसते. मी या दहशतीचा निषेध करतो. ब्राह्मणांचा, बहुजनांचा, मराठ्यांचा जातीयवाद यामध्ये महाराष्ट्र जळतोय. संस्कृती दुभंगतेय, समाज दुभंगतोय. मी उजवाही नाही, डावाही नाही.  मी या सर्वांचा विरोध करत राहीन, मला गोळ्या घातल्या तरी चालतील."
यावेळी संयुक्त महाराष्ट्राचा मुद्दाही प्रभावीपणे मांडताना सबनीस यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. "बेळगावचा सीमा प्रश्न भिजत पडला आहे. तिथे मराठी माणूस यातना भोगतोय. कन्नड अत्याचार प्रचंड वाढलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना मदत करणे हे शासनाचे आद्यकर्तव्य आहे. विदर्भाचा बॅकलॉग अपूर्ण आहे. त्यातून स्वतंत्र विदर्भाची मागणी होतेय. पण महाराष्ट्र खंडित झाला तर तो हुतात्म्यांचा अपमान असेल.  विदर्भावरील अन्याय दूर करण्याचा कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. तुमच्या पक्षाचे धोरण कोणतेही असो. महाराष्ट्राचा सांस्कृतिक नकाशा फुटलेला चालणार नाही," असे सबनीस यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सुनावले.  
"बहुजनांचा विद्वानांचा जातीयवाद हानिकारक आहे. ब्राह्मणांचा इतिहास पक्षपाती असेल तर ब्राह्मणेतर इतिहासही पक्षपाती आहे. दोन्ही विकृतींचा निषेध करतो. माणूस म्हणून जोडणारे सत्य हवे. म्हणून आज मी अक्षयकुमार काळे यांना सूत्राऐवजी सत्य प्रदान करतो,"असे सांगत सबनीस यांना साहित्य संमेलनाची सूत्रे काळे यांच्या कडे सोपवली.