शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

... तर मला गोळ्या घातल्या तरी चालतील - श्रीपाल सबनीस

By admin | Updated: February 3, 2017 21:19 IST

मी या सर्वाचा निषेध करत राहीन, मग मला गोळ्या मारल्या तरी चालतील. असा घणाघात मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस

ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 3 -  महाराष्ट्रामध्ये गोविंद पानसरे,  नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या हत्या होतात, हे योग्य नाही. मलाही धमक्या आल्या. माझी बायकोही भीती व्यक्त करते. सनातन धर्माच्या व्यक्तींकडून मला धमक्या आल्यानंतर मला संरक्षण देण्यात आले. पण साहित्यिकाला पोलिसांच्या बंदुकीचे संरक्षण मिळावे हे योग्य नाही.  या दहशत चा मी निषेध करतो . ज्या देशात म्हाताम्याच्या मारेकऱ्याची मंदिर होतात ते किती योग्य  आहे. ब्राह्मण,दलित आपापसात संशयाने बघत आहेत. विद्वानही उजवीकडे डावीकडे विभागले गेले आहेत. मी या सर्वाचा निषेध करत राहीन, मग मला गोळ्या मारल्या तरी चालतील. असा घणाघात मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी 90 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केला. 
परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आणि वर्षभर सडेतोड बोलून मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची कारकीर्द गाजवणाऱ्या सबनीय यांनी अध्यक्षीय कारकीर्दीचा शेवटही तितकाच घणाघाती भाषणाने केला. संयुक्त महाराष्ट्रापासून गांधीहत्येपर्यंत  आणि वैचारिक वादापासून  साहित्यिकांमधील जातीयवादापर्यंत सर्वाचा त्यांनी घणाघाती समाचार घेतला. 
ते म्हणाले, "दाभोलकर , पानसरे मारेकरी अद्याप मोकाट आहेत. इंग्लडच्या तोडीचे आपले पोलीस खाते झोपा काढत आहे. महाराष्ट्राच्या अंतःकरणात आक्रोश आहेत. मलाही सनातन धर्माच्या व्यक्तीकडून धमकी मिळाली आहे. एखाद्या लेखकाला पोलीस संरक्षण मिळावे हे महाराष्ट्राचे दुर्दैव. दहशतीखाली सत्य समोर येत नसते. मी या दहशतीचा निषेध करतो. ब्राह्मणांचा, बहुजनांचा, मराठ्यांचा जातीयवाद यामध्ये महाराष्ट्र जळतोय. संस्कृती दुभंगतेय, समाज दुभंगतोय. मी उजवाही नाही, डावाही नाही.  मी या सर्वांचा विरोध करत राहीन, मला गोळ्या घातल्या तरी चालतील."
यावेळी संयुक्त महाराष्ट्राचा मुद्दाही प्रभावीपणे मांडताना सबनीस यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. "बेळगावचा सीमा प्रश्न भिजत पडला आहे. तिथे मराठी माणूस यातना भोगतोय. कन्नड अत्याचार प्रचंड वाढलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना मदत करणे हे शासनाचे आद्यकर्तव्य आहे. विदर्भाचा बॅकलॉग अपूर्ण आहे. त्यातून स्वतंत्र विदर्भाची मागणी होतेय. पण महाराष्ट्र खंडित झाला तर तो हुतात्म्यांचा अपमान असेल.  विदर्भावरील अन्याय दूर करण्याचा कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. तुमच्या पक्षाचे धोरण कोणतेही असो. महाराष्ट्राचा सांस्कृतिक नकाशा फुटलेला चालणार नाही," असे सबनीस यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सुनावले.  
"बहुजनांचा विद्वानांचा जातीयवाद हानिकारक आहे. ब्राह्मणांचा इतिहास पक्षपाती असेल तर ब्राह्मणेतर इतिहासही पक्षपाती आहे. दोन्ही विकृतींचा निषेध करतो. माणूस म्हणून जोडणारे सत्य हवे. म्हणून आज मी अक्षयकुमार काळे यांना सूत्राऐवजी सत्य प्रदान करतो,"असे सांगत सबनीस यांना साहित्य संमेलनाची सूत्रे काळे यांच्या कडे सोपवली.