शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

...तर संस्कृतीच्या प्रवाहित्वाला बाधा

By admin | Updated: March 1, 2017 04:02 IST

विचारसाहित्य नसल्याने बंदिस्त वातावरणात अडकल्यामुळे तयार झालेले समूह आहेत.

डोंबिवली : सध्याचे अल्पसंख्याक त्यांच्या संख्येमुळे नाहीतर त्यांना विचारसाहित्य नसल्याने बंदिस्त वातावरणात अडकल्यामुळे तयार झालेले समूह आहेत. शासन संस्था ही खुल्या विचारांचे दमन करणारी संस्था झाली, तर चाकोरी मोडणारे विचार अथवा गट एकत्र येऊ न देण्याचा प्रयत्न होईल. ही गोष्ट संस्कृतीच्या प्रवाहित्वाला बाधा आणणारी असेल, असे मत टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील समकालीन संस्कृती अभ्यास के ंद्राचे प्रमुख नागेश व्यंकट बाबू यांनी व्यक्त केले.पेंढरकर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे शनिवारी राष्ट्रीय स्तरावरील ‘भाषा, साहित्य, स्त्रीवाद आणि संस्कृती यामधील समकालीन प्रवाह’ या विषयावरील परिषद झाली. त्याची सुरुवात बाबू यांच्या बीजभाषणाने झाली. या वेळी ते बोलत होते. बाबू म्हणाले, भौतिक वास्तव व आभासी वास्तव यातील सीमारेषा पुसट होत आहे. जे वास्तव आहे, असे आपल्याला वाटते, ती कदाचित तंत्रज्ञानाची करामत असू शकते. आपले अस्तित्व काही साक्षीपुराव्यांनी सिद्ध होत असते. पण, हे साक्षीपुरावेच संगणकीय तंत्रज्ञानाद्वारे बनावटी होत जाण्याची भीषण शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. मंजुनाथ महाविद्यालयाच्या प्रा. सुशीला विजयकुमार यांनी ‘भाषा व संप्रेषण’ या विषयाचा आढावा घेताना विद्यार्थ्यांमध्ये संवादकौशल्ये विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी निरनिराळ्या शब्दांचे भावार्थ अभिनयाद्वारे वा प्रसंगी भ्रमणदूरध्वनीच्या मदतीनेही शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो, असे सांगितले. वर्तक महाविद्यालयातील प्रा. दीपा कात्रे म्हणाल्या, सुधा मूर्ती यांच्या लिखाणाची मुळे स्त्रीवादी साहित्यामध्ये सापडतात. संपूर्ण देशभर भ्रमण करणाऱ्या सुधा मूर्ती यांनी निरनिराळ्या स्त्री व्यक्तिरेखांचे रेखाटलेले भावविश्व त्यांच्या निरीक्षणातून व संवदेनशीलतेतून निर्माण झाले आहे. प्रा. दिनेशकुमार नायर यांनी सांगितले, सध्याचे युग हे डिजिटल तंत्रज्ञानाचे आहे. निरनिराळ्या समाजमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या संदेशांमुळेही भाषा साहित्य जिवंत राहू शकते. त्यामुळे सध्या लिखाणाची मूळ आवृत्ती कोणती आणि त्याची नक्कल कोणती, हे ओळखणे कठीण होत चालले आहे. अर्थात, शरीराचा नाश झाला तरी आत्मा जिवंत राहतो. हे सत्य भाषा साहित्यालाही लागू पडते, असे सांगितले.प्रा. सचिन एन. यांनी आपल्या ‘खैरलांजी, सैराट आणि मराठी माणूस’ या लेखनाचा संदर्भ घेत जातीवर आधारित भेदभाव नष्ट करण्यासाठी चिकित्सकतेची, स्वत:लाच पृच्छा करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी मांडले. विल्सन महाविद्यालयातील डॉ. मिशेल फिलीप यांनी सध्या प्रसारमाध्यमांद्वारे निर्माण होत असलेल्या व आपल्यावर लादल्या जात असलेल्या नवीन वास्तवाचा मात्र आपण मूकपणे स्वीकार करीत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, प्रास्ताविक प्राचार्या डॉ. अनुराधा रानडे यांनी केले. (प्रतिनिधी)>विविध विषयांवर विचारमंथन : या परिषदेसाठी भोपाळ, दिल्ली, कानपूर इत्यादी प्रांतांमधून तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतील महाविद्यालयांमधून ७५ प्राध्यापक उपस्थित होते.भाषा, साहित्य तसेच स्त्रीवाद व संस्कृती या विषयांवरील सत्रामध्ये सुमारे ६० प्राध्यापकांनी आपले शोधनिबंध सादर केले. दिवसभर निरनिराळ्या महत्त्वपूर्ण विषयांवर विचारमंथन झाले.