शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

नेत्यांनी परिपक्वता दाखविल्यास आघाडी शक्य - पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 05:43 IST

महाराष्ट्रातील फडणवीस सरकार हे मोदींच्या कृपेमुळे सत्तेत आले नाही. ते कोणाच्या कृपेमुळे आले हे तुम्हाला माहीत आहे, आमचे सरकार पाडले नसते तर राज्यात सत्तांतरच झाले नसते, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यांच्या टीकेचा रोष शरद पवार यांच्याकडे असला तरी त्यांचे थेट नाव न घेता चव्हाणांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. आता पुन्हा सत्तेत यायचे असेल तर देशाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी परिपक्वता दाखविल्यास आघाडी होऊ शकते, असेही ते म्हणाले.

पंढरपूर (जि. सोलापूर) : महाराष्ट्रातील फडणवीस सरकार हे मोदींच्या कृपेमुळे सत्तेत आले नाही. ते कोणाच्या कृपेमुळे आले हे तुम्हाला माहीत आहे, आमचे सरकार पाडले नसते तर राज्यात सत्तांतरच झाले नसते, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यांच्या टीकेचा रोष शरद पवार यांच्याकडे असला तरी त्यांचे थेट नाव न घेता चव्हाणांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. आता पुन्हा सत्तेत यायचे असेल तर देशाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी परिपक्वता दाखविल्यास आघाडी होऊ शकते, असेही ते म्हणाले.पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, केंद्र आणि राज्यातील कारभारावर लोक प्रचंड नाराज आहेत. काल जाहीर झालेल्या एका सर्वेक्षणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर नाराज असलेल्या लोकांची संख्या ही ७५ टक्के इतकी आहे. २०१४ च्या निवडणुकीत ३१ टक्के लोकांनी भाजपाला मतदान केले होते, तर त्यांच्या विरोधात ६९ टक्के लोकांनी मतदान केले होते. या सरकारचा कारभार पाहता नकारात्मक मतदानात वाढ होते आहे.केंद्र शासनाचे आयात निर्यात धोरण चुकल्याने त्याचे दूरगामी परिणाम कृषी अर्थ व्यवस्थेला भोगावे लागत आहेत. देशातील साखरेचे उत्पादन लक्षात न घेता केंद्र शासनाने ९ लाख टन साखर आयात केली. त्यामुळे देशातील साखरेचे दर कोसळले. सरकार चालविण्याचा अनुभव नसल्याने साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकरी या निर्णयामुळे अडचणीत आला. आता ७५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनुदान तुटपुंजे आहे. या तात्पुरत्या मलमपट्टीने काहीही होणार नाही, यासाठी काही धोरणात्मक निर्णय सरकारला घ्यावा लागेल, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेस