शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

नेत्यांनी परिपक्वता दाखविल्यास आघाडी शक्य - पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 05:43 IST

महाराष्ट्रातील फडणवीस सरकार हे मोदींच्या कृपेमुळे सत्तेत आले नाही. ते कोणाच्या कृपेमुळे आले हे तुम्हाला माहीत आहे, आमचे सरकार पाडले नसते तर राज्यात सत्तांतरच झाले नसते, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यांच्या टीकेचा रोष शरद पवार यांच्याकडे असला तरी त्यांचे थेट नाव न घेता चव्हाणांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. आता पुन्हा सत्तेत यायचे असेल तर देशाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी परिपक्वता दाखविल्यास आघाडी होऊ शकते, असेही ते म्हणाले.

पंढरपूर (जि. सोलापूर) : महाराष्ट्रातील फडणवीस सरकार हे मोदींच्या कृपेमुळे सत्तेत आले नाही. ते कोणाच्या कृपेमुळे आले हे तुम्हाला माहीत आहे, आमचे सरकार पाडले नसते तर राज्यात सत्तांतरच झाले नसते, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यांच्या टीकेचा रोष शरद पवार यांच्याकडे असला तरी त्यांचे थेट नाव न घेता चव्हाणांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. आता पुन्हा सत्तेत यायचे असेल तर देशाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी परिपक्वता दाखविल्यास आघाडी होऊ शकते, असेही ते म्हणाले.पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, केंद्र आणि राज्यातील कारभारावर लोक प्रचंड नाराज आहेत. काल जाहीर झालेल्या एका सर्वेक्षणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर नाराज असलेल्या लोकांची संख्या ही ७५ टक्के इतकी आहे. २०१४ च्या निवडणुकीत ३१ टक्के लोकांनी भाजपाला मतदान केले होते, तर त्यांच्या विरोधात ६९ टक्के लोकांनी मतदान केले होते. या सरकारचा कारभार पाहता नकारात्मक मतदानात वाढ होते आहे.केंद्र शासनाचे आयात निर्यात धोरण चुकल्याने त्याचे दूरगामी परिणाम कृषी अर्थ व्यवस्थेला भोगावे लागत आहेत. देशातील साखरेचे उत्पादन लक्षात न घेता केंद्र शासनाने ९ लाख टन साखर आयात केली. त्यामुळे देशातील साखरेचे दर कोसळले. सरकार चालविण्याचा अनुभव नसल्याने साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकरी या निर्णयामुळे अडचणीत आला. आता ७५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनुदान तुटपुंजे आहे. या तात्पुरत्या मलमपट्टीने काहीही होणार नाही, यासाठी काही धोरणात्मक निर्णय सरकारला घ्यावा लागेल, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेस