शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

कल्याण ग्रोथ सेंटरसाठी पुन्हा १० गावे तोडली

By admin | Updated: May 18, 2016 02:59 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकात २७ गावांचा समावेश करण्याचा मुद्दा वादग्रस्त

मुरलीधर भवार,

कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिकात २७ गावांचा समावेश करण्याचा मुद्दा वादग्रस्त ठरलेला असतानाच त्यातील १० गावे कल्याण ग्रोथ सेंटरसाठी तोडून त्यांचा ताबा एमएमआरडीएकडे देण्याची अधिसूचना सरकारने काढली आहे. त्यामुळे पालिकेत अवघी १७ गावे शिल्लक राहिली असून नेमका कशासाठी लढा द्यायचा यावरून संघर्ष समिती गोंधळून गेली आहे. पालिकेतून ही गावे थेट न वगळता भाजपा सरकारने त्यांची फाळणी केल्याची प्रतिक्रिया या गावांतील नेत्यांनी व्यक्त केली आहे. या कृतीतून भाजपाने सत्तेतील सहकारी शिवसेनेला आणि त्याचवेळी संघर्ष समितीलाही एकप्रकारे शह दिला आहे. समिताला झुलवत ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावे वेगवेगळी करण्याचा निर्णय घेतल्याची टीका सुरू झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या वर्षी १ जूनपासून ही २७ गावे पुन्हा समाविष्ट केली गेली. एक हजार ८९ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करुन तेथे कल्याण ग्रोथ सेंटर उभे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले होते. या ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून एक लाख रोजगार निर्मिती करण्याचे लक्ष्य असल्याचे भाजपच्या विकास परिषदेत त्यांनी स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात मात्र गावे पालिकेतच राहिली आणि त्यांची वेगळी नगरपालिका होण्याचे आश्वासनही तसेच राहिले. आधीचे वृत्त /पान ५।‘हा तर न्यायालयाचा अवमान’२७ गावे महापालिकेतून वगळून त्यांच्यासाठी स्वतंत्र नगरपालिका करावी, या मागणीसाठी संघर्ष समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ती याचिका न्यायप्रविष्ट आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनीही २७ गावांच्या विकासासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या दोन याचिका न्यायप्रविष्ट असताना राज्य सरकारने नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दहा गावांसाठी वेगळा व १७ गावांसाठी वेगळा करुन एकप्रकारे न्यायालयाचा अवमान केला आहे. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे याचिकाकत्यांनी स्पष्ट केले. ।ग्रोथ सेंटरमध्ये जाणारी गावे कल्याण ग्रोथ सेंटर ज्याठिकाणी विकसीत केले जाणार आहे. त्यात भोपर, संदप, उसरघर, घेसर, निळजे, काटई, माणगाव, कोळे, हेदूटणे आणि घारिवली या दहाचा समावेश आहे. त्यांचे नियोजन प्राधिकरण आता एमएमआरडीए असेल. ।महापालिकेत उरलेली गावेगोळवली, आजदे, पिसवली, दावडी, सोनारपाडा, मानपाडा, नांदिवली अंबरनाथ, नांदिवली पंचानंद, आशेळे, भोपर, माणेरे, आडीवली ढोकळी, चिंचपाडा, द्वारली, वसार, भाल, कुंभार्ली या गावांसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला आहे.।रिंग रोड पूरक ठरणार : कल्याण-डोंबिवली महापालिका रिंग रोडचा प्रकल्प एमएमआरडीएच्या मदतीने राबविणार आहे. महापालिका हद्दीतील सर्वेक्षण झाले आहे. २७ गावातील सागाव, घारिवली, माणगाव, भोपर, हेदूटणे या गावात रिंग रोडसाठी २५ मे रोजी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हा रिंग रोड ग्रोथ सेंटरला पूरक ठरणारा आहे. ।विकासात भेदभाव केल्याचा आरोप२७ गावे महापालिकेत आली तरी तेथे पालिकेला विकासकामे करता येत नव्हती. नियोजन प्राधिकरणाचा दर्जा एमएमआरडीएकडे होता. हा दर्जा महापालिकेकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. सरकारने त्यावर निर्णय घेत अधिसूचनाच प्रसिद्ध केली आणि १० गावांचा समावेश ग्रोथ सेंटरमध्ये आणि उर्वरित गावे महापालिकेकडे दिली. विकासाच्याबाबतीत हा सरकारचा भेदभाव असल्याची प्रतिक्रिया मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे. भाजपने विकासाच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप पाटील यांनी केला. ।‘पालिकेला पॅकेज द्या’कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवेळकर यांनी सांगितले, कल्याण ग्रोथ सेंटरमुळे १० गावांचे नियोजन प्राधिकरण एमएमआरडीए असले तरी विकासाचा मुद्दा सोडता पालिकेलाच त्या गावांना नागरी सुविधा पुरव्याव्या लागणार आहे. कल्याण-डोंबिवलीला स्मार्ट सिटी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी