शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांचे; सीमाप्रश्नी मुख्यमंत्री ठराव मांडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 06:29 IST

१९ डिसेंबरपासून अधिवेशन; २१ विधेयके मांडणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पेटलेला असताना राज्य विधिमंडळाच्या १९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमाप्रश्नी एक ठराव मांडणार आहेत. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत मंगळवारी निर्णय झाला. अधिवेशन दोन आठवडे म्हणजे ३० डिसेंबरपर्यंत चालेल. 

अधिवेशन ३० डिसेंबरपर्यंत चालविण्याचे तूर्त ठरले असले तरी सध्या २८ डिसेंबरपर्यंतचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे.  कामकाज सल्लागार समितीची नागपुरात २८ ला पुन्हा बैठक होऊन पुढील कार्यक्रम निश्चित केला जाईल. 

महाराष्ट्राच्या अखंडतेबाबत आणि सीमावासीय मराठी भाषकांच्या पाठीशी महाराष्ट्र भक्कमपणे उभा असल्यासंबंधीचा ठराव मुख्यमंत्री शिंदे अधिवेशनात मांडणार आहेत, तसेच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली.  अधिवेशनात अंदाजे २१ विधेयके सभागृहात मंजुरीसाठी  मांडली जाणार आहेत. विधान भवनात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या.

अधिवेशन किमान तीन आठवडे घ्या : अजित पवार  nकोरोनामुळे दोन वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. त्यामुळे नागपूर, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावे, अशी मागणी अजित पवार यांनी आजच्या बैठकीत केली. nविधिमंडळ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात अधिकाधिक भाग घेता यावा, यासाठी सभागृहाचे कामकाज सकाळी साडेनऊपासून सुरू व्हावे, आदी मागण्या पवार यांनी केल्या.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन