शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याची शोकांतिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 10:18 IST

सोयाबीन हे पीक भारतीय शेतकऱ्यांसाठी नवीन नाही.

डॉ. सोमिनाथ घोळवे, शेतीप्रश्नांचे अभ्यासक

सोयाबीन हे पीक भारतीय शेतकऱ्यांसाठी नवीन नाही. सध्या लागवड केलेल्या पिवळ्या दाण्याच्या जातींचा प्रसार ४५ वर्षांपूर्वी सुरू झाला. त्यातून सोयाबीन लागवडीची परंपरा निर्माण झाली. एवढेच नाही तर गेल्या दोन दशकांपासून शेतकऱ्यांना आधार देणारे नगदी पीक म्हणून ते पुढे आले. यावर्षी देशात ११८ ते २२० लाख हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड केली आहे, तर १२७ लाख टनांपेक्षा जास्त उत्पादन होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. मात्र, कृषी विभाग आणि विविध संस्थांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार चालू वर्षी सोयाबीन लागवड आणि उत्पादनात घट दर्शविली आहे.

तेलबियांच्या उत्पादनांपैकी सोयाबीनचा तेलाचा वाटा ४२ टक्के आहे, तर खाद्यतेलाचा विचार करता, सोयाबीन तेलाचा वाटा २९ टक्क्यांच्या घरात आहे. महाराष्ट्राचा विचार करता, तेलबियांची ३१.३८ टक्के क्षेत्रावर लागवड करण्यात येते. त्यात ९६.२१ टक्के एकट्या सोयाबीनची लागवड असते. कोरडवाहू आणि दुष्काळी असलेल्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यांमध्ये सोयाबीन पिकाची लागवड केली जाते.

सोयाबीनचा भाव ठरविताना उत्पादन 

खर्चाचा विचार न होता, दिसणाऱ्या मालाच्या गुणवत्तेचा विचार करण्यात येतो. सोयाबीनचा भाव ठरविण्यासाठी तीन प्रकारचे निकष लावले जातात.

१. मॉईश्चर (आर्द्रता किंवा ओल)२. फॉरेन मॅटर (माती, कचरा, काडी, दगड)३. डॅमेज (डागी, काळे पडलेले, सुरकुत्या पडलेले, पावसाने भिजलेले)

सोयाबीनचा भाव ठरविताना शेतकऱ्यांची मेहनत, कष्ट, श्रम, वेळ, केलेली गुंतवणूक आदींना काहीच महत्त्व नसते. शेतकरी केंद्रित किंवा उत्पादन खर्च केंद्रित विचार होत नाही. सोयाबीनला एक बाजार वस्तू स्वरूपात पाहून, त्याचे मूल्य ठरविले जाते. सोयाबीन शेतमालासाठी उत्पादन खर्च (मूल्य) किती आला आहे, याचा विचार होत नाही.

खरेदीचे नियम, अटी आणि शर्ती जाचक

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शासनाने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केली. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातील ५६२ खरेदी केंद्रांवर खरेदी सुरू होती. मात्र, या केंद्रांचे नियम, अटी आणि शर्ती जाचक व वेळखाऊ आहेत. 

तसेच अनेक खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीसाठी बारदान नसणे आणि केंद्रावर साठवण करण्यासाठी गोदामी रिकामे नसणे यामुळे खरेदी केंद्र बंद असल्याचे निदर्शनास आले.

परिणामी बहुतांश शेतकऱ्यांचा विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडे कल आहे. शेतकऱ्यांकडील सोयाबीनची पूर्ण विक्री होईपर्यंत सरकारने खरेदी चालू ठेवावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली. 

मात्र, कायदेशीरपणे ही मागणी मान्य केली असल्याचे व्यवहारातून दिसून आले नाही. एकूणच सोयाबीन लागवड वाढत असताना अधिक भाव मिळणे सोडा, मात्र हमीभावापेक्षा ८०० ते ९०० रुपये कमी दराने ते विकावे लागत आहे.

लागवडीचा एकरी खर्च किती ?

लागवडीपासून ते बाजारात येईपर्यंत सोयाबीनला १८ ते २० हजार रुपये एकरी खर्च येतो. त्यात शेतकरी व त्यांच्या कुटुंबाचा रोजंदारी खर्च पकडलेला नाही. प्रती एकर सरासरी पाच ते सहा क्विंटल उत्पादन मिळते.

व्यापाऱ्यांकडे ३,८०० ते ४,२०० रुपये प्रती क्विंटल भाव चालू आहे. यानुसार १९ हजार ते २५ हजार रुपये एकरी परतावा मिळतो. सोयाबीनला प्रती क्विंटल ४,८९२ रुपये हमीभाव आहे. त्यानुसार जास्तीत जास्त २९,३५२ रुपये मिळतात. 

मिळालेल्या पैशांमधून खर्च वजा करता एकरी जास्तीत जास्त नऊ हजार रुपये मिळतात. व्यापाऱ्यांकडे विक्री केली तर जास्तीत जास्त पाच हजार रुपये उत्पन्न मिळते. 

७,००० पेक्षा जास्त प्रती क्विंटल भाव मिळणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात सांभाळून ठेवले आहे. 

सोयाबीनचे भाव पडण्यामागे विदेशातून मोठ्या प्रमाणावर आयात करणे, व्यापारी लॉबी आणि मिल लॉबीचे हितसंबंध कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. 

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र