शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विधानसभा अध्यक्षांची निवड बजेट अधिवेशनात हाेणार; अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच नियुक्ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 12:20 IST

हिवाळी अधिवेशनात अध्यक्षांची निवड होऊ शकली नव्हती. या निवडीवरून राजभवन विरुद्ध राज्य सरकार असा वादही रंगला होता

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची दीर्घ काळापासून रखडलेली निवड विधिमंडळाच्या ३ मार्चपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात व्हावी, यासाठी पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. अर्थसंकल्प ११ मार्चला सादर होण्यापूर्वीच ही निवड होईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. या निवडीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. 

हिवाळी अधिवेशनात अध्यक्षांची निवड होऊ शकली नव्हती. या निवडीवरून राजभवन विरुद्ध राज्य सरकार असा वादही रंगला होता. गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड करणारे विधेयक तर सरकारने सभागृहात मंजूर करून घेतले. निवडीसाठी राज्यपालांची परवानगी घेण्याकरिता मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रस्ताव पाठविला होता. राज्यपालांनी घटनात्मक बाबी तपासून निर्णय देऊ, असे सांगितल्याने सरकार व राजभवनात संघर्षही बघायला मिळाला होता. ३ मार्चपासून अधिवेशन सुरू होत असताना पुन्हा अध्यक्ष निवडीची चर्चा सुरू झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी बुधवारी चर्चा झाली. मुख्यमंत्री ठाकरे हे अध्यक्ष निवडीचा नवा कार्यक्रम राज्यपालांकडे लवकरच पाठवतील व त्यास मंजुरी देण्याची विनंती करतील. 

थोरात म्हणाले, यावेळी निवड होण्यात अडचण येणार नाही. ११ मार्चपूर्वी अध्यक्ष निवड होईल. या पदासाठी कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी घेतील. 

 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरात