शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देवेंद्र फडणवीसांनी अगदी स्पष्टपणे डेडलाईनच सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 16:32 IST

सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण २० मंत्री आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक खाती आहेत

मुंबई - महाराष्ट्रात ६ महिन्यापूर्वी सत्तांतर घडले. महाविकास आघाडी सरकार कोसळले अन् एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. राज्यात शिंदे-फडणवीस जोडीचे सरकार आले. या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होण्यासाठी ३० दिवसांची वाट पाहावी लागली. त्यानंतर राज्य सरकारचा पहिला मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा पार पडला. यात अनपेक्षितपणे अनेकांना डच्चू देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल या अपेक्षेवर अनेक नेते आहेत. 

त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्टच भाष्य करत संकेत दिले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न सातत्याने राज्याच्या राजकारणात विचारला जात आहे. त्यासह इच्छुक नेतेही या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्यावर फडणवीसांनी उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला कुठलीही कायदेशीर अडचण नसल्याचं स्पष्ट केले आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कायदेशीर आणि घटनात्मक हे सरकार स्थापन करून कार्यरत आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे हे मलादेखील वाटते. कारण इतकी खाती सांभाळयची त्यापेक्षा आपल्याकडे दोन सभागृह आहेत. तेव्हा एकाच वेळी सभागृहात एकच चर्चा होते. त्यावेळी ओढताण होते. त्यामुळे विस्तार आम्हाला करायचा आहे आणि तो आम्ही करू असं त्यांनी म्हटलं. 

तसेच या विस्तारामध्ये कायदेशीर आणि संविधानिक कुठलीही अडचण नाही. योग्यवेळी हा विस्तार आम्ही करू. शक्यतोवर हा मंत्रिमंडळाचा विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच हा विस्तार करायचा आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे २७ फेब्रुवारीपर्यंत शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. 

सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण २० मंत्री आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक खाती आहेत. ९ शिंदे गटाचे आणि ९ भाजपाचे मंत्री आहेत. शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार मागील ४ महिन्यापासून रखडला आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी हा विस्तार होईल असं सांगण्यात आले होते. परंतु तो अद्यापही झाला नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्याकडील मंत्रिपदासाठी इच्छुक अनेक नेते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात प्रामुख्याने प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा समावेश आहे. कारण मविआ सरकारमध्ये बच्चू कडू यांच्याकडे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. मंत्री असतानाही कडू यांनी शिंदेंना पाठिंबा देण्यासाठी सरकारमधून बाहेर पडले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारEknath Shindeएकनाथ शिंदे