शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचे आज्ञापत्र कालातीत, राजकर्त्यांना उपयुक्त; राज्य कारभारात अंमल केला तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 13:35 IST

अभ्यासक, संशोधकांनी गड-किल्ले, आरमार, प्रजा आदी पैलूंवर टाकला प्रकाश

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी उदगीर (जि. लातूर) : छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र हे कालातीत आहे. कोणत्याही काळात, कोणत्याही राज्यकर्त्यांना ते उपयुक्त ठरणारे आहे. राजकारण्यांनी हे आज्ञापत्र बारकाईने वाचून तसा अंमल राज्य कारभारात केला तर नक्कीच प्रजाहित साधले जाऊ शकते, असा सूर अभ्यासकांनी रविवारी चर्चेतून काढला.

साहित्य संमेलनातील छत्रपती शाहू महाराज सभामंडपात रविवारी सकाळी आज्ञापत्र या ग्रंथावर चर्चा झाली. यात अभ्यासक अविनाश कोल्हे, राजा दीक्षित, सुरेश शिंदे, गणेश मोहिते यांनी सहभाग घेतला. या चर्चेतून छत्रपती शिवरायांनी गड, किल्ले, कडे, आरमार, प्रजा, शेतकरी यासह विविध घटकांच्या बाबतीत अत्यंत बारकाईने अभ्यासपूर्वक काढलेल्या आज्ञापत्रांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यात आली. अगदी आज्ञापत्रातील भाषेचे सौंदर्यही येथे अधोरेखित करण्यात आले. प्रजाहित साधण्यासाठी, राज्य कारभार हाकण्यासाठी महसुलाचे महत्त्व जाणून भूमिदानाबाबत त्यांनी घालून दिलेली तत्त्वे आजच्या काळातही अत्यंत उपयुक्त असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. 

दिव्याची वात उंदीर नेतील, गंजी जाळतील...छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांची किती काळजी घेतली होती, हे दिव्यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. आपल्या आरमारास ते रात्री झोपताना दिवे बंद करण्यास आज्ञापत्रातून सांगत. दिवा चालू ठेवल्यास उंदीर वात पळवतील व शेतकऱ्यांच्या गंजीवर टाकतील. गंजी जळाल्यास शेतकऱ्यांचे वर्षभराचे धान्य नष्ट होईल, इतका बारकावा यातून दिसतो. भाजीच्या देठालाही हात लावू नका, हे सांगणेही या काळजीचेच प्रतीक. आजच्या राज्यकर्त्यांनी इतक्या बारकाव्याने शेतकऱ्यांची काळजी घेतल्यास आत्महत्या थांबतील, असा सूरही अभ्यासकांनी काढला.