शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

शिवरायांचे आज्ञापत्र कालातीत, राजकर्त्यांना उपयुक्त; राज्य कारभारात अंमल केला तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 13:35 IST

अभ्यासक, संशोधकांनी गड-किल्ले, आरमार, प्रजा आदी पैलूंवर टाकला प्रकाश

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी उदगीर (जि. लातूर) : छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र हे कालातीत आहे. कोणत्याही काळात, कोणत्याही राज्यकर्त्यांना ते उपयुक्त ठरणारे आहे. राजकारण्यांनी हे आज्ञापत्र बारकाईने वाचून तसा अंमल राज्य कारभारात केला तर नक्कीच प्रजाहित साधले जाऊ शकते, असा सूर अभ्यासकांनी रविवारी चर्चेतून काढला.

साहित्य संमेलनातील छत्रपती शाहू महाराज सभामंडपात रविवारी सकाळी आज्ञापत्र या ग्रंथावर चर्चा झाली. यात अभ्यासक अविनाश कोल्हे, राजा दीक्षित, सुरेश शिंदे, गणेश मोहिते यांनी सहभाग घेतला. या चर्चेतून छत्रपती शिवरायांनी गड, किल्ले, कडे, आरमार, प्रजा, शेतकरी यासह विविध घटकांच्या बाबतीत अत्यंत बारकाईने अभ्यासपूर्वक काढलेल्या आज्ञापत्रांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यात आली. अगदी आज्ञापत्रातील भाषेचे सौंदर्यही येथे अधोरेखित करण्यात आले. प्रजाहित साधण्यासाठी, राज्य कारभार हाकण्यासाठी महसुलाचे महत्त्व जाणून भूमिदानाबाबत त्यांनी घालून दिलेली तत्त्वे आजच्या काळातही अत्यंत उपयुक्त असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. 

दिव्याची वात उंदीर नेतील, गंजी जाळतील...छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांची किती काळजी घेतली होती, हे दिव्यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. आपल्या आरमारास ते रात्री झोपताना दिवे बंद करण्यास आज्ञापत्रातून सांगत. दिवा चालू ठेवल्यास उंदीर वात पळवतील व शेतकऱ्यांच्या गंजीवर टाकतील. गंजी जळाल्यास शेतकऱ्यांचे वर्षभराचे धान्य नष्ट होईल, इतका बारकावा यातून दिसतो. भाजीच्या देठालाही हात लावू नका, हे सांगणेही या काळजीचेच प्रतीक. आजच्या राज्यकर्त्यांनी इतक्या बारकाव्याने शेतकऱ्यांची काळजी घेतल्यास आत्महत्या थांबतील, असा सूरही अभ्यासकांनी काढला.