शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अँटिबाॅडी कमी झाल्याने वाढतोय कोरोनाचा धोका, वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण; अँटिबाॅडीजवर लक्ष ठेवावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 07:35 IST

कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याविषयी सर्व स्तरातून प्रयत्न केल्यानंतर अनेक लाभार्थी आजही लसीच्या दुसऱ्या आणि वर्धक मात्रेपासून वंचित आहेत.

मुंबई : मागील काही दिवसांत इन्फ्लूएंझासह कोरोना संसर्गातही वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे इन्फ्लूएंझा रुग्णांसह कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी कोरोनाचा नवा व्हेरिएंट असल्याची शक्यता वर्तविली असून सामान्य नागरिकांमध्ये अँटिबाॅडी (प्रतिपिंड) कमी झाल्याने संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याची बाब अधोरेखित केली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याविषयी सर्व स्तरातून प्रयत्न केल्यानंतर अनेक लाभार्थी आजही लसीच्या दुसऱ्या आणि वर्धक मात्रेपासून वंचित आहेत. त्यामुळे सध्याच्या कोरोना संसर्गाच्या वाढीचे हे सुद्धा कारण असू शकते, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. याविषयी राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीच्या सर्व मात्रा घेऊन बराच कालावधी उलटला आहे. त्यांच्यात ठरावीक कालावधीनंतर कोरोना लसीचा प्रभाव कमी झाल्याने अँटिबाॅडी कमी झाल्याचे दिसत आहे.

अँटिबाॅडीजना कोरोनाच्या नव्याने वाढणाऱ्या संसर्गाला विरोध करण्यासाठी काही कालावधी जाऊ द्यावा लागेल, त्यानंतर या वाढीचे नेमके कारण अधिक ठामपणे सांगता येईल. याविषयी, राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, सध्या कोरोना संसर्गाच्या वाढीचे विश्लेषण करण्यासाठी रुग्णांची लक्षणे, त्याची तीव्रता आणि त्यांच्या अँटिबाॅडीजवर लक्ष ठेवावे लागेल. त्यानंतर या वाढीमागील वास्तव समोर येईल. 

राज्यात सक्रिय रुग्ण १६०० पारसार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १,६०० पार गेली असून सद्य:स्थितीत १ हजार ६१७ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात असून त्याखालोखाल मुंबई आणि ठाण्यात आहे. पुण्यात सध्या ४६०, मुंबईत ४०३ आणि ठाण्यात ३११ रुग्ण सक्रिय आहेत. राज्यात गुरुवारी १९८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एकाही मृत्यूची नोंद नाही. 

कोरोना संसर्ग कितपत वाढत आहे, त्याची तीव्रता किती आहे, हे पडताळावे लागेल. त्यानंतर अँटिबाॅडीजची संख्या कमी झाली असेल तर पुन्हा वर्धक मात्रा घ्यावी लागेल का? त्याची आवश्यकता आहे का? याबाबत केंद्राकडून येणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांची वाट पाहावी लागेल.- डॉ. राहुल पंडित, सदस्य, कोविड टास्क फोर्स

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या