शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

डोंबिवलीचा रिक्षावाला आमदार आणि ठाण्याचा रिक्षावाला मुख्यमंत्री आहे - प्रताप सरनाईक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 19:10 IST

Pratap Sarnaik : डोंबिवलीचा रिक्षावाला प्रताप सरनाईक आमदार आहे आणि ठाण्याचा रिक्षावाला एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री आहे. रिक्षावाल्यांना चांगले दिवस आल्याचे आम्हाला वाटत आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण बदलले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत शिवसेनेत मोठी फूट पाडली आणि 40 हून अधिक आमदारांना आपल्यासोबत घेऊन भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आमदारांपैकी प्रताप सरनाईक यांचेही नाव घेतले जाते. दरम्यान, आमदार प्रताप सरनाईक यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी डोंबिवलीचा रिक्षावाला प्रताप सरनाईक आमदार आहे आणि ठाण्याचा रिक्षावाला एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री आहे. रिक्षावाल्यांना चांगले दिवस आल्याचे आम्हाला वाटत आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

आमदार प्रताप सरनाईक म्हणाले, "शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस वाढत होती. त्यामुळे मी सर्व आमदारांची खदखद पत्राद्वारे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या कानावरती घातली होती. त्यावेळी त्या पत्राची दखल घेतली नव्हती. परंतु मला या गोष्ठीचा आनंद वाटत आहे की, त्या पत्राची दखल राज्यातील शिवसेनेच्या 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांनी घेतली. अभिमानास्पद गोष्ट आहे. एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करत आलो. डोंबिवलीचा रिक्षावाला प्रताप सरनाईक आमदार आहे आणि ठाण्याचा रिक्षावाला राज्याचा मुख्यमंत्री आहे. रिक्षावाल्यांना चांगले दिवस आले आहेत, असे आम्हाला वाटत आहे." 

ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. ईडीचे सरकार राज्यात आले आहे. कंगना राणावत आणि अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात हक्क भंग मांडला. शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून मी आवाज उठवला. त्यावेळी जी मदत सहकार्य मिळाले पाहिजे होते, ते मिळालेले नाही. मदतीची  कुटुंबीयांना अपेक्षा होती, ती मिळाली नाही. वाढदिवसाच्या दिवशी देखील फोटो काढायला मिळालेले नाही. सीआरपीएफ जवान आता माझा सुरक्षेसाठी आहेत. कालचक्र कधी फिरेल हे सांगता येणार नाही. खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस आले आहे. माझा मतदार संघात 300 कोटी निधी दिला आहे. शहरातील विकास कामे काशी करता येईल ते पाहू, असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले. 

याचबरोबर, किरीट सोमय्या कोण देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री आहेत का? ते विरोधी होते, तेव्हा त्यांनी माझ्यावरती आरोप केले आणि त्यांच्या आरोपाला मी प्रत्युत्तर दिले. त्यांनी माझ्यावरती केस दाखल केली आहे. मी देखील त्यांच्यावरती केस दाखल केली आहे. त्यामुळे ही न्यायालयीन प्रक्रिया चालूच राहील. काँग्रेसला स्वतःचे आमदार टिकवायचे आहेत म्हणून ते आरोप करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबाबत विश्वास दर्शक ठराव झाला, तेव्हा काँग्रेसचे आमदार अनुपस्थित होते. तर सरकार टिकेल की नाही, हे त्यांनी सांगू नये. सर्व ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवकांचा कौतुक करायला पाहिजे एक दोन नव्हे तर 66 नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा देत आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, नवी मुंबईतील सर्व नगरसेवक आमच्या सोबत आहेत, असेही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक