शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याची तलवार बनणार सारस्वतांची ‘लेखनी’; ९९व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हावर पराक्रम अन् साहित्यशक्तीचा संगम

By सचिन काकडे | Updated: September 13, 2025 17:57 IST

साताऱ्यात तब्बल ३२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून, या संमेलनाची सध्या जोरकस तयारी

सचिन काकडेसातारा : तलवारीच्या धारेवर अटकेपार झेंडा रोवणाऱ्या साताऱ्याच्या भूमीत आता लेखनीची धार तळपणार आहे. ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नुकतेच प्रकाशित झालेले बोधचिन्ह याच ऐतिहासिक प्रवासाचे प्रतीक बनले आहे. यात तलवारीची शौर्यगाथा आणि लेखणीची ज्ञानशक्ती यांचा सुंदर मिलाफ साधण्यात आला आहे.साताऱ्यात तब्बल ३२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून, या संमेलनाची सध्या जोरकस तयारी सुरू आहे. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या एका सोहळ्यात संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण प्रसिद्ध व्यंगचित्रकार, शि. द. फडणीस, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह मसाप, मावळा फाउंडेशनचे पदाधिकारी व साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत करण्यात आले. हे बोधचिन्ह शि. द. फडणीस यांच्या कुंचल्यातून साकारण्यात आले असून, त्यामागे गहण अर्थ लपला आहे.ज्या तलवारीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले, शत्रूंचे मनसुबे उधळून लावले, अटकेपार झेंडा रोवण्याची किमया साध्य करून दाखविली तीच तलवार आता लेखणीच्या रूपातून साहित्याच्या क्षितिजावर उजळणार आहे. बोधचिन्हावर तलवारीचा धाक आणि लेखणीचा विचार यांचा सुंदर गोफ गुंफण्यात आला आहे. हे बोधचिन्ह साताऱ्याच्या मावळ्यांच्या देदीप्यमान पराक्रमाची आठवण करून देते आणि त्याचवेळी मराठी भाषेच्या सामर्थ्यावरही प्रकाश टाकते.स्वातंत्र्यपूर्व काळातही इथल्या लेखणीने तलवारीसारखीच क्रांती घडवली, याच इतिहासाचा संदर्भ घेऊन फडणीस यांनी हे बोधचिन्ह साकारले आहे. हे चिन्ह केवळ संमेलनाचे प्रतीक नसून, मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्याचा आणि तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याचा निर्धारही व्यक्त करते.

मराठी भाषेचा गौरवसाताऱ्यात होत असलेल्या साहित्य संमेलनामुळे साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, जो-तो या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात आहे. या सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेले बोधचिन्ह साताऱ्याच्या भूमीला आणि मराठी भाषेच्या गौरवाला वेगळ्या उंचीवर नेणारे ठरणार आहे.