शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
3
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
4
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
6
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
7
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
8
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
9
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
10
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
11
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
12
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
13
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
14
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
15
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
16
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बाबूजींनी दाखविलेल्या प्रेमाच्या, समतेच्या, एकात्मतेच्या मार्गानेच ‘लोकमत’ची वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 08:19 IST

विजय दर्डा : कोणाशी द्वेष नाही, आमची विचारांशी, गुणवत्तेशी स्पर्धा

यवतमाळ : ‘लोकमत’चे आजचे वैभव सहजासहजी मिळालेले नाही. यासाठी अनेकांनी संघर्ष केला आहे. काम करताना मतभेद स्वाभाविक आहेत. मात्र, मनभेद नाहीत. बाबूजींनी दाखविलेल्या प्रेमाच्या, समतेच्या, एकात्मतेच्या मार्गानेच ‘लोकमत’ची वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी केले.

‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षास शनिवारी प्रारंभ झाला. यानिमित्ताने येथील दर्डा मातोश्री सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर लोकमतचे एडिटर-एन-चीफ राजेंद्र दर्डा, माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे, ‘लोकमत’चे माजी संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर, ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्र, ‘लोकमत टाईम्स’चे संपादक एन. के. नायक आदींची उपस्थिती होती.

महात्मा गांधीजींच्या विचारांनी बाबूजींची जडणघडण झाली. पुढे अनेक थोरांची त्यांना संगत लाभली. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, इंदिरा गांधी अशी दिग्गज मंडळी बाबूजींच्या निमंत्रणावरूनच यवतमाळला आली. पुढे सुभाषचंद्र बोस ते महात्मा गांधी, महात्मा गांधी ते पंडित नेहरू, पंडित नेहरू ते इंदिरा गांधी आणि इंदिरा गांधी ते गांधी परिवार असे सर्वांसोबत त्यांचे निकट संबंध राहिले.

जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस एकच आहे. या माणसाशी प्रेम करायला शिका, अशी शिकवण बाबूजींनी दिली. त्यांनी दिलेल्या समतेच्या, एकात्मतेच्या मार्गानेच आज ‘लोकमत’ची वाटचाल सुरू आहे. बाबूजींनी कधीही विचारांशी बेईमानी केली नाही, तर समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी ते अखेरच्या काळापर्यंत कार्यरत राहिले. त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्येही मोठे योगदान दिले. त्यामुळेच मंत्रिमंडळाची स्थापना होत असताना शरद पवार यांनी बाबूजींशिवाय कॅबिनेटची कल्पना करू शकत नाही, असे उद्गार काढले होते. बाबूजी खऱ्या अर्थाने तत्त्वज्ञानी होते. त्यांचा विचार पुढे ठेवूनच देवेंद्र दर्डा, ऋषी दर्डा, करण दर्डा ही ‘लोकमत’ची नवी पिढी वाटचाल करीत आहे. त्यामुळे यापुढील काळातही महाराष्ट्रात ‘लोकमत’च अग्रेसर राहील, असा विश्वासही विजय दर्डा यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन नागपूर ‘लोकमत’ आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी केले, तर आभार यवतमाळ जिल्हा कार्यालयप्रमुख किशोर दर्डा यांनी मानले.

बाबूजी खरे महानायक होते - राजेंद्र दर्डा

बाबूजींनी स्वातंत्र्य आंदोलनात पावणेदोन वर्षे तुरुंगवास भोगला. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सहवासातूनच बाबूजींना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. देश स्वतंत्र झाल्यानंतर बाबूजींनी विधायक पत्रकारितेची सुरुवात केली. राज्याच्या मंत्रिमंडळात बाबूजींनी विविध खात्यांचे काम, जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्राची जडणघडण झाली. खऱ्या अर्थाने बाबूजी आमच्यासाठी महानायक होते, अशा शब्दात राजेंद्र दर्डा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डा