शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राज्यात बालमृत्यूदराचा आलेख घटला; महाराष्ट्राची कामगिरी समाधानकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 07:17 IST

जन्मापासून वर्षभरात झालेल्या मृत्यूला बालमृत्यू म्हणतात. विविध कारणाने तसेच कुपोषणाने बालमृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे

पुणे : अर्भक मृत्यू, नवजात शिशुमृत्यू व बालमृत्यूमध्ये महाराष्ट्र राज्याची कामगिरी समाधानकारक असून, राज्याचा बालमृत्यूदर गेल्या दशकभरात सातत्याने घटत आहे. सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्व्हेच्या गेल्या काही वर्षांच्या अहवालानुसार ही बाब समोर आली आहे.

बाळ जन्मल्यापासून ३० दिवसांच्या आत त्याचा मृत्यू झाला असेल, तर त्याला अर्भकमृत्यू म्हणतात. अतिसार, स्तनपानाअभावी रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने व बालरोगतज्ज्ञांचा सल्ला न पाळल्यास नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते; परंतु यामध्ये सातत्याने घट होत आहे, अशी माहिती राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाने दिली.

जन्मापासून वर्षभरात झालेल्या मृत्यूला बालमृत्यू म्हणतात. विविध कारणाने तसेच कुपोषणाने बालमृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र, ही आकडेवारी सातत्याने घटत आहे. त्याचप्रमाणे नवजात मृत्यू कमी होत आहे.

भारतापेक्षा राज्याचा मृत्यूदर कमीसॅम्पल रजिस्ट्रेशन सर्व्हेनुसार भारताचा नवजात शिशू मृत्यूदर हा २२, तर महाराष्ट्र राज्याचा १३ आहे. तसेच ५ वर्षांखालील बालमृत्यूचा दर देशाचा ३५ असून, महाराष्ट्राचा २१ आहे. तसेच अर्भक मृत्यूदर हा २८ असून, महाराष्ट्राचा १६ आहे.

केरळचा मृत्यूदर सर्वात कमीअर्भक मृत्यू दरामध्ये महाराष्ट्र राज्याचा देशातील ४ क्रमांक आहे. सन २०२० च्या अहवालानुसार अर्भक मृत्यू दरामध्ये केरळ राज्याचा दर ६, दिल्लीचा १२, तमिळनाडूचा १३ तर महाराष्ट्राचा १६ आहे.

नवजात शिशू स्थिरीकरण कक्ष, बाल उपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र, घरच्या घरी नवजात शिशूची काळजी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, ॲनिमियामुक्त भारत, जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान व नवसंजीवनी योजना याद्वारे हा मृत्यूदर कमी होत आहे.    - डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य संचालक