शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

राज्यात बालमृत्यूदराचा आलेख घटला; महाराष्ट्राची कामगिरी समाधानकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 07:17 IST

जन्मापासून वर्षभरात झालेल्या मृत्यूला बालमृत्यू म्हणतात. विविध कारणाने तसेच कुपोषणाने बालमृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे

पुणे : अर्भक मृत्यू, नवजात शिशुमृत्यू व बालमृत्यूमध्ये महाराष्ट्र राज्याची कामगिरी समाधानकारक असून, राज्याचा बालमृत्यूदर गेल्या दशकभरात सातत्याने घटत आहे. सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्व्हेच्या गेल्या काही वर्षांच्या अहवालानुसार ही बाब समोर आली आहे.

बाळ जन्मल्यापासून ३० दिवसांच्या आत त्याचा मृत्यू झाला असेल, तर त्याला अर्भकमृत्यू म्हणतात. अतिसार, स्तनपानाअभावी रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने व बालरोगतज्ज्ञांचा सल्ला न पाळल्यास नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते; परंतु यामध्ये सातत्याने घट होत आहे, अशी माहिती राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाने दिली.

जन्मापासून वर्षभरात झालेल्या मृत्यूला बालमृत्यू म्हणतात. विविध कारणाने तसेच कुपोषणाने बालमृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र, ही आकडेवारी सातत्याने घटत आहे. त्याचप्रमाणे नवजात मृत्यू कमी होत आहे.

भारतापेक्षा राज्याचा मृत्यूदर कमीसॅम्पल रजिस्ट्रेशन सर्व्हेनुसार भारताचा नवजात शिशू मृत्यूदर हा २२, तर महाराष्ट्र राज्याचा १३ आहे. तसेच ५ वर्षांखालील बालमृत्यूचा दर देशाचा ३५ असून, महाराष्ट्राचा २१ आहे. तसेच अर्भक मृत्यूदर हा २८ असून, महाराष्ट्राचा १६ आहे.

केरळचा मृत्यूदर सर्वात कमीअर्भक मृत्यू दरामध्ये महाराष्ट्र राज्याचा देशातील ४ क्रमांक आहे. सन २०२० च्या अहवालानुसार अर्भक मृत्यू दरामध्ये केरळ राज्याचा दर ६, दिल्लीचा १२, तमिळनाडूचा १३ तर महाराष्ट्राचा १६ आहे.

नवजात शिशू स्थिरीकरण कक्ष, बाल उपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र, घरच्या घरी नवजात शिशूची काळजी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, ॲनिमियामुक्त भारत, जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान व नवसंजीवनी योजना याद्वारे हा मृत्यूदर कमी होत आहे.    - डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य संचालक