शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

राज्यात बिअरचा खप वाढवण्यासाठी सरकारनं नेमली समिती; महसूल वाढवण्यासाठी पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 10:43 IST

बिअर उद्योगाच्या माध्यमातून राज्यात महसूल वाढावा यादृष्टीने शासनाने एक समिती नेमली आहे

मुंबई – बिअरवरील उत्पादन शुल्कात दरवाढ केल्यानं गेल्या काही दिवसांपासून बिअरच्या विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे राज्याला मिळणारा महसूलही कमी होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. बिअरवरील उत्पादन शुल्काचा दर इतर मद्यापेक्षा जास्त असल्याने बिअरची किंमत बघून ग्राहक बिअर पिण्याकडे आकृष्ट होत नाही. त्याचसोबत इतर राज्यांनी बिअरच्या उत्पादन शुल्काचा दर कमी केल्यानंतर त्या राज्यांना महसुलवाढीसाठी फायदा झाल्याचे शासनाला दिसून आले आहे.

बिअर उद्योगाच्या माध्यमातून राज्यात महसूल वाढावा यादृष्टीने शासनाने एक समिती नेमली आहे. ही समिती बिअर उद्योगातून राज्यात महसूल वाढ व्हावी यासाठी शिफारशी देतील. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव(राज्य उत्पादन शुल्क), आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, उपसचिव, राज्य उत्पादन शुल्क, ऑल इंडिया ब्रुवरिज असोसिएशन प्रतिनिधी, अपर आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क ही ५ जणांची ही समिती असून अभ्यास करून ही समिती १ महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करेल.

त्याचसोबत समिती बिअरवरील मद्यार्क तीव्रतेनुसार तसेच मुल्याधारित पद्धतीनुसार आकारण्यात येणारा सध्याचे उत्पादन शुल्क, बिअरवरील यापूर्वीच्या उत्पादन शुल्क दरवाढी आणि त्याचा महसूल जमेवर होणारा परिणाम या सर्व गोष्टी लक्षात ठेऊन शासन महसुलात वाढ होण्याच्या दृष्टीने काय सुधारणा कराव्या लागतील यासाठी अभ्यास करेल. इतर राज्यांतील बिअर धोरणाची वस्तूदर्शक माहितीही समिती गोळा करणार आहे. शासनाने या समितीच्या नेमणुकीचा जीआर काढला आहे. मात्र विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावरून टीकास्त्र सोडले आहे.

पिओ बिर..! करो सरकार को चिअर

महाराष्ट्रात बिअरची कमी विक्री का होते याचा अभ्यास करून महाराष्ट्रात बिअर विक्री वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच IAS अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. या समितीमध्ये बिअर असोसिएशनच्या एका प्रतिनिधींचाही समावेश केला आहे. मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत यासाठी यांना समिती गठित करण्याची आवश्यकता भासू नये हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. रेशनवर बिअर वाटली तर घरोघरी दारू पिणारे तयार होतील. आमच्या साधू संतांनी केलेल्या प्रबोधनावर, गाडगे बाबांनी केलेल्या व्यसनमुक्ती प्रबोधनावर सरकार बिअर ओतणार वाटतं. जनता आंधळी कोशिंबीर खेळण्यात व्यस्त असल्याने सरकार बिनधास्त समाज विघातक निर्णय घेण्याची हिंमत करू लागले आहे अशी टीका राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारRevenue Departmentमहसूल विभागAmbadas Danweyअंबादास दानवे