शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

राज्यात बिअरचा खप वाढवण्यासाठी सरकारनं नेमली समिती; महसूल वाढवण्यासाठी पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 10:43 IST

बिअर उद्योगाच्या माध्यमातून राज्यात महसूल वाढावा यादृष्टीने शासनाने एक समिती नेमली आहे

मुंबई – बिअरवरील उत्पादन शुल्कात दरवाढ केल्यानं गेल्या काही दिवसांपासून बिअरच्या विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे राज्याला मिळणारा महसूलही कमी होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. बिअरवरील उत्पादन शुल्काचा दर इतर मद्यापेक्षा जास्त असल्याने बिअरची किंमत बघून ग्राहक बिअर पिण्याकडे आकृष्ट होत नाही. त्याचसोबत इतर राज्यांनी बिअरच्या उत्पादन शुल्काचा दर कमी केल्यानंतर त्या राज्यांना महसुलवाढीसाठी फायदा झाल्याचे शासनाला दिसून आले आहे.

बिअर उद्योगाच्या माध्यमातून राज्यात महसूल वाढावा यादृष्टीने शासनाने एक समिती नेमली आहे. ही समिती बिअर उद्योगातून राज्यात महसूल वाढ व्हावी यासाठी शिफारशी देतील. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव(राज्य उत्पादन शुल्क), आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, उपसचिव, राज्य उत्पादन शुल्क, ऑल इंडिया ब्रुवरिज असोसिएशन प्रतिनिधी, अपर आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क ही ५ जणांची ही समिती असून अभ्यास करून ही समिती १ महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करेल.

त्याचसोबत समिती बिअरवरील मद्यार्क तीव्रतेनुसार तसेच मुल्याधारित पद्धतीनुसार आकारण्यात येणारा सध्याचे उत्पादन शुल्क, बिअरवरील यापूर्वीच्या उत्पादन शुल्क दरवाढी आणि त्याचा महसूल जमेवर होणारा परिणाम या सर्व गोष्टी लक्षात ठेऊन शासन महसुलात वाढ होण्याच्या दृष्टीने काय सुधारणा कराव्या लागतील यासाठी अभ्यास करेल. इतर राज्यांतील बिअर धोरणाची वस्तूदर्शक माहितीही समिती गोळा करणार आहे. शासनाने या समितीच्या नेमणुकीचा जीआर काढला आहे. मात्र विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावरून टीकास्त्र सोडले आहे.

पिओ बिर..! करो सरकार को चिअर

महाराष्ट्रात बिअरची कमी विक्री का होते याचा अभ्यास करून महाराष्ट्रात बिअर विक्री वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच IAS अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. या समितीमध्ये बिअर असोसिएशनच्या एका प्रतिनिधींचाही समावेश केला आहे. मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत यासाठी यांना समिती गठित करण्याची आवश्यकता भासू नये हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. रेशनवर बिअर वाटली तर घरोघरी दारू पिणारे तयार होतील. आमच्या साधू संतांनी केलेल्या प्रबोधनावर, गाडगे बाबांनी केलेल्या व्यसनमुक्ती प्रबोधनावर सरकार बिअर ओतणार वाटतं. जनता आंधळी कोशिंबीर खेळण्यात व्यस्त असल्याने सरकार बिनधास्त समाज विघातक निर्णय घेण्याची हिंमत करू लागले आहे अशी टीका राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारRevenue Departmentमहसूल विभागAmbadas Danweyअंबादास दानवे