शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेचे रण पेटणार, मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर

By विश्वास पाटील | Updated: June 22, 2024 12:14 IST

केंद्रीय निवडणूक आयोग सज्ज : १ जुलै २०२४ अर्हता दिनांक निश्चित

विश्वास पाटीलकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील जय - पराजयाच्या, आरोप - प्रत्यारोपांचा धुरळा अजून ताजा असतानाच महाराष्ट्रासह हरयाणा, झारखंड, जम्मू आणि काश्मीरसाठी मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण करण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला. मतदारयाद्या तयार करण्यासाठी १ जुलै २०२४ ही अर्हता दिनांक असेल.लोकसभा निवडणूक उत्तम पद्धतीने पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुका घेण्यास आयोग सज्ज झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाची मुदत २६ नोव्हेंबर २०२४पर्यंत आहे. त्याआधी राज्यात नवे सरकार स्थापन व्हायला हवे.लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागला. त्याच दिवसापासून राज्यभर विधानसभेच्या हालचाली सुरू झाल्या. कोणत्या विधानसभा मतदारसंघात कुणाला मताधिक्य मिळाले, कोण कुठे कमी पडले, कुणाला धोक्याचा इशारा मिळाला, अशी चर्चा सुरू झाली. इच्छुक व विद्यमान आमदारांनी केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी काढून त्यानुसार जोडण्या सुरू केल्या. गेली निवडणूक २१ ऑक्टोबरला झाली होती.त्याचदरम्यान यावेळेचीही निवडणूक गृहीत धरल्यास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विधानसभेसाठी आचारसंहिता लागू शकेल. त्यामुळे आचारसंहिता लागू व्हायला तसे सत्तरच दिवस राहिले आहेत. सध्या राज्यात आमदारांतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या १२ जागांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्याचा निकाल लागताच विधानसभेच्या हालचालींना वेग येणार आहे. त्याचबरोबरीने निवडणूक आयोगाची प्रक्रियाही गतिमान होणार आहे.

विधानसभा सभागृहाची मुदत

  • महाराष्ट्र : २६ नोव्हेंबर २०२४
  • हरयाणा : ०३ नोव्हेंबर २०२४
  • झारखंड : ०५ जानेवारी २०२५

मतदारयाद्यांचा कार्यक्रम असा

  • केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (ब्लॉक लेव्हल ऑफिसर) मतदान नोंदणीसाठी घरोघरी सर्वेक्षण : २५ जून ते २४ जुलै २०२४
  • प्राथमिक मतदारयादी प्रसिद्धी : २५ जुलै २०२४
  • मतदारयादीवरील हरकती : २५ जुलै ते ९ ऑगस्ट २०२४
  • हरकतींचे निराकरण करण्यासाठी विशेष मोहीम : शनिवार, रविवार
  • हरकतींवरील निकाल : १९ ऑगस्ट २०२४
  • अंतिम मतदारयादी प्रसिद्ध : २० ऑगस्ट २०२४

सोयीच्या ठिकाणी मतदान केंद्रे

  • लोकसभा निवडणुकीत देशभर निवडणूक आयोगाने एक मोहीम राबविली. त्यामध्ये लोकांना सोयीच्या ठिकाणी मतदान केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढल्याचा अनुभव आहे.
  • त्यामुळेच या निवडणुकीतही आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रे अगदी लहान वस्तीजवळ, वाढीव / समूह गृहनिर्माण सोसायट्या, शहरी भागातील झोपडपट्ट्यांचे समूह आणि विस्तारत असलेल्या शहरी / निमशहरी / ग्रामीण भागात जेथे वाढ झाली आहे, अशा ठिकाणी मतदान केंद्रे सुरू करण्यावर भर दिला आहे.
  • त्यासाठी व्यापक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी शाळा, सामुदायिक सभागृहे, गृहनिर्माण सोसायटीतील सुरक्षित खोल्या यांचा शोध घ्यावा, असे म्हटले आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग