शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

भूजलाशयीन मत्स्य व्यवसायाचा समिती करणार अभ्यास, शासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 08:38 IST

या विभागाच्या योजना म्हणजे आजकाल पैसे वाटून घेण्याच्या योजना असल्याची टीका मच्छीमार बांधवांतून होत आहे. त्यामुळे ही समिती आता नव्याने काय शोधणार? अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली.

- विश्वास पाटील

कोल्हापूर : राज्यात भूजलाशयीन मत्स्यव्यवसायासाठी मोठा वाव असून, हा व्यवसाय करताना भूजल, निमखाऱ्या मत्स्यव्यवसायाशी निगडित अडीअडचणी जाणून घेण्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीने त्यांचा अहवाल कधी द्यावा, हे मात्र समितीला सूचविलेले नाही.

या विभागाच्या योजना म्हणजे आजकाल पैसे वाटून घेण्याच्या योजना असल्याची टीका मच्छीमार बांधवांतून होत आहे. त्यामुळे ही समिती आता नव्याने काय शोधणार? अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली.

नदी, तलाव, ओढ्यातील मत्स्यव्यवसायाला भूजलाशयीन तर समुद्रकाठच्या सागरी पट्ट्यातील व्यवसायाला मत्स्यव्यवसाय म्हणून ओळखले जाते. या दोन्हींच्या अडचणी वेगवेगळ्या आहेत. या मत्स्यव्यवसायाला बळ दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असे सरकारला वाटते. त्यात तथ्यही आहे. परंतु, प्रत्यक्षात तसा व्यवहार होत नाही. ठराविक मच्छीमार सोसायट्या जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनुदानाची लूट करत असल्याच्या तक्रारी आहेत. 

देशात पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशच्या खालोखाल सुमारे साडेतीन लाख हेक्टर जलक्षेत्र महाराष्ट्रात आहे. परंतु, त्यासाठी लागणारे हजारो कोटींचे मत्स्यबीज उपलब्ध नाही. शासनाने २०१९च्या महापुरात ज्यांचे नुकसान झाले, त्यांना भरपाई देण्याचा निर्णय घेतल्यावर ज्यांनी मत्स्यबीजच विकत घेतले नव्हते, अशा लोकांनी अनुदान लाटल्याच्या तक्रारी आहेत.

समिती अशीजिल्हाधिकारी (अध्यक्ष), सदस्य पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, सहायक निबंधक (दुग्ध), जिल्हा मच्छीमार संघाचे पाच प्रतिनिधी, मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती. मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त हे सदस्य सचिव असतील.

समितीची कार्यकक्षाभूजल, निमखारे मत्स्यव्यवसायाशी संबंधित अडीअडचणींबाबत विचारमंथन करून उपाययोजना सुचविणे.

मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी शासनाने उचललेल्या कोणत्याही पावलाचे आम्ही स्वागतच करतो. परंतु, ज्या योजना, अभ्यास शासन करणार आहे, त्याचा लाभ गोरगरीब मच्छिमारांना व्हावा. मूठभरांचे खिसे भरण्यासाठी योजना राबवू नयेत.- प्रा. एकनाथ काटकर, अध्यक्ष, भोई समाज सेवा संस्था

टॅग्स :Fishermanमच्छीमार